हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

*ईपीएफओचा कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियाना मोठा दिलासा, कामगार मंत्रालयाने आधीच्याच सुविधांमध्ये बदल केले आहेत.



*ईपीएफओचा कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियाना मोठा दिलासा, कामगार मंत्रालयाने आधीच्याच सुविधांमध्ये बदल केले आहेत.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर कामगार मंत्रालयाने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कामगार मंत्रालयाने ईपीएफओअंतर्गत (EPFO) मोठा दिलासा कोरोनामुळे कुटुंबातील कमावता सदस्य गमावलेल्या कुटुंबाना दिल्या आहेत. यासाठी ईपीएफओ काही नवीन सुविधा देऊ केल्या आहेत तर काही आधीच्याच सुविधांमध्ये बदल केले आहेत. ईपीएफओमुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या सुविधा कोणत्या आहेत ते विस्ताराने पाहूया. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देताना त्याचा भार केंद्र सरकार उचलणार असून त्याचा कोणताही अतिरिक्त भार कंपन्यांवर येणार नाही, असे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ईपीएफओअंतर्गत (EPFO) येणाऱ्या कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजनेचा म्हणजेच ईडीएलआयचा (EDLI) लाभ कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना होणार आहे. या योजनेअंतर्गत (EDLI) देण्यात आलेल्या सुविधेनुसार ज्या कर्मचाऱ्याचा (खासगी आणि सरकारी) मृत्यू होईल त्याच्या कुटुंबियांना ग्रॅच्युईटी (Gratuity), फॅमिली पेन्शन (Family Pension) मिळण्यासाठी किमान सेवेची अट नसणार आहे. ईपीएफ अॅंड एमपी अॅक्टअंतर्गत तरतूदींनुसार जर एखादा कर्मचारी आजारी असेल आणि कार्यालयात येत नसेल तर ९१ दिवसांच्या वेतनाच्या ७० टक्के इतका आजारपणासाठी भत्ता दिला जातो. केंद्र सरकारने केलेले बदल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे असतील.

ईपीएफओच्या योजनेचे लाभ 

1)  ईपीएफओमार्फत पीएफ खातेधारकांना विमासंरक्षण देण्यात येते. याआधी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ६ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षणाअंतर्गत मिळत होती. यापुढे विम्याची रक्कम वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे.

2) याआधी पीएफ खातेधारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मिळणारा विम्याचा २.५ लाख रुपयांचा लाभ मिळण्यासाठी एकाच कार्यालयात किंवा कंपनीत सलग १२ महिने नोकरी करण्याचे बंधन होते. त्यामुळे कंत्राटी कामगार किंवा तात्पुरत्या स्वरुपात नोकरी करणारे कर्मचारी यांना हा लाभ मिळत नव्हता. यापुढे हे बंधन नसणार आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत सलग १२ महिने काम केले नसेल तरी त्याच्या कुटुंबियांना २.५ लाख रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे.

3) किमान २.५ लाख रुपयांचे विमा संरक्षण हे १५ फेब्रुवारी २०२० पासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पीएफधारक कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनादेखील या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

4) ईपीएफओच्या अंदाजानुसार पुढील तीन वर्षात म्हणजेच २०२१-२२ ते २०२३-२४ या वर्षांदरम्यान ईडीएलआय फंडातून २,१८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ पात्र कुटुंबियांना मिळणार आहे.

5) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबरोबर इतरही कारणांनी मृत्यू पावलेल्या आणि ईडीएलआय योजनेचा लाभ, म्हणजेच विमा संरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची संख्या दरवर्षी ५०,००० इतकी असण्याचा अंदाज आहे. यात दरवर्षी १०,००० अधिक मृत्यूंचा अंदाज आहे. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे.

पीएफ खातेधारकांच्या कुटुंबियांना ईएसआयसी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. यात काही अतिरिक्त लाभ दिले जाणार आहेत.

ईएसआयसीअंतर्गत मिळणारे लाभ

सध्या ईएसआयसीअंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूनंतर कंपनीतील मृत्यू किंवा काम करत असताना जखमी झाल्यास) त्याच्या रोजच्या वेतनाच्या ९० टक्के इतकी रक्कम पेन्शन रुपात त्याच्या पत्नी, किंवा आईला आयुष्यभर दिली जाते. तर विमाधारकाच्या मुलांना त्यांचे वय २५ वर्षे पूर्ण होईपर्यत हे पेन्शन दिले जाते. जर विमाधारकाला मुलगी असेल तर पेन्शनची सुविधा तिचे लग्न होईपर्यत दिली जाते. ईएसआयसी योजनेअंतर्गत जखमी झाल्यास किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना जो लाभ मिळतो यापुढे ज्या कर्मचाऱ्यांची नोंदणी ईएसआयसीच्या पोर्टल कोरोना होण्यापूर्वी झाली आहे आणि ज्यांचा मृत्यू नंतर कोरोनामुळे झाला आहे अशांच्या कुटुंबियांना ईएसआयसी योजनेच्या विमाधारकांना मिळणारे सर्व लाभ मिळणार आहेत. त्यासाठी असणाऱ्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.

1) ज्या विमाधारकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे त्या विमाधारकाची नोंदणी ईएसआयसीच्या ऑनलाईन पोर्टल त्याला कोविड होण्याच्या तीन महिने अगोदर झाली असली पाहिजे. 

2) विमाधारकाला कोविड होण्याआधी त्याची नोकरी किंवा काम किमान ७८ दिवस झालेले असले पाहिजे. म्हणजेच त्या कर्मचाऱ्याला कोरोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी किमान ७८ दिवसांचे वेतन मिळालेले असले पाहिजे.

