हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १५ जून, २०२१

विद्यार्थी मित्रांनो दहावी उत्तीर्ण झाल्यावर काय करावे? जाणून घ्या !!



विद्यार्थी मित्रांनो दहावी उत्तीर्ण झाल्यावर काय करावे? जाणून घ्या !!

दहावी उत्तीर्ण झाल्यावर सर्वच विद्यार्थी थोडे गोंधळात पडतात की त्यांनी पुढे कोणत्या विषयात शिक्षण घ्यायचे?

दहावीनंतर, योग्य विषय निवडणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण यावर आपले भविष्य अवलंबून असते आणि आपल्याला या विषयाचा अभ्यास इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये करावा लागतो. अनेक पर्याय आपल्या समोर आहेत.

10वी नंतर मुख्यतः 3 पर्याय आहेत त्यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता.

1) कला वर्ग ( Arts )

2) विज्ञानाचा वर्ग ( Science )

3) व्यावसायिक किंवा वाणिज्य वर्ग ( Commerce )

1) ( Arts ) कला

10वी नंतर निवडला जाणारा हा सर्वात लोकप्रिय विषय आहे . 10वी बोर्डाला 50℅ किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी हे निवडू शकतात. यामध्ये अनेक प्रकारचे विषय शिकवले जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे-

* भूगोल

* राज्यशास्त्र

* अर्थशास्त्र

* संस्कृत

* समाजशास्त्र

* मानसशास्त्र

* इतिहास

* इंग्रजी

* तत्वज्ञान

* ड्रॉईंग

10वी नंतर कला ( Arts ) विषय निवडण्याचे फायदे-

10वी नंतर आर्ट्स घेण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की कॉमर्स आणि सायन्सच्या तुलनेत आर्ट्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कमी दबाव असतो.

कला शाखेची निवड करून, विद्यार्थ्यांना शिकवणी किंवा कोणतेही वर्ग घेण्याचीही गरज नाही.

सर्वात मोठा फायदा म्हणजे कलाचे विद्यार्थी आयएएस, आयपीएस इत्यादी नागरी सेवा परीक्षांची तयारी करू शकतात. कारण नागरी सेवांमधून कला विषय विचारले जातात.

वाणिज्य आणि विज्ञानाच्या तुलनेत, कला विषय किंवा अभ्यासक्रमासाठी शुल्क देखील कमी आहे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

2) 
Science ) विज्ञान

जे विद्यार्थी अभ्यासात खूप वेगवान आहेत ते निवडू शकतात.हा विषय थोडा अवघड आहे. विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10वीमध्ये 50℅ पेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात. विज्ञान वर्गात 2 भाग असतात-

वैद्यकीय- जर तुम्हाला डॉक्टर / शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर हे ते निवडावे लागेल. यामध्ये फिजिक्स , केमिस्ट्री सोबत जीवशास्त्र (बायोलॉजी)शिकवले जाते .

नॉन मेडिकल (तांत्रिक) - आणि जर तुम्हाला अभियंता व्हायचे असेल तर हे निवडा. यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री सोबत गणित शिकवले जाते.

10वी नंतर विज्ञान Science ) निवडण्याचे फायदे- 

विज्ञान प्रवाहात अभियांत्रिकी , वैद्यकीय, आयटी सारखे अनेक उत्तम करिअर पर्याय उपलब्ध आहेत.याशिवाय विद्यार्थी संशोधनातील पर्यायही शोधू शकतात.

विज्ञान घेण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पुढील पर्याय खुले करते. विद्यार्थी विज्ञान शाखेतून वाणिज्य किंवा कला शाखेतील अभ्यासक्रम निवडू शकतात, परंतु वाणिज्य आणि कला शाखेचे विद्यार्थी विज्ञान विषयातील अभ्यासक्रम निवडू शकत नाहीत.

विज्ञान क्षेत्र खूप प्रगत आहे आणि यापुढेही संशोधन चालू राहिले तर करिअरच्या अमर्याद संधी आहेत.

3) Commerce ) वाणिज्य

कला नंतर वाणिज्य हा दुसरा सर्वात प्रसिद्ध विषय आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी मध्ये 40℅ किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत ते ते निवडू शकतात आणि जर आपल्याला बँकिंग क्षेत्रात रस असेल तर ते निवडू शकता. यामध्ये खालील विषय शिकवले जातात-

* अकाउंटन्सी

* बिझिनेस स्टडी

* इंग्रजी

* अर्थशास्त्र

* गणित

10वी नंतर कॉमर्स Commerce ) निवडण्याचे फायदे

10वी नंतर कॉमर्सचा अभ्यास करणार्‍या उमेदवारांकडे पदवीचे अनेक पर्याय आहेत आणि CA , CS , MBA , HR इत्यादी अनेक करिअर पर्याय आहेत.

कॉमर्सचा अभ्यास करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकीचे ज्ञान.

उमेदवाराला कळेल की त्याने ती गुंतवणुकीत कुठे गुंतवावी. बहुतेक लोक म्युच्युअल फंड, एफडी आणि शेअर बाजाराकडे वळतात .