दोन वर्षांसाठी मिळणार लाभ

ईएसआयसीचे जे विमाधारक वरील अटींची पूर्तता करतील आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मासिक वेतनाच्या ९० टक्के इतकी रक्कम पेन्शन रुपाने दिली जाणार आहे. ही योजना २४ मार्च २०२० पासून दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.

या सुविधांमुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत होईल आणि कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणींमधून त्यांची सुटका होईल, असे मत सरकारने व्यक्त केले आहे.

Missed Call देऊन तपासा PF बॅलन्स

यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे 

*१ जून पासून तुमच्या PF खात्याबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.*


EPFO नेआपल्या खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ जून पासून तुमच्या PF खात्याबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. खातेधारकाने आपले खाते आधार वेरिफाइड करायला हवे. असं न केल्याने तुम्हाला मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागू शकते. तसेच खात्यात येणारी नियमित रक्कम ही थांबू शकते. त्यासाठी गरजेचे आहे की, आपले PF खाते आपल्या आधारशी लिंक करावे. UAN सुद्धा आधार वेरिफाइड असणे गरजेचे आहे.

EPFO चे नवीन आदेश:

EPFO ने सोशल सेक्युरिटी कोड २०२० च्या सेक्शन १४२ अंतर्गत नवा निर्णय घेतला आहे. EPFOने कंपन्यांना निर्देश दिले आहेत. की १ जून नंतर खाते आधार कार्ड ला लिंक नसल्यास किंवा UAN आधार व्हेरिफाइड नसल्यास त्याचे ECR इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरला जाणार नाही. अशातच खातेधारकांनाचा कंपनीकडून मिळणारा हिस्सा देखील थांबू शकतो.
  
तुमच्या PF अकाउंट ला आधार कार्ड लिंक करायच असल्यास .संपर्क करा7900094419  संतोष विठ्ठल साळवे. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते.

*सर्व नोकरदारांना फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांची 'ही' सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा घेऊ शकता फायदा*

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या स्वताच्या सबस्क्रायबर्सला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी पेन्शन स्कीम (ईपीएस) शिवाय लाईफ इन्श्युरन्सचा आणखी एक मोठा फायदा देते. ईपीएफचे सर्व सबस्क्रायबर इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, 1976 (ईडीएलआय) अंतर्गत कव्हर होतात. ईडीएलआय स्कीम अंतर्गत प्रत्येक ईपीएफ अकाऊंटवर 

7 लाख रुपयांपर्यंतचे फ्री इन्श्युरन्स कव्हर मिळते. 

या स्कीममध्ये कर्मचार्‍याला कोणत्याही प्रकारचे योगदान द्यावे लागत नाही.जर एखाद्या ईपीएफओ मेंबर्सचा कोरोना संकटात मृत्यू झाला तर नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या रक्कमेवर क्लेम करू शकतो.
              
क्लेमसाठी र्फॉर्म - 5 IF जर जमा करणे आवश्यक. 
क्लेमसाठी र्फॉर्म - 5 IF साठी संपर्क करा.. 7900094419  - संतोष विठ्ठल साळवे



*केव्हा आणि कसा करावा क्लेम ?*

या रक्कमेसाठी क्लेम नॉमिनीकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर केला जाऊ शकतो. यामध्ये एकरक्कमी पैसे दिले जातात. हा इन्श्युरन्स कव्हर सबस्क्रायबरला फ्री मिळतो. यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत. पीएफ अकाऊंटसोबत ते लिंक होते.
 
दावा कसा करावा?

जर ईपीएफ ग्राहक अकाली मरण पावला तर, त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विमा कवचा दावा करु शकतात. हक्क सांगणार्‍याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचा / तिचा पालक त्यांच्या वतीने दावा करु शकतात. यासाठी विमा कंपनीने अल्पवयीन नॉमिनीच्या वतीने पालकांनी केलेल्या दाव्यावर कर्मचार्‍यांचा मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, पालकत्व प्रमाणपत्र आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे.

जर पीएफ खात्यावर कोणी नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस यावर दावा करु शकतात.तस करताना कुटुंबांत वाद निर्माण होऊ शकतात तर 

कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad, Death claim   व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419संतोष विठ्ठल साळवे 

                                                ESI आणि EPFO ची सर्व कामे केली जाते


*PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ, जाणून घ्या*

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे अनेक फायदे आहेत. एका कर्मचार्‍याला एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयापर्यंत पीएफ योगदानावर प्राप्तीकर कायदा कलम 80सी अंतर्गत प्राप्तीकरात सूट मिळते. याशिवाय असे अनेक फायदे आहेत जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या कर्मचार्‍यांना प्रदान करते. यामध्ये फ्री इन्श्युरन्स आणि पेन्शन लाभाचा समावेश आहे. पीएफसह मिळणार्‍या अशाच काही फायद्यांबाबत जाणून घेवूयात…

🔅मोफत वीमा :-

पीएफ खातेधारक आपल्या सेवाकाळात मृत्यु झाल्यास ईडीएलआय स्कीम अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्ससाठी पात्र असतो.
यापूर्वी हे कव्हर 6 लाख रुपये होते. यासाठी खातेधारकाला वेगळा इन्श्युरन्स प्रीमियम द्यावा लागत नाही.

🔅पेन्शन :-

पीएफ खातेधारक 58 वर्षाच्या वयानंतर पेन्शनसाठी पात्र होतो. मात्र, पेन्शन घेण्यासाठी पीएफ खात्यात किमान 15 वर्षे नियमित मासिक पीएफ योगदान असावे. पेन्शन लाभ कंपनीच्या योगदानातून मिळतो. कारण कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के पीएफ खातेधारकाच्या ईपीएस खात्यात जातात.