जर उमेदवाराला संख्या आणि संख्यात्मक डेटाचे विश्लेषण करण्यात रस असेल तर वाणिज्य हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे.

बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ते फायनान्स यासारख्या क्षेत्रात करिअरचे अमर्याद पर्याय आहेत

दहावीनंतर करता येतील "हे' कोर्सेस ! करिअरचे उत्तम पर्याय

दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी आणि निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता, यावर ते अवलंबून आहे. दहावीनंतर विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक कोर्स घेऊ शकतात. त्यासंबंधीची माहिती जाणून घेऊया...

आयटीआय कोर्स  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय अभ्यासक्रम खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात. त्यातील काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे...  

1) आयटीआय टर्नर  

2) आयटीआय मॅकेनिक  

3) आयटीआय वेल्डर  

4) आयटीआय प्लंबर  

5) आयटीआय इलेक्‍ट्रिशियन


मित्रानो,आय टी आय ची अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अभियांत्रिकी पदविका  दहावीनंतर दुसरा प्रसिद्ध पर्याय म्हणजे विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा करू शकतात. त्यासाठी दहावीत विद्यार्थी गणित व विज्ञान विषय घेऊन पास झालेला असावा. हे डिप्लोमा कोर्स तीन वर्षांचे आहेत.  

1) डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग  

2) डिप्लोमा इन टेक्‍स्टाईल इंजिनिअरिंग  

3) डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग  

4) डिप्लोमा इन इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग  

5) डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग  

6) डिप्लोमा इन आयसी इंजिनिअरिंग  

7) डिप्लोमा इन ईसी इंजिनिअरिंग  

8) डिप्लोमा इन माइनिंग इंजिनिअरिंग

डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या पदवीला प्रवेश घेता येतो. तसेच दहावीनंतर इतर डिप्लोमा कोर्सेसलाही प्रवेश घेता येऊ शकतो. ते कोणते ते पाहूया...  


1) डिप्लोमा इन फॅशल डिझाईन  

2) डिप्लोमा इन फूड टेक्‍नॉलॉजी  

3) डिप्लोमा इन गारमेंट टेक्‍नॉलॉजी  

4) डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स  

5) डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी  

6) डिप्लोमा इन इन्स्ट्रूमेंटल टेक्‍नॉलॉजी  

7) डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन  

8) डिप्लोमा इन लेदर टेक्‍नॉलॉजी  

9) डिप्लोमा इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स  

10) डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग

वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठे बदल, जाणून घ्या नेमकं कसं असणार?*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 


*ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठे बदल, जाणून घ्या नेमकं कसं असणार?*

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएममधून कॅश (ATM cash withdrawal) काढण्यासाठी काही नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे. ग्राहकांच्या खिशावरही याचा परिणाम होणार आहे. बँक ग्राहक फ्री ट्रान्झेक्शन मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा करत असेल, तर 1 जानेवारी 2022 पासून 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति ट्रान्झेक्शन शुल्क भरावं लागेल. बँकांच्या एटीएममधून ठरलेल्या फ्री मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यासाठी पुढील वर्षापासून अधिक शुल्क भरावं लागेल.

 भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकांना पुढील वर्षापासून ATM द्वारे फ्री मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी शुल्क वाढवण्यास परवानगी दिली आहे. 1 जानेवारी 2022 पासून बँक ग्राहकांनी फ्रीमध्ये पैसे काढण्याच्या किंवा इतर सुविधांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यास त्यांना प्रति ट्रान्झेक्शनसाठी 21 रुपये द्यावे लागतील. जे सध्या 20 रुपये आहे. ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा फ्री ट्रान्झेक्शन करू शकतात. ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधूनही पैसे काढण्यास फ्री ट्रान्झेक्शनसाठी पात्र आहे.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

RBI ने आणखी एक घोषणा केली आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 15 रुपयांवरुन 17 रुपये आणि सर्व केंद्रांवर गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरुन 6 रुपये इंटरचेंज शुल्क वाढवण्याची परवानगी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अशा फसवणूकीपासून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटरवर आपल्या लाखो ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार SBI ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.


"आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणूक करणार्‍यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत. तुमचा कोणताही संवेदनशील डेटा ऑनलाईन शेअर करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करुन अ‍ॅप डाउनलोड करू नका, अशी सूचना केली आहे." एसबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही ग्राहकाने त्याची वैयक्तिक माहिती जसं की जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी यासारखी माहिती कोणसोबत शेअर करू नका. एसबीआय, आरबीआय, शासकीय कार्यालय, पोलीस, केवायसी प्राधिकरण अशा विविध नावाने फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. एसबीआय किंवा त्याचे कोणतेही प्रतिनिधी तुम्हाला कधीही ईमेल, एसएमएस पाठवत नाही.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

-------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।     https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

रविवार, १३ जून, २०२१

करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : औषधनिर्माणाचे प्रगतिशील क्षेत्र*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 

*करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : औषधनिर्माणाचे प्रगतिशील क्षेत्र*

कोविड १९ संक्रमणाच्या लाटेने अवघ्या जगाला विळख्यात घेतले आणि वैद्यकशास्त्र तसेच त्यास साहाय्यभूत अशा इतर यंत्रणाचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सार्स, इबोलासारख्या संसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावामुळे सामान्य माणसांच्या जनजीवनाची घडी विस्कटून त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत हे आपण पाहिलेच आहे. अशा बिकट काळात जवळजवळ सगळेच उद्योगधंदे ठप्प झाले तेव्हा आरोग्य सुविधा व्यवस्था (हेल्थ केअर सिस्टीम) नुसती खंबीरपणे उभीच नव्हती तर तिला रोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते.

नवीन रोग आला की त्यासाठी नवी उपचार पद्धत, नवी औषधे आणि नव्या प्रतिबंधात्मक उपायांची गरज भासते.

रोगाचे निदान आणि उपचार करणाऱ्या वैद्यकशास्त्राबरोबर अशा वेळी औषध निर्माण शास्त्र (फार्मास्युटिकल सायन्सेस) हे संशोधन आणि निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम करते. अर्थात हे काम काही फक्त याच वेळी (कोविडमुळे) सुरू होते असे नाही. औषध संशोधन आणि निर्मिती ही जगभरात सातत्याने सुरू असते. अस्तित्वात असलेल्या आजारांवर अधिक प्रभावी औषधे, असाध्य मानल्या गेलेल्या रोगांसाठी औषधे, नियमित उपचारांसाठी गरजेची औषधे अशा अनेक स्तरांवर हा उद्योग-व्यवसाय अखंडपणे कार्यरत असतो.

भारतासारख्या प्रगतिशील देशात वैद्यकशास्त्र बऱ्यापैकी प्रगत असूनही फार्मासिस्टना अजूनही महत्त्व मिळताना दिसत नाही, मात्र तरीदेखील औषध निर्माण क्षेत्रात फार्मासिस्ट प्रभुत्व गाजवत आहेत. औषधनिर्मिती क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील ८० टक्के देशांना स्वस्त आणि उत्तम दर्जाची औषधे भारतातून पुरवली जातात. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारतात नवी औषधे विकसित होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र सध्या वापरात असलेल्या औषधांचे उत्पादन करून ती देशभर आणि जगभर पुरविण्याचे काम आपला औषध निर्माण व्यवसाय मोठय़ा प्रमाणात करतो. नवीन औषधाची निर्मिती, त्यासाठीचे संशोधन हे प्रचंड खर्चीक काम आहे. तुलनेने ते आपल्याकडे मर्यादित स्वरूपात का होईना, पण सुरू असते. एकूणच औषध निर्माण शास्त्रातील शिक्षण घेतलेल्या व्यक्तीसाठी करिअरच्या अनेक उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत.


आपल्या देशात औषध निर्माण क्षेत्रात करिअर करण्यासाठी पदविका, बॅचलर्स, मास्टर्स आणि डॉक्टरेट अशी चार स्तरांवर शिक्षणाची सुविधा आहे. प्रत्येक टप्प्यानुसार वेगवेगळ्या करिअरच्या संधी खुल्या होतात. डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून (पीसीआय) औषध विक्रीचा परवाना दिला जातो. तो मिळाल्यावर स्वत:चे औषधाचे दुकान सुरू करता येते किंवा परवानाधारक फार्मासिस्ट इतर खासगी अथवा रुग्णालयांतील औषध दुकानांमध्ये नोकरी करू शकतात.

बॅचलर ऑफ फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून औषधनिर्मितीचा परवाना दिला जातो. तो मिळाल्यावर स्वत:चा औषधनिर्मिती कारखाना उघडता येते अथवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये विविध पदांवर नोकरी करता येते. मास्टर्स आणि डॉक्टरेट पूर्ण करून औषध संशोधन क्षेत्रात करिअर करता येते.

देशात बॅचलर्स ऑफ फार्मसी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी परदेशांतही जाता येते. त्यासाठी त्या त्या देशातील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन मास्टर्स अथवा मास्टर्स प्लस डॉक्टरेटला प्रवेश मिळतो. शिष्यवृत्ती मिळवून अथवा शैक्षणिक कर्ज काढून शैक्षणिक खर्च होऊ शकतो. पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनीमधील नामांकित विद्यापीठांमध्ये स्पेशलायझेशनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

औषधनिर्मिती क्षेत्रात औषध विक्री, औषधनिर्मिती, औषध संशोधन याचबरोबरच विमा, प्रकाशने, नियामक (रेग्युलेटरी), आयात-निर्यात अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी आहेत. त्याबद्दल थोडे विस्ताराने पाहूया.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल 

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

आपल्या सर्वाना माहीत असलेला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा सर्वसाधारणपणे कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे, ती उत्पादने स्थानिक बाजारात उपलब्ध करणे वगैरे स्वरूपाची कामे करतो. जोडीला मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले असेल तर प्रॉडक्ट मॅनेजर, विभागीय मॅनेजपर्यंत पदोन्नती होऊ शकते. याला कल्पक वृत्तीची जोड मिळाली तर जाहिरात क्षेत्रातदेखील वाव मिळू शकतो.