🔅लोन :-

कर्मचार्‍याला पीएफमध्ये लोनची सुविधा सुद्धा मिळते. आर्थिक संकटात पीएफ खातेधारक पीएफ बॅलन्सच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकतो. पीएफ लोनवर व्याजदर केवळ एक टक्का असतो. हे लोन कमी कालावधीसाठी असते आणि त्याची पूर्तता लोन मिळाल्याच्या 36 महिन्यांच्या आत करावे लागेल.

🔅अंशत: पैसे काढणे :-

ईपीएफओ मेडिकल आणि आर्थिक संकट आल्यास खातेधारकाला काही नियम आणि अटींसह अंशत: पैसे काढण्याची परवानगी देते.

🔅गृह कर्जाची परतफेड :-

कर्मचारी आपल्या पीएफ खात्याचा वापर होम लोनच्या परतफेडीसाठी सुद्धा करू शकतो. ईपीएफओच्या नियमानुसार, कर्मचारी नवीन घर खरेदी करणे किंवा घर बांधण्यासाठी आपल्या पीएफ खात्यातील 90 टक्केपर्यंत रक्कमेचा वापर करू शकतो. कर्मचारी आपल्या पीएफ बॅलन्सचा उपयोग करून जमीन सुद्धा खरेदी करू शकतो.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे 

*PF अकाऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार*

 ईपीएफओद्वारे अनेक खातेदारांना व्याजाच्या चांगल्या रक्कमेसह बरीच सुविधा मिळते. पण कधीकधी तुमच्या चुकांमुळे तुम्हाला काही त्रासही सहन करावा लागू शकतो. (Link PAN Card with EPF account)

*नियम काय?*

ईपीएफओने काही दिवसांपूर्वी एक अलर्ट जारी केला होता. त्यात त्यांनी अकाऊंट धारकांना पॅन कार्ड पीएफ खात्याशी जोडावे, अशी सूचना केली होती. जर पीएफ खातेधारकाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते, असेही ईपीएफओने सांगितले होते.

त्यामुळे जर तुमचे पीएफ खाते असेल तर तुमचे पॅनकार्ड ईपीएफओशी लवकरात लवकर लिंक करा. यासाठी ईपीएफओने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक संदेशही जारी केला होता. त्यात त्यांनी पॅनकार्ड ईपीएफओशी लिंक करणे गरजेचे आहे असे म्हटले होते.

*पॅनकार्ड लिंक नसेल तर काय?*

जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड यूएएनशी लिंक केले नाही तर तुम्हाला पीएफचे पैसे काढताना आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जे लोक पॅन कार्ड लिंक करत नाहीत आणि पीएफ काढण्यासाठी अर्ज करतात त्यांचा जास्तीत जास्त टीडीएस (TDS) कापला जातो. त्या उलट जे खातेधारक पॅनकार्ड लिंक करता त्यांना दिलासा मिळतो.

दरम्यान जर तुमचे पीएफ खाते पाच वर्षांपेक्षा जुने असल्यास आणि खात्यात जमा केलेली रक्कम 50 हजारांपेक्षा जास्त असल्यात पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर वजा केला जातो.

 तुमच्या PF अकाउंट ला पॅन कार्ड लिंक करायच असल्यास .संपर्क करा7900094419  संतोष विठ्ठल साळवे            

*PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे करावी लागते नोकरी? काय आहेत नियम व अटी? जाणून घ्या*

 सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार लोकांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हे अनिवार्य केले आहे. PFमुळे आपली नियमिक गुंतवणूक त्याचप्रमाणे कर बचत आणि भविष्यातील सुरक्षितता मिळते. PF खात्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला भविष्यात पेन्शनचा अधिकार आहे. भविष्यात जर PF खात्यात पैसे गुंतवले तर PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे नोकरी करावी लागते? त्यासाठी नियम काय आहेत? कोणत्या अटी आहेत? जाणून घ्या.

*पेन्शनसाठी नियम*

EPFO सदस्यांना निवृत्ती वेतनाचा हक्क मिळवण्यासाठी सलग १५ वर्षे EPF खात्यात पैसे जमा करावे लागतात.

ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचे EPF खाते उघडले जाते त्याचवेळेस EPS खातेही उघडले जाते.

खात्यात बेसिक वेतनाच्या १२ टक्के रक्कम भरावी लागते.

१२ टक्क्यांमधील ८.३३ टक्के पैसे EPS खात्यात जमा होतात तर ३.६७टक्के पैसे EPFखात्यात जमा केले जातात.

दरमहिन्याला EPS खात्यात १ हजारांहून अधिक रक्कम जमा केली जाऊ शकते.

EPFO पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी : जर तुमचा PPO क्रमांक हरवला तर ‘या’ पध्दतीनं परत मिळवा*

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लाखो पेन्शनधारकांना (EPFO pensioners) मोठा दिलासा दिला आहे. आता जर तुमचा पीपीओ क्रमांक हरवला तर तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही. आपण ते सहजपणे परत मिळवू शकता. आपल्याला हा क्रमांक पुन्हा मिळविण्यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण  ते रिकव्हर करू शकता. कर्मचार्‍याच्या सेवानिवृत्तीनंतर, पीपीओ (PPO) क्रमांक ईपीएफओद्वारे जारी केला जातो.

*पीपीओ क्रमांक म्हणजे काय?*

पीपीओ हा एक युनिक क्रमांक आहे. पीपीओ क्रमांकाच्या साह्याने निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना पेन्शन मिळते. भविष्य निर्वाह निधीच्या मदतीने आपण ते पुन्हा मिळवू शकता.

*पीपीओ नंबरसाठी काय करावे? पीपीओ क्रमांक कसा मिळवायचा*

>> आपल्याला ईपीएफओ https://www.epfindia.gov.in/site_en/index.php च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

>> आता डाव्या बाजूला असलेल्या ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ विभागात ‘पेन्शनर्स पोर्टल’ या पर्यायावर क्लिक करा.