मास्टर्स किंवा डॉक्टरेट केल्यावर मेडिको मार्केटिंगमध्ये नोकरी मिळू शकते. यामध्ये उत्पादन विकसनाची जबाबदारी असते. उत्पादनाचे म्हणजेच औषधांचे आवरण, वेष्टन (पॅकेजिंग), त्यावर काय माहिती असावी या बाबींचा प्रामुख्याने समावेश असतो. त्याचबरोबर डॉक्टरांना उत्पादनांबद्दल कशा प्रकारे माहिती द्यावी, प्रमोशनसाठी स्वरूप, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचे प्रशिक्षण अशा बाबी मेडिको मार्केटिंग विभाग सांभाळतो.

औषधनिर्मिती क्षेत्रातील इतर कामांमध्ये औषध उत्पादन प्रक्रिया, आवरण-वेष्टन (पॅकेजिंग), वितरण आणि साठा व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण (कंट्रोल), गुणवत्तेची खात्री (अश्युअरन्स) अशा विभागांतदेखील नोकरीच्या संधी बॅचलर्स, मास्टर्स शिक्षण घेतल्यावर मिळतात.

त्याचबरोबर विमा कंपन्याकडून आरोग्य विमा घेताना ग्राहकांची आरोग्य तपासणी आणि त्यानुसार संभाव्य धोक्याचा अंदाज बांधून हप्ता ठरवणे, विमा दाव्यामध्ये कागदपत्रांची शहानिशा करणे अशी कामेदेखील मिळू शकतात.


मास्टर्स करताना स्पेशलायझेशनसाठी आपल्या आवडीचा पर्याय निवडता येतो. फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकॉलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल अ‍ॅनालिसिस, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल रिसर्च, फार्माकोग्नोसी इत्यादी विषय असतात. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्याप्रमाणे विषय निवडावा.

1) फार्मास्युटिकल केमेस्ट्री : 

नवीन औषधांवर संशोधन करताना अनेक केमिकल रिअ‍ॅक्शन कराव्या लागतात, नवीन तंत्रज्ञान आणि अद्ययावत सॉफ्टवेअर (कॅड) वापरून हजारो मॉलिक्युलर्सपैकी कोणती औषधी योग्यतेची असतील याची शहानिशा करता येते.

2) फार्माकॉलॉजी : 

कोणतेही औषध मानवी शरीरात गेल्यावर आपले काम कसे करते, शरीरातील कोणत्या घटकांवर औषधाचा काय परिणाम होतो या बाबींचा अभ्यास या शाखेत केला जातो. नवीन औषधे किती गुणकारी आहेत हे आधी प्राण्यांवर प्रयोग करून तपासले जाते त्याला प्रीक्लिनिकल रिसर्च म्हणतात, तेही याच शाखेच्या अखत्यारीत येते.

3) फार्मास्युटिक्स : 

नवीन औषधाचा शोध लागला की ते कोणत्या स्वरूपात वापरल्याने जास्त गुणकारी ठरेल हे या शाखेचे लोक प्रयोग करून ठरवतात. औषध गोळी, कॅप्सूल, द्रव, इंजेक्शन कोणत्या स्वरूपात घेता येईल याचे संशोधन यामध्ये केले जाते. औषध किती काळ टिकेल, त्याची 'स्टॅबिलिटी', 'पॅलॅटिबिलिटी' वाढवण्यासाठी त्यात कोणते पूरक घटक किती प्रमाणात मिसळता येतील याचेदेखील या शाखेत संशोधन होते.

4) कॉस्मेटिकॉलॉजी : 

सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन ही फार्मास्युटिक्स शाखेची उपशाखा असून याही क्षेत्रात भरपूर वाव आहे.

5) फार्मास्युटिकल अ‍ॅनॅलिसिस : 

औषधनिर्मिती तसेच संशोधनाच्या अनेक टप्प्यांत औषधाच्या शुद्धतेची (प्युरिटीची) चाचणी करावी लागते. तसेच मानवी शरीरात औषध कोणत्या अवयवांपर्यंत पोहोचते, शरीरातून औषध कोणत्या प्रकारे बाहेर फेकले जाते याची चाचणी करण्याच्या पद्धती या शाखेत शोधल्या जातात.

6) रेग्युलेटरी अफेअर्स : 

औषध निर्माण क्षेत्र हे मनुष्याच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रावर शासनाचे कठोर र्निबध असतात. औषधनिर्मिती, संशोधन, आयात-निर्यात इत्यादी कामांतील प्रत्येक टप्प्यावर शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि इतर शासकीय प्रक्रिया ही शाखा पाहाते.