>> क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.

>> पेजच्या डाव्या बाजूला दिलेला ‘Know Your PPO No. पर्यायावर क्लिक करा.

>> आपल्याला आपल्या पेन्शन फंडाशी जोडलेला आपला बँक खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.

>> याशिवाय तुम्ही तुमचा पीएफ नंबर (मेंबर आयडी) टाकून सर्च करू शकता.

>> एकदा तपशील सबमिट झाल्यावर पीपीओ नंबर स्क्रीनवर दिसून येईल.

येथून जीवन प्रमाणपत्राचे स्टेटस मिळवा

पेन्शनधारकांना ही लिंक https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ओपन करावी लागेल. जीवन प्रमाणपत्र, पेमेंट आणि आपले पेन्शन स्टेटस याविषयी माहिती या पोर्टलवर मिळू शकते.

PPO क्रमांक महत्त्वाचा का आहे?

पीपीओ क्रमांक 12 डिजिटचा महत्त्वपूर्ण क्रमांक आहे. हा एक रेफ्रन्स क्रमांक आहे जो सेंट्रल पेन्शन लेखा कार्यालयात कोणत्याही कम्युनिकेशनसाठी असतो. पेन्शनधारकाच्या पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसर्‍या शाखेत हस्तांतरित करण्यासाठी पीपीओ क्रमांक आवश्यक आहे.

 या नंबरचा मदतीने आपण तक्रार करू शकता

याव्यतिरिक्त आपण जर आपल्या पेन्शनधारकाशी संबंधित तक्रार ईपीएफओमध्ये दाखल केली असेल, तर येथे पीपीओ क्रमांक देणेदेखील बंधनकारक आहे. ऑनलाइन पेन्शनची स्थिती जाणून घेण्यासाठी पीपीओ नंबरदेखील आवश्यक आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करतांना दरवर्षी पी पी ओ  क्रमांकदेखील सादर करणे आवश्यक आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                                  *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                                                       ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ *साळवे इंटरप्राईजेस...  सृष्टी महा ई सुविधा .संतोष विठ्ठल साळवे  7900094419*    https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8e

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

*देशातील या बाजारात तुम्ही किलोच्या भावाने घेऊ शकता कपडे*

 *देशातील या बाजारात तुम्ही किलोच्या भावाने घेऊ शकता कपडे* 

 देशात अशी अनेक मार्केट आहेत जिथे तुम्ही अतिशय कमी किमतीत कपडे विकत घेऊ शकतात. मी तुम्हाला देशातील अशा मार्केटची माहिती तुम्हाला देणार आहोत जिथे किलोच्या भावाने कपडे मिळतात.

हेल्थ इन्शुरन्स...

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

*दिल्लीचे कॅनॉट प्लेस-*                                                                                                                         सेकंड हँड कपडे मजनू का टिला, रघुबीर नगर, करोल बाग, इंद्रपुरी, इंद्रलोक, भरत नगर, लाल किला, चांदनी चौक, पश्चिम पुरी, ईस्ट दिल्लीसारख्या भागात मिळतात. किलोच्या भावाने ईस्ट दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी कपडे मिळतात. 20 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत कपडे या मार्केटमध्ये मिळतात. यात शर्ट, पँट, जिन्स, ड्रेस, सूट-सलवार, जॅकेट इत्यादी कपडे मिळतात. या बाजारातील अनेक दुकानात वेगवेगळे कपडे मिळतात.तुम्ही याठीकाणी बार्गेनदेखील करू शकता. तुम्ही याठीकाणी किलोच्या भावाने कपडे विकत घेऊ शकता. येथे तुम्ही 10 किलोपासून 50 किलोच्या बंडलमध्येही कपडे घेऊ शकता.सेकंड हँड कपडे भारतात इम्पोर्ट होतात. कोणीतरी वापरलेले हे कपडे असतात. या कपड्यांना सेकंड हँड कपडे विकत घेणारे व्यापारी विकत घेतात आणि त्यांना ड्रायक्लिनींग करून पुढे मार्केटमध्ये विकतात. भारतात हे सर्व कपडे चीनकडून पाठवण्यात येतात. कॉमर्स मिनिस्ट्रीच्या आकड्यांनुसार भारत देशातील टॉप 5 देशांपैकी आहे, जे संकड हँड कपडे इम्पोर्ट करतात.

*मुंबई कोलाबा मार्केट -*                                                                                                                        स्वस्त दरात कपडे मुंबईमध्ये कोलाबा मार्केट आणि क्रॉफोर्ड मार्केटमध्ये विकल्या जातात. येथे कलरफूल कुर्ते, काफ्तान, जिन्स, शर्ट इत्यादी कपडे मिळतात. स्वस्त कपडे क्रॉफोर्ड मार्केटमध्येही मिळतात. 50 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत हे कपडे मिळतात. कोलाबा मार्केट सोबतच, मुंबई चोर बाजार, दक्षिण मुंबईचे मटन स्ट्रीट, मोहम्मद अली रोड याठीकाणी सेकंड हँड कपड्यांचे मार्केट आहे. हे मार्केट अंदाजे 150 वर्षे जुने आहे. या बाजाराला सुरुवातील शोर बाजार म्हटले जात होते, कारण मोठ्याने आवाज करून येथील व्यापारी कपडे विकत होते. पण या शोरला इंग्रज चोर असा उच्चार करत होते त्यामुळे या मार्केटचे नाव चोर बाजार पडले. येथे कपडे, ऑटोमोबाईल्स पार्ट्स आणि ब्रँडेड घड्याळांच्या रेप्लीका आणि विंटेज आणि अँक सामानदेखील मिळते.