7) क्लिनिकल रिसर्च आणि फार्माको व्हिजिलन्स :

 नवीन शोध लागलेली औषधे एकदा का प्राण्यांवरील प्रयोगात गुणकारी ठरली की त्याचे माणसांवर होणारे चांगले-वाईट परिणाम क्लिनिकल चाचण्या करून तपासले जातात. चार ते पाच टप्प्यांत औषधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते. कठोर गुणवत्ता निकषांवर सरस ठरणाऱ्या औषधांना पुढे मार्केटिंगची परवानगी मिळते. अशी परवानगी मिळाल्यानंतरही या औषधांचे काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना याचा दीर्घकाळपर्यंत पडताळा घेतला जातो.

8) फार्माकोग्नोसी : 

या शाखेत वनस्पतींपासून मिळणाऱ्या औषधांवर संशोधन होते. त्यामुळे आयुर्वेदिक, हर्बल औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होतात.

मास्टर्स केल्यानंतर इतर काही आनुषंगिक क्षेत्रांत रोजगार संधी मिळू शकते.

9) न्यूट्रास्युटिक्स : 

न्यूट्रिएंट एनरिच फूड आताशा फार लोकप्रिय होत आहे. कॅल्शियम एनरिच बिस्कीट, आयर्न, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमिन एनरिच फूड सप्लिमेन्ट्स यामध्येदेखील औषध निर्माण क्षेत्रातील मास्टर्सना करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

10) आयपीआर (इंटलेक्टय़ुल प्रॉपर्टी राईट्स)/ पेटंट :

 नवीन औषधांचे पेटंट दाखल करणे, पेटंटना आव्हान देणे तत्सम कामे करणाऱ्या पेटंट कंपनीमध्ये औषध निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज असते.

11) औषधांसंबंधी लिखाण (मेडिकल रायटिंग) : 

गेल्या काही वर्षांत औषध निर्माण क्षेत्रातील उलाढाली वाढल्या असल्याने मेडिकल रायटिंग या क्षेत्रात बराच वाव आहे. नवीन संशोधनाचे शोधनिबंध लिहिणे, नियंत्रकासाठी अहवाल लिहिणे, वैद्यकीय परिषदांमध्ये सादरीकरण करणे अशा कामांचा यामध्ये समावेश होतो.

12) सरकारी नोकरी : 

उद्योगधंद्यांतील कामाचा अनुभव आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) ही सरकारी नोकरी मिळवता येते. औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) हे आपल्या अखत्यारीतील सर्व औषध दुकानांच्या कामकाजावर देखरेख ठेवतात. नवीन दुकानांना परवानगीसाठी तपासणी, औषधांचा काळाबाजार होऊ नये म्हणून दक्षता अशी कामेदखील औषध निरीक्षकांच्या कामाचा भाग असतो.

सरकारी प्रयोगशाळांमध्ये विविध पदांवर नियुक्तीसाठी औषध निर्माण क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवीचा उपयोग होतो. सरकारी रुग्णालयांत 'हॉस्पिटल फार्मासिस्ट' म्हणूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

याबरोबरच गेल्या काही वर्षांत आपल्याकडे खूप मोठय़ा प्रमाणात औषध निर्माण क्षेत्राचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू झाली आहेत. अशा ठिकाणी अध्यापनाच्या संधीदेखील बऱ्याच आहेत. याशिवाय औषध निर्माण शिक्षणाबरोबरच विशेष प्रशिक्षण घेऊन जिनोमिक्स, प्रोटिओनॉमिक्स, एसएएस प्रोग्रामिंग फॉर क्लिनिकल रिसर्च, बायो-स्टॅटिस्टिक्स, बायो-इन्फॉर्मेटिक्स इत्यादी अनेक क्षेत्रांत फार्मासिस्ट उत्तम कामगिरी करू शकतात.

वाढते आयुर्मान, बदलत्या जीवनशैलीमुळे जडणारे रोग, प्रदूषणामुळे होणारे आजार, संसर्गजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव, आरोग्य विम्यामुळे सामान्यांच्याही आवाक्यात आलेल्या उच्च श्रेणीच्या वैद्यकीय सेवासुविधा अशा अनेक कारणांमुळे औषध निर्माणशास्त्र हे दिवसागणिक अधिक प्रगती करत आहे. अशा प्रगतिशील क्षेत्रात येत्या काळात आणखीही नवनवीन रोजगार संधी उपलब्ध होतच राहतील.

भारतात फार्मसीमध्ये शिक्षणाचे चार टप्पे आहेत.

डी. फार्म (डिप्लोमा इन फार्मसी) विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षे. विज्ञान शाखेतून १०+२ (पीसीएम/ पीसीबी) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकतात.

बी. फार्म (बॅचलर ऑफ फार्मसी) विज्ञान शाखेत बारावीनंतर चार वर्षे. बॅचलर ऑफ फार्मसीसाठी त्या-त्या राज्याची प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. महाराष्ट्रात एमएच-सीईटी (महाराष्ट्रकॉमन एंट्रन्स टेस्ट) या परीक्षेत शून्याहून अधिक गुण मिळविणे आवश्यक असते. यात निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते. त्यामुळे शून्यापेक्षा दशांश गुण जास्त मिळाले तरी उमेदवार प्रवेशास पात्र ठरू शकतात.