*चिकपेटे मार्केट बंगळुरू -*                                                                                                                रविवारी हे मार्केट बंगळुरूच्या चिकपेटे परिसरात भरते. तुम्ही येथे स्वस्त दरात कपडे घेऊ शकतात. फक्त कपडेच नाही तर येथे तुम्ही गुड्स, ग्रामोफोन, जुने गॅजेट्स, कॅमरा, अँटीक, इलेक्ट्रॉनिक आयटम आणि जिम इक्विमेंटदेखील मिळतात.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                                                                                               *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                                                                                    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------    संतोष विठ्ठल साळवे..7900094419*

शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या.


 संतोष साळवे...7900094419

शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या.  

शेळीपालन योजनेद्वारे राज्यातील खेडोपाडी वसलेल्या व्यक्तींना रोज़गार उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश आहे. खादी ग्रामोद्योग व संबंधित संस्थांकडून शेळी पालन संबंधित सर्व माहिती जसे की बकरीच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये, आहार, त्यांना राहण्यासाठी शेड आणि रोग आणि उपचारांविषयी अचूक माहिती तुम्हाला सांगतील. शेळी पालन 2021 या योजनेसाठी सरकार कडून अनुदान देखील मिळत असते.परंतु अर्जदारस त्यासाठी पात्र असावे लागते. बकरी पालन-पोषण करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिक बाजारपेठ यासाठी उपलब्ध आहे. ज्यामुळे मालाला बाजाराचा त्रास होत नाही.महाराष्ट्र सरकारने शेळी पालन करण्यासाठी 5 ते 6 लाख रुपयांचे अनुदान देखील जाहीर केले आहे.

शेळी पालन योजना 2021 साठी पात्रता

-लाभार्थ्याकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असावा - त्यामध्ये बकरी विकत घेतल्याबद्दल बकरीची खरेदी किंमत, घर खर्च आणि लाभांश दर्शविला जाणे आवश्यक आहे.

-जमीन - 100 बकर्‍यांसाठी 9000 चौ.मी. असावी अर्ज करताना, जमीन भाड्याची पावती / एलपीसी / लीज कागदपत्रे, जागेचा नकाशा तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे.

-रक्कम - लाभार्थ्याला त्याच्या वतीने दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे 1 लाख रुपयांचा चेक / पासबुक / एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असले पाहिजेत.

शेळी पालन योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे

-आधार कार्ड,
-पॅनकार्ड,
-अर्जदाराचे छायाचित्र,
-रहिवासी दाखला
-

जात प्रमाणपत्र 

शेळी पालन योजना 2021' या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी आणि शेली विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागे.(http://mahamesh.co.in/ )

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शेळी पालन व्यवसाय या विषयी माहिती

( ही माहिती शेळी पालन करणाऱ्या माझ्या एका शेतकरी मित्राकडून घेण्यात आलेलली आहे. ही माहिती मी तुम्हाला शेअर करतो)*

शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग ठरू शकतो.

ज्यांना शेती कमी आहे व शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन हा एक चांगला शेतीपूरक व्यवसाय आहे. शेळी पालन करण्यासाठी आपल्याला कमी जागा, कमी भांडवल लागते आणि आपण शेती करत-करत हा व्यवसाय करू शकतो. शेती करत आपण बंदिस्त शेळी पालन करू शकतो.

शेळयांना ईतर जनावरपेक्षा कमी चारा आणि पानी लागते, एक गाईला जेवढा चारा लागतो त्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. त्यामुळे ज्यांना कमी शेती आहे त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.

जे लोक शेती करत शेळी पालन करण्याचा विचार करत असतील त्यांना शेळ्यांसाठी वेगळ्या शेडची गरज पडत नाही, आपण आपल्या घरामध्ये शेळ्या बांदू शकतो. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात शेळयांचे पालन करता त्यावेळी तुम्हाला शेडची आवश्यकता पडते, यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.

शेळीपालन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी खर्चात अधिक नफा हे सूत्र होय. शेळी आणि बकरीचा अनेक कारणांसाठी उपयोग होतो. देशातील भूमिहीन, लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यास शेळीपालनाचा महत्वाचा हातभार लाभतो. त्यामुळे शेळीला गरीब शेतकऱ्यांची गाय असं म्हटलं जातं.

कमी सुपीक जमिनीत वाढणारी झुडपे आणि झाडे यांची पाने शेळ्या खातात त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकूल वातावरणामध्ये टिकू शकतात. शेळी पालन व्यवसायात सुरुवातीता खर्च कमी आहे. इतर प्राळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळीचा प्रजनन काळ कमी आहे. कोलेस्टेरॉल कमी असल्यामुळे शेळी, बकरी आणि बोकडाच्या मांसाला खूप मागणी असते. त्याचबरोबर गायीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध सहज पचवता येते.

आज महाराष्ट मध्ये जास्त करून शेतकरी शेती करत हा व्यवसाय करत असतो, त्यामध्ये त्यांना शेतामध्ये जो चारा निगतो ते शेळयांना घालत आहेत किवा रिकाम्या वेळी हे लोक शेळयांना चरण्यासाठी बाहेर घेऊन जात आहेत, जास्त करून हे लोक बंदिस्त किवा निंबंदिस्त शेळी पालन करत आहेत.

शेळी पालन करत असताना आपण दोन प्रकारे पैसे कमवू शकतो एक म्हणजे त्याचे मास विकून किवा दूध विकून. 

*आरोग्य विमा

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे.

कोरोना काळात प्रत्येकजण आरोग्य विमा काढत आहे. हा एक समजदारीचा निर्णय आहे. परंतु आरोग्य विमा महागड्या खर्चाला वाचवण्यासोबतच तुमचा टॅक्सदेखील वाचवू शकतो. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहात तर आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्ही 25 हजारापर्यंत रक्कम वाचवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांचे प्रीमियम करू शकता. त्यामुळे सेक्शन 80 डी च्या माध्यमातून सूट मिळू शकते. यामध्ये आपण मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. जर तुमचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर तुम्हाला 50 हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो.आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419*

शेळीपालनासाठी शासनाचं अनुदान

पशुपालकांनी उत्पादनाचे ध्येय ठेऊन शेळीची जात निवडावी. जमुनापारी, सिरोही, बार्बारी आणि जाखराणा जातीच्या शेळ्यांचं पालन साधारणपणे केलं जातं. एका शेळी आणि बकरीला अंदाजे एक चौरस मीटर क्षेत्र आवश्यक असते. या आधारावर आपण शेळ्यांसाठी घरे तयार करू शकता. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळी आणि बकरीला कमी चारा लागतो. सामान्यतः बकरीला दोन किलो चारा आणि अर्धा किलो धान्य देणे चांगले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेळी आणि बकरी पालन करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. यासाठी 25 ते 33.3 टक्के अनुदान केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिलं जातं आहे. शेळीपालनाच्या यशस्वी व्यवसायासाठी ते निरोगी राहणे आवश्यक आहे. आजार झाल्यास त्वरित उपचार दिले पाहिजेत. बहुतेक रोग केवळ पाऊस पडल्यासच होण्याची शक्यता असते, या काळात शेतकऱ्यांनी शेळी आणि बकऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

शेळी पालनाचे प्रकार

शेळी पालनाचे एकूण तीन प्रकार आढळतात एक परंपरागत पद्धत, दुसरी अर्धबंदिस्त पद्धत आणि तिसरा बंदिस्त पद्धत. 

1) परंपरागत पद्धत

परंपरागत पद्धतीमध्ये शेळ्यांना मोकळे चरायला सोडले जाते, ह्या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी एक वेगळा माणूस असतो तो रोज शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी घेऊन जातो.

ह्या प्रकारच्या व्यवसायमध्ये जास्त खर्च लागत नाही, शेळ्या फक्त बाहेर चरून जगू शकतात. आणि अशा प्रकारामध्ये शेळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. एकदा का शेळ्यांसाठी शेडची उभारणी केली की तुम्हाला जास्त खर्च येत नाही.

2) अर्धबंदिस्त पद्धत 

ज्यांना रोज शेळ्यांना बाहेर चरायला घेऊन जाने शक्य नाही आणि आपल्या शेतीला एक जोड धंदा म्हणून अर्धबंदिस्त शेळी पालन सुरू करू शकतो.

या प्रकारच्या शेळीपालनामध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ बाहेर चरायला सोडले जात नाही. काही लोक शेळ्यांना ज्या सीजन मध्ये चरायला चारा आहे त्या सीजन मध्ये सोडतात आणि अन्य सीजनमध्ये त्यांना आपल्या शेड मध्ये चारा पुरवण्याचे काम करतात.

तसेच मोकाट शेळीपाळांनामध्ये आंतर प्रजनन होत असते, त्यामुळे शेळीचा दर्जा कमी होतो पण अर्धबंदिस्त शेळी पाळांनामध्ये हे थोड अवगड आहे बंदिस्त शेळी पाळणापेक्षा.

3) बंदिस्त पद्धत

बंदिस्त शेळी पाळांनामध्ये शेळ्यांना 24 तास शेडमध्ये बांधून ठेवले जाते. यामध्ये खर्च थोडा जास्त आहे.

हा व्यवसाय जे शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून काही थोड्या शेळ्या पाळून बंदिस्त शेळीपाळण करतात किवा काही लोक मोठ्या प्रमाणात शेळीपालनाचा व्यवसाय करण्यासाठी ही पद्धत वापरतात.

यासाठी एक चांगली जागा, सेपरेट शेड, शेळ्यांना चारा त्यांचा दवाखाना, एत्यादी प्रकारचे खर्च येतात. हा एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे.

हे कोण सुरू करू शकते?

1) लघु आणि मध्यम शेतकरी.

2) ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक.

3) सामान्य कुरणांची उपलब्धता.

4) सुरू करण्याची कारणे.

5) कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे.

6) साधे आणि लहान शेड पुरेसे आहे.

7) स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे.

8)  शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर.

9) वर्षभराचे काम.

10) चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे.

11) केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात.

तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?

1) जमुनापारी शेळी 

चांगली उंची असलेले जनावर। 

ही शेळी इटावा, मथुरा इत्यादी ठिकाणी आढळते. याचे पालन दूध आणि मांस यासाठी केले जाते. ही शेळ्यांची सगळ्यात मोठी जात आहे.

याचा रंग पांढरा आणि शरीरमध्ये भुर्‍या रंगाचे धब्बे आढळतात, याचे कान खूप मोठे असते, यांचे शिंग 8 ते 9 सेंटिमिटर असतात आणि रोज  2 ते 2.5 लीटर दूध देण्याची क्षमता असते.

प्रौढ जमुनापारी शेळी मध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान

बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते

प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते

दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन

2) तेलीचेरी

शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो एका विण्यात 2-3 करडी

बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते

3) बोअर

संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात.

4) उस्मानाबादी शेळी 

नावाप्रमाणे ह्या प्रकारच्या शेळ्या महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात आढळतात. याचे पालन मांस यासाठी केले जाते. याचा रंग कळा आणि वर्षातून दोनदा हे बाळांना जन्म देतात.

ही शेळी जवळ-जवळ दोन बाळांना जन्म देते, त्याचे कान लांब 20 ते 25 सेंटिमिटर आढळतात आणि त्यांचे नाक रोमन असते.