एम. फार्म (मास्टर ऑफ फार्मसी) बी. फार्मनंतर दोन वर्षे.

पीएच. डी. (डॉक्टरेट इन फार्मसी) मास्टर इन फार्मसीनंतर तीन ते पाच वर्षे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

श्यामच्या आई' पलिकडचे 'हे' साने गुरुजी तुम्हाला माहिती आहेत का?*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 



*'श्यामच्या आई' पलिकडचे 'हे' साने गुरुजी तुम्हाला माहिती आहेत का?*

 साने गुरुजी यांच जीवन

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. 

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.

‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
                                      बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
                                       राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।

या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी नागरिकांवर प्रभाव वाढला होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्या काव्यपंक्ती देखील जप्त केल्या होत्या.

साने गुरुजींचे प्रकाशित साहित्य –

  • अमोल गोष्टी
  • कर्तव्याची हाक
  • कला म्हणजे काय
  • आपण सारे भाऊ भाऊ
  • आस्तिक
  • इस्लामी संस्कृती
  • कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
  • क्रांती
  • गुरुजींच्या गोष्टी
  • गीताहृदय
  • कला आणि इतर निबंध
  • ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
  • गोड गोष्टी
  • गोड शेवट
  • गोष्टीरूप विनोबाजी
  • श्यामची आई (Shyamchi Aai)
  • श्यामची पत्रे
  • सोनसाखळी व इतर कथा
  • स्वप्न आणि सत्य
  • स्वर्गातील माळ
  • सुंदर पत्रे
  • हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
  • साधना – साप्ताहिक
  • सोन्या मारुती
  • रामाचा शेला
  • सती
  • संध्या
  • मानवजातीचा इतिहास
  • ते आपले घर
  • त्रिवेणी
  • धडपडणारी मुले
  • नामदार गोखले- चरित्र
  • विनोबाजी भावे
  • विश्राम
साने गुरुजीकृत काव्यपंक्ती

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-


खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे 
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडविली.

साने गुरुजी यांची मराठी साहित्य

गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.

 महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांचा 11 जूनला स्मृतीदिन आहे. साने गुरुजी यांनी लिहीलेल्या "शामची आई" या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. संस्कारगाथा अस या पुस्तकाच वर्णन करता येईल. कोवळ्या वयातील मुली-मुलांच्या मनात पालकांच्याबद्दल आदरभाव बाळगण्याचे, जातीआधारित अहंकार सोडून देण्याचे, श्रमाची प्रतिष्ठा राखण्याचे, निसर्गाविषयी कृतज्ञभाव जपण्याचे आवश्यक संस्कार या पुस्तकाने रुजवले आहे. एकुणातच समंजस आणि उदारमतवादी नागरिकत्व घडण्यास हे पुस्तक उपयोगी ठरलेले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या पुस्तकामुळेच साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा ठसठशीत बनली. 

आंतरभारतीचे स्वप्न उपस्थितांना समजावून सांगताना साने गुरुजी एकदा म्हणाले होते, माणसाच्या पायात काटा टोचल्यानंतर त्याची वेदना मेंदुमधे जाणवते, डोळ्यातील अश्रुवाटे ती वेदना व्यक्त होते आणि पायातील काटा काढण्यासाठी हात पुढे सरसावतात. पाय, हात, डोळे, मेंदू हे अवयव वेगवेगळे असले तरी वेदनेच्या प्रसंगात ते सर्वजण एकत्र येऊन वेदना सुसह्य करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी एकोप्याने कृती करतात. त्याचप्रमाणे आपण सर्व भारतीय वेगवेगळी भाषा बोलणारे असूत किंवा वेगवेगळी श्रद्धा बाळगणारे असूत आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. एकमेकाच्या अडीअडचणीला उभे राहिले पाहिजे. साने गुरुजींच्या अशा भावनाशील बोलण्याने, लिखाणाने आणि कृतीने साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आणखी ठसठशीत बनली. साने गुरुजींच्या मृत्युनंतर आपण त्यांची हीच मातृह्रदयी प्रतिमा सतत प्रसारित केली. अस म्हणतात की कोणत्याही महान व्यक्तीमत्वाचे अनुयायी त्या महान व्यक्तीच्या जीवन कार्यातील आपल्याला झेपेल आणि रुचेल तेवढाच भाग स्विकारतात आणि तेवढाच भाग सतत सांगत रहातात. साने गुरुजींच्याबद्दलही काहीस असच झाल आहे का? सामाजिक सलोखा आणि परस्पर आदरभाव रुजवण्यासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य महान आहेच पण साने गुरुजींचं जिवितकार्य एवढ्यापुरतच मर्यादित नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला शिकवणं हा सुद्धा एक आवश्यक संस्कार असतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढवय्या वृत्ती साने गुरुजींच्यामधे होती की नव्हती? असेल तर ती पुढे का येत नाही? आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याला पचतील, रुचतील तेवढेच साने गुरुजी स्विकारल्यामुळे असं झालं असेल का?