5) सुरती शेळी

सुरती ही शेळी गुजरातमध्ये आढळते. ही दुभत्या जातीची बकरी आहे, याचा रंग पांढरा असतो आणि कान मध्यम आकाराचे. याची शिंगे लहान आणि वक्र असतात. तसेच सुरती प्रकाळच्या शेळ्या लांब चालण्यास सक्षम असतात.

6) मारवाडी शेळी 


मारवाडी शेळीचे पालन तीन कामासाठी केले जाते एक दूध, दुसरे मांस आणि तिसरे केसांसाठी. ह्या प्रकारच्या शेळ्या राजस्थान मध्ये मारवार जिल्ह्यामध्ये आढळतात.

याचा रंग पुर्णपणे काळा असतो, याचे कान पांढरे असतात आणि याची शिंगे त्याची कॉर्कस्क्रूप्रमाणे असतात. मारवाडी शेळीचा आकार मध्यम असतो.

7) बार्बरी शेळी 

बार्बरी एटा, अलिगड आणि आग्रा जिल्ह्यात आढळते. याचे पालन मांस उत्पादनसाठी केले जाते. याचा आकार लहान आढळतो आणि याच्या रंगामध्ये भिन्नता आढळते.कान नळी सारखे मुडलेले असते आणि शरीरमध्ये पूर्ण धब्बे, भुरे आढळतात. ह्या प्रकारच्या शेळ्या दिल्ली या ठिकाणी पाळण्यास उपउक्त आहेत.

8) बीटल शेळी 

या प्रकारच्या शेळ्या दुधासाठी चांगल्या आहेत. ह्या गुदासपुर पंजाब मध्ये आढळतात. बीटल प्रकारच्या शेळ्यांचा आकार मोठा आणि रंग काळा आणि पांढर्‍या रंगाचे धब्बे आढळतात. कान लांब लटकलेले असते आणि डोक्याच्या आत वाकलेले असते.
 

9) काळी बेंगल शेळी 

ह्या प्रकारची शेळी जास्त करून बंगाल, उडीसा, बिहार मध्ये पाळली जाते. ह्याचे पाय लहान असतात. त्यांचा रंग काळा असतो. अनुनासिक ओळ सरळ किंवा किंचित दाबली जाते. केस लहान आणि चमकदार असतात. पाय किंचित चपटे, कान लहान असते आणि काखेत पसरतात.
 

10) सिरोही शेळी 

ही राजस्थान मध्ये सिरोही जील्यामध्ये आढळते, याचे पालन दूध आणि मांस यासाठी केले जाते. याचे शरीरमध्यम आकाराचे असते. याचे कान लटकलेले असतात आणि याचा आकार 10 सेंटिमिटर पेक्षा लांब असतो.

11) कच्छ शेळी 

ह्या प्रकारची शेळी गुजरामध्ये कच्छ जिल्ह्यात आढळते, याचा आकार मोठा असतो आणि दुधासाठी याचे पालन केले जाते. याचे केस लांब आणि नाक उंचावलेले असते. शिंगे जाड, टोकदार आणि वरच्या व बाहेरील बाजूने वाढलेली जातात.

12) गद्दी शेळी 

ही  हिमाचल प्रदेशच्या कांगडा कुल्लू खोर्‍यात आढळते.

शेळीपालनाचे फायदे

शेळीपालन हा शेतीला जोड धंदा म्हणून केला जातो व याचे फायदेही शेतकर्‍यांसाठी खूप आहेत. आता आपण शेळीपालनाचे कोणते फायदे आहेत हे माहीत करून घेऊया. 

  • गरजेच्या वेळी शेळ्या विकून पैसे प्राप्त करू शकतो.
  • शेळी पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची टेक्निकची गरज पडत नाही.
  • हा व्यवसायाचा विस्तार खूप फास्ट मध्ये होतो त्यामुळे कमी खर्चात जास्त फायदा होतो.
  • ज्यांना शेती कमी किवा काहीच नाही त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.
  • शेळ्या एका वर्षातून दोनदा बाळाला जन्म देतात त्यामुळे जास्त नफा होतो.
  • शेळी दोन किवा त्यापेक्षा जास्त पिल्लांना 

बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते.आहार प्रबंधन चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.

शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.

एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत 50-100 ग्राम घन/सांद्रित आहार द्यायला पाहिजे.वाढत्या वयाच्या करड्यांना 3-10 महिन्यांपर्यंत दररोज 100-150 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.

1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.शेळ्यांच्या स्टॉलमध्ये उत्तम प्रकारच्या तांब्याने युक्त (950-1250 पीपीएम) असलेले मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यायला हवे.लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळा व्यायला (किडिंग) हवे.तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा.

प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा.

मादींनी एका किडिंग नंतर 3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते.

शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24-72 तास टिकते.माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते.माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो.काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसऱ्या दिवशी घडवायला हवा.गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिलेले बरे.

लशीकरण

करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा.

नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.

संगोपनाच्या पध्दती

सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम (अर्ध-गहन पध्दती)

कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल.इंटेन्सिव्ह सिस्टम शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो.कुरणात चारणे नाही.शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत.

शेळ्यांचा विमा

 4महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो.

अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!              *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!     ----------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे..7900094419-

*''आयुष्मान भारत योजना'' काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

*''आयुष्मान भारत योजना'' काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...

गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविण्यात येत आहेत. 

"महात्मा फुले जन आरोग्य योजना"                           तुम्हाला माहिती आहे का ? अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

*योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत अटी*

1) ग्रामीण भागातील (Rural Area)ज्या नागरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाहीअशी व्यक्ती पात्र ठरते.

2) कुटुंबात कोणीही वयस्कर (16 ते 59 वर्षे) व्यक्ती नाही.

3) जे कुटुंब महिला चालवतात.

4) कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर.

5) कुटुंब अनुसुचित जाती- जमातीतील असेल तर.

6) व्यक्ती भूमिहीन/मजूर,बेघर,आदिवासी किंवा कायदेशीर मान्यता असलेला पारंपरिक मजूर असेल तर.

7) शहरी भागातील (Urban Area)निराधार,कचरा उचलणारा कामगार,घरकाम करणारी व्यक्ती,फेरीवाले,प्लंबर,गवंडी,कामगार,पेंटर,वेल्डर,सुरक्षा रक्षक,हमाल,सफाई कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

*आयुष्यमान भारत कार्ड* *( तुमच्या परिवाराला मिळतो 5 लाखाचा आरोग्य विमा )* नविन लिस्ट आली आहे. तुमच्या गावात ली लिस्ट पाहण्यासाठी *संपर्क करा. सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!*

*विविध आजारांवरील उपचार आणि तपासण्यांचा समावेश*

या योजनेशी खासगी रुग्णालयांना देखील जोडण्यात आले आहे. या विम्यातंर्गत जवळपास सर्व आजार कव्हर केले जातात. कॅन्सर शस्त्रक्रिया,रेडिएशन थेरपी,केमोथेरपी,हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया,मणक्याची शस्त्रक्रिया,दातांची शस्त्रक्रिया,डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यासह एमआरआय (MRI)आणि सीटी स्कॅन (CT Scan)सारख्या तपासण्यांचा योजनेत समावेश आहे. सर्दी,खोकला,तापासारख्या आजारांचा या योजनेत समावेश नाही. परंतु,कोरोनाची हीच लक्षणे असल्याने त्याचा समावेश योजनेत आहे.


*कोरोनासाठी मिळणार उपचार*

कोरोनाची लक्षणे सर्दी,खोकला,ताप यासारखीच आहेत. परंतु,यात आरटीपीसीआर ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट करावी लागते. कोणत्याही आजारावर इलाज करण्यासाठी रुग्णाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याकरिता एक दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागते. यातच तुम्ही जर कोरोना पॉझिटिव्ह असालआणि उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे प्रथम तुम्हाला तपासावे लागेल. योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्याकरिता तुम्ही www.pmjay.gov.in या वेबसाईटवरऑनलाईन किंवा 14555,1800111565 या हेल्पलाईवर संपर्क साधू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आयुष्मान भारत योजनेतील खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनावर उपचार घेऊ शकता. जर तुम्हाला कोरोनामुळे खासगी रुग्णालयात क्वारंटाईन व्हावे लागले तरी देखील त्याचा खर्च या विम्यात कव्हर होईल.

*खासगी रुग्णालयातही मिळणार उपचार*

देशातील शासकीय रुग्णालयांमध्ये गरीबांवर मोफत उपचार पूर्वीपासूनच होतात. या कामात खासगी रुग्णालयांचा समावेश करणं हे आयुष्मान योजनेचं उदिदष्ट आहे. त्यानुसार,आयुष्मान भारत योजनेच्या पॅनेलला देशभरातील खासगी रुग्णालये जोडण्यात आली आहेत. तुम्ही गरजेवेळी तुमच्या नजीकचे कोणते खासगी रुग्णालय या योजनेशी जोडले आहे याबाबतची माहिती आॅनलाईन किंवा हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून घेऊ शकता. त्यानंतर या रुग्णालयातील एक आयुष्मान मित्र किंवा आरोग्य मित्र तुम्हाला दस्तावेज तपासणीसाठी मदत करेल.

*योजनेच्या लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक*

1) आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला ई-कार्ड किंवा अन्य दस्तावेज सादर करुन आपली पात्रता सिध्द करावी लागते.

2) तसेच आधार कार्ड (Aadhar Card),मतदार कार्ड किंवा रेशन कार्ड पैकी एक ओळखपत्र सादर करावे लागते.

3) आरोग्य मित्र पात्र व्यक्तीला रुग्णालयात मोफत उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करतात.

*हे खर्च विम्यात होतात कव्हर*

1) आयुष्मान भारत योजने अंतर्गत रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि नंतरच्या 15 दिवसांपर्यंत उपचार आणि औषधे मोफत मिळतात.

2) या योजनेत 1393 पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे.

3) या पॅकेज अंतर्गत रुग्णालयात आयसीयू,लॅबोरेटरी तपासण्या,रुग्णालयात राहण्याचा खर्च आदी बाबी कव्हर होतात.ayushman bharat yojana

 भारत सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जाहीर केली. केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, आयुष्यमान भारत योजनेची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते. आयुष्यमान भारत-प्राधनमंत्री जन आरोग्य योजनेविषयी माहिती असणं गरजेचे आहे.                    

*योजनेचा लाभ कुणाला?*

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेतील ग्रामीण व नागरी भागातील वंचित व व्यवसाय निकषांवर आधारित कुटुंबाना मिळतो. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते.प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंद झालेल्या 83.63 लाख कुटुंबातील सदस्यांना संगणकीकृत ई-कार्ड चा वापर करुन योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेता येतो. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

*आयुष्यमान भारत योजनेचा लाभ किती?*

आयुष्यमान भारत योजनेत 30 हजारांपासून तीन लाखांपर्यतचे उपचार घेता येतात. तर पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. आयुष्यमान भारत ही योजना कागदपत्र विरहित योजना आहे.

*ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?*

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.

*आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कसा घ्यावा?*

या योजनेत रुग्णालयात 3 दिवस अगोदर आणि उपचारानंतरच्या 15 दिवसांची क्लिनिकल ट्रीटमेंट आणि औषधं कवर होतात. या योजनेचा लाभ सूचीबद्ध असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात. 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                            

---------------------------------------------------------------

    *संतोष साळवे.. एक जनजागृती चळवळ- 7900094419 https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc                                               

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...