'चले जाव' आंदोलनातील साने गुरुजी :ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनाच्या ठरावात ब्रिटीशांना "छोडो भारत" असे बजावण्यात आले होते तर हे घडवून आणण्यासाठी भारतीयांसाठी "करा अथवा मरा" चा आदेश होता. साने गुरुजींनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. भूमिगत राहून ब्रिटीशांच्या विरोधात रान उठवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. आपल्या ओजस्वी वाणीने ब्रिटीश राजवटीविरोधात युवती-युवकांच्या मनात अंगार फुलविण्याचे काम साने गुरुजी करत होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवती- युवकांनी चले जाव आंदोलनात स्वतःला झोकून दिले. या आंदोलनादरम्यान साने गुरुजींनी "क्रांतीच्या वाटेवर" ही पुस्तिका लिहीली. बरेच दिवस ही पुस्तिका अप्रकाशित होती. काही वर्षांपुर्वी साधना प्रकाशनाने विशेषांक स्वरुपात ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंसा-अहिंसा याबद्दलचे आपल्या मनातील विचार साने गुरुजींनी या पुस्तिकेत शब्दबध्द केले आहेत. ब्रिटीश राजवटीविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन तरुणी-तरुणांना करताना या पुस्तिकेत साने गुरुजींनी जे लिहीलय त्याचा थोडक्यात आशय असा आहे. काँग्रेस वर्कींग कमीटीच्या ८ आॕगस्ट १९४२ च्या ठरावाद्वारे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आहे. प्रत्येक भारतीयाने उद्यापासून स्वतःला स्वतंत्र नागरिक मानावे व तसा व्यवहार करावा असे मार्गदर्शन म. गांधीजींनी केले आहे. या ठरावानुसार आज भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय भुमीवरील ब्रिटीश राजवट ही परकीय राजवट ठरते. परकीय राजवटीला भारतीय भूमीवरुन घालवून देण्यासाठी आपण जे करत आहोत ते एक प्रकारचे युद्धच ठरते. मानवी जीवन अनमोल आहे. या लढ्यात होता होईल तो जिवीतहानी टाळण्याचाच आपला प्रयत्न असायला हवा आणि तो राहीलच पण परकीय सत्तेविरुद्धच्या युद्धात हिंसा-अहिंसेची चर्चा अप्रस्तुत ठरते. साने गुरुजींच्या या भुमिकेबद्दल चर्चा होऊ शकते. पण बेचाळीसच्या चले जाव आंदोलनातील सहभागातून साने गुरुजींच्यामधील जो लढाऊ देशभक्त आपल्यासमोर येतो तो आपण समजून घेत आहोत का? इतरांना समजावून सांगतो का, हा खरा प्रश्न आहे. पुढे चले जाव आंदोलनात साने गुरुजींना अटक झाली. धुळे आणि नाशिक येथील कारागृहात त्यांना ठेवले होते. आंदोलनात सहभागी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगावीत म्हणून ब्रिटीश पोलीसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. हा मार सहन करण्याची प्रेरणा शामच्या आईच्या आठवणीतूनच साने गुरुजींना मिळाली असणार. त्यांनी मारहाण सहन केली मात्र आपल्या एकाही सहकाऱ्याचे नाव त्यांनी स्वतःच्या तोंडातून बाहेर पडू दिले नाही. मातृह्रदयी साने गुरुजींचा अशा प्रसंगातला निर्धारही तितकाच कणखर होता.

 शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण :साने गुरुजींच्यामधील संघटन कौशल्य खऱ्या अर्थाने नजरेत भरले ते काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाच्या वेळी. ग्रामीण भागात होत असलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी साने गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक दल उभारले होते. यातूनच राष्ट्र सेवा दलाची संकल्पना पुढे आली. ग्रामीण भागात होत असलेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भारताचे विविध प्रश्न काँग्रेसच्या अजेंड्यावर आणण्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. शेतकरी व कामकरी समुहांनी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे याकरिता गुरुजींनी खानदेश आणि लगतचा नाशिकपर्यंतचा भाग पिंजून काढला

आता उठवू सारे रान,आता पेटवू सारे रान,शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,कामकऱ्यांच्या राज्यासाठी,लावू पणाला प्राण!

हे गाणं गुरुजींनी याच काळात आणि याच कारणासाठी लिहीलेलं आहे. भारतातला शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतीउद्योग प्रचंड जोखमीचा बनलाय. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करत हजारो शेतकरी ऊन, पाऊस, थंडीत दिल्लीच्या सिमेवर तळ ठोकून आवाज उठवत आहेत. सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असुनही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही. सरकारची ही असंवेदनशीला निष्क्रीयता निषेधार्ह आहे. अशावेळी साने गुरुजींच्या या गाण्याने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुली-मुलांनी प्रेरणा घ्यायला हवी. शासनाची शेती आणि शेतकरीविरोधी धोरणे बदलवण्यासाठी गुरुजींचे हे गाणे पुन्हा एकदा या देशातील तरुणी आणि तरुणांच्या ओठावर यायला हवे.प्रताप मिलच्या कामगारांचा लढा :अंमळनेर येथील प्रताप मिलच्या कामगारांचा संप साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म. गांधीजींचे शिष्य असणारे साने गुरुजी गांधीजींच्याच भाषेत म्हणाले, कारखानदारांनी, विश्वस्तवृत्तीने वागले पाहिजे. उत्पादनात कामगारांच्या घामाचाही हिस्सा असतोच. कामगाराला आणि कामगारांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. संपकरी कामगारांसमोर बोलताना साने गुरुजींनी कामगारांच्या घामाची चोरी आणि कारखाना मालकाची लोभी वृत्ती याबाबत टिकास्त्र सोडले होते. हा संप यशस्वी झाला आणि प्रताप मिलच्या कामगारांना न्याय मिळाला. 

आज कामगार कायदे कमकुवत केले जात आहेत. काॕन्ट्रॕक्ट लेबर नावाच्या राक्षसानं कामगारांच्या न्याय्य अधिकारांना सुरुंग लावलाय. इथेही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने कामगार कायद्यात घातक बदल करुन कामगारांनी लढून मिळवलेले अधिकार हिरावून घेण्याचं काम चालवलय. कोरोनाच्या निमित्ताने आलेल्या लॉकडाऊनमुळे कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. व्यवस्था म्हणून आपल्याला सर्वांनाच आपली लाज वाटावी इतकी मजूरशक्तीची झालेली परवड जगाने पाहिली. तळात दडपलेलं विषमतेचं भयाण वास्तव कोरोनाच्या निमीत्ताने पृष्ठभागावर आलं. अशावेळी कामगारांच्या घामाची चोरी होऊ न देण्यासाठी, त्यांना सन्मानाने व समाधानाने जगता यावं यासाठी संविधानाच्या, कायद्याच्या कक्षेत राहून आपापल्या परीने काहीना काही कृती करण्याचं बळ साने गुरुजींच्या स्मृतीतून आपल्याला मिळायला हवं.

समाजातील जातिभेद, दलित लोकांना मिळणारी वागणूक, अस्पृश्यता या सारख्या अनेक रूढी व परंपराना साने गुरुजी यांनी कडाडून विरोध केला.

साने गुरुजी मातृह्रदयी होते. भावनाशील होते. आणि त्याचबरोबर लढवय्ये सुद्धा होते. खरे तर ज्याच्या मनातील संवेदनशीलता जागी आहे आणि ज्याच्या काळजातील भावना अद्याप थिजलेल्या नसतात अशी माणसेच नवनिर्माणकारी संघर्षात स्वतःला झोकून देवू शकतात. आज ११ जूनला साने गुरुजींच्या स्मृतीदिनीखरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावेअस सांगत वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींची आठवण तर काढुयाच आणि त्याचबरोबर शेतकरी, कामगार आणि शोषित जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी ठोस कृती करणाऱ्या, निर्धाराने संघर्ष करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींनाही अभिवादन करुया....

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।     https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*शिक्षणाचा अधिकार कायदा' (RTE)'अंतर्गत मोफत शाळा प्रवेशास सुरुवात*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 

*शिक्षणाचा अधिकार कायदा' ( RTE ) अंतर्गत मोफत शाळा प्रवेशास सुरुवात*

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९' मधील कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली आहे.

त्यानुसार सन २०२१-२२ या वर्षाकरीता दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी 'लॉटरी' काढण्यात आली.

'लॉटरी' द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ११ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांची 'लॉटरी' द्वारे निवड झाली असेल, त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश ३० जून २०२१ पूर्वी निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे का? तसे नसेल तर पॅनला तातडीने आधार कार्डशी लिंक करा कारण आता तारीख वाढविण्यात येणार नाही आणि तुम्हाला दंड भरावा लागेल. हे लक्षात घेता आता बँक आपल्या ग्राहकांना सतर्कतेचा मेसेज पाठवत आहे जेणेकरुन ग्राहक 30 जूनपूर्वी पॅनबरोबर आधार लिंक करू शकतील. वास्तविक, आयकर विभागाने पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख म्हणून 30 जून 2021 निश्चित केले आहे. 30 जूनपर्यंत आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यासाठी  संपर्क करा ...संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419


4) पालकांनी प्रवेशाकरीता घेऊन जाण्याची कागदपत्रेः

- प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.

- 'आर. टी. ई.' पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर 'click' करुन 'हमीपत्र' आणि 'ऍलोटमेंट लेटर' (Allotment Letter) ची प्रिन्ट काढून शाळेत घेऊन जावे.

5) फक्त निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांनीच 'Allotment Letter' ची प्रिन्ट काढावी.

6) निवड यादीतील बालकांच्या पालकांना 'लॉकडाऊन' मुळे / बाहेरगांवी असल्याने / किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि 'whatsapp / email' किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करुन आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

7) विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधीत पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

8) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे, त्याच पत्त्यावर 'Google location' मध्ये 'red' बलून दर्शविणे आवश्यक आहे. 'Location' आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.

9) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरुन (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

10) निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादी (Waiting List) मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर सूचना 'आर. टी. ई.' पोर्टलवर दिल्या जातील.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...