हा ब्लॉग शोधा

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

प्रत्येक पालकांसाठी महत्वाचे! मुली शाळेतून घरी आल्याबरोबर विचारा हे प्रश्न

 


प्रत्येक पालकांसाठी महत्वाचे! मुली शाळेतून घरी आल्याबरोबर विचारा हे प्रश्न

प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलींना शाळेत पाठवताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यासह मुली शाळेतून घरी आल्यावर दररोज त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारलेच पाहिजेत.

आजचा दिवस कसा होता

मुली शाळेतून घरी आल्यावर त्यांचा आजचा दिवस कसा होता असं त्यांना विचारा. तसेच मुलींची बॅग तपासा. मुलींना हा प्रश्न अगदी प्रेमाणे आणि आपुलकीने विचारा. यामुळे दिवसभरात त्यांच्याबरोबर काय काय झाले हे तुम्हाला समजेल.

शाळेत काय शिकवले?

शाळेत आपल्या मुलींना काय काय शिकवले जाते हे त्यांना विचारा. आज मुलींना काय अभ्यास दिला, त्यांना कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली हे विचारा. त्याने मुलींच्या बुद्धीत आणि ज्ञानात काय भर पडली आहे हे तुम्हाला समजेल.

शाळेतून व पालका कडून पोरींना गुड टच आणि बॅड टचची माहिती मिळाली पाहिजे.


कोणते शिक्षक ओरडले का?

शाळेत जाण्यासाठी अनेक लहान मुलांना कंटाळा येतो. तुमच्या मुलांना सुद्धा कंटाळा येत असेल किंवा मुली शाळेत जात नसतील तर त्यांना कोणते शिक्षक ओरडतात का? हा प्रश्न नक्की विचारा. तसेच का ओरडतात आणि ओरडताना ते काय बोलतात हे देखील विचारा.


शाळेत कुणी त्रास देतं का?

मुली सतत रडत असतील आणि शाळेत पाठवू नये म्हणून गोंधळ करत असतील तर त्यांना कोणी त्रास देत आहे का हे विचारून घ्या. मुली त्याची उत्तरे निट देत नसतील घाबरत असतील तर त्यांना चॉकलेट द्या आणि प्रेमाणे त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्या.

वॉशरुमला जाताना सोबत कोण आलं होतं

प्रत्येक शाळेत लहान मुलींना वॉशरुमला जाताना शाळेतील शिपाई बाई सोबत असतात. त्यामुळे तुमच्या मुली शाळेत वॉशरुमला जातात तेव्हा त्यांच्यासोबत कोण असतं हे त्यांना विचारून घ्या. जर त्यांनी कोणत्या पुरुषाचे किंवा मुलाचे नाव घेतले तर शाळेत याबद्दल चौकशी करून तक्रार करा. तसेच महिला कर्मचाऱ्यांना मुलींसोबत वॉशरुमला पाठण्यास सांगा.

-------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा? तुम्हाला माहिती आहे का? (POCSO)

 

अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा? तुम्हाला माहिती आहे का? (POCSO)

महाराष्ट्रातल्या बदलापूर इथल्या एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. शाळेतल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन्ही मुलींचा लैंगिक छळ केला. ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली.

अशा घटनांपासून अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा (POCSO) आणण्यात आला आहे. काही वेळा या कायद्याचा गैरवापर होत असल्याच्याही बातम्या येतात. तरीदेखील लैंगिक छळापासून संरक्षणासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे.


पॉक्सो कायद्याचं स्वरूप कसं आहे?

'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अॅक्ट'

 असं पॉक्सो कायद्याचं पूर्ण नाव आहे. याला मराठीत 

बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा असं म्हणतात. 

हा कायदा 2012मध्ये करण्यात आला आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन (18 वर्षांखालच्या) मुला-मुलींना संरक्षण प्रदान करणं, हा कायद्याचा मूळ हेतू आहे. पॉक्सोअंतर्गत दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. पूर्वी या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद नव्हती. नंतर त्यात फाशी आणि जन्मठेपेसारखी शिक्षाही समाविष्ट करण्यात आली.


महिलांनी एकट्याने प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिपा आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/08/blog-post_21.html

पॉक्सो कायद्यातल्या शिक्षेच्या तरतुदी

पॉक्सो कायद्यात विविध प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये दोषीला 20 वर्षं तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो.

1) अल्पवयीन व्यक्तीचा पोर्नोग्राफीसाठी वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

2) एखाद्या लहान मुलाचा पोर्नोग्राफीसाठी दुसऱ्यांदा वापर करताना पकडलं गेलं, तर सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड भरावा लागू शकतो.

3) लहान मुलांचे अश्लील फोटो जमा केल्यास किंवा ते इतरांशी शेअर केल्यास शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये, दोषीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.

4) 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास 20 वर्षांच्या तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

5) अशा प्रकरणात अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोषीला फाशीची शिक्षादेखील होऊ शकते.


कोण दोषी असू शकतं?

पॉक्सो कायद्यांतर्गत फक्त पुरुषांनाच नाही तर एखाद्या महिलेलाही शिक्षा होऊ शकते. लैंगिक गुन्हे केल्याप्रकरणी एखादी महिला दोषी आढळल्यास तिला पुरुषासारखीच शिक्षा दिली जाते. अल्पवयीन मुलांच्या आणि मुलींच्या लैंगिक छळाच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. गुन्हा करणाऱ्या प्रत्येकाला या कायद्यांतर्गत समान शिक्षेची तरतूद आहे.


-------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

महिलांनी एकट्याने प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिपा आहेत:

 

महिलांनी एकट्याने प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिपा आहेत:

गेल्या काही दिवसांपासून महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षा हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

एकट्याने प्रवास करताना महिलांन काही बाबींची काळजी घेण्याची आवश्यकता असते, महिलांनी प्रवासाला निघताना काय काळजी घ्यावी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

बॅगमध्ये 'हे' ठेवाच

घरातून बाहेर पडताना आपल्या सेफ्टीसाठी आवश्यक असे सर्व साहित्य बॅगेत ठेवा, यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपला फोन, चार्जर, पॉवर बँक, इअरबड्स यासह २-३ वीमेन सेफ्टी डिव्हाइस देखील बॅगेत कॅरी करा.

नम्रपणे कपडे घाला: स्थानिक ड्रेस कोड आणि रीतिरिवाजांचा आदर करा.

फोनमध्ये कायम चार्जिंग ठेवा

घरातून बाहेर पडतानाचा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचा फोन कायम चार्ज असेल. वाईट काळात हे खूप महत्वाचे शस्त्र ठरू शकतो. यामध्ये इमर्जन्सी नंबर म्हणून आपल्या जवळच्या लोकांचे नंबर क्वीक डायलवर ठेवा.

सेफ्टी डिव्हाइस कॅरी करा

आजकाल मार्केटमध्ये वीमेन सेफ्टीसंबंधी असंख्य डिव्हाइस उपलब्ध आहेत, यामधअये शॉकिंग टॉर्च, ई-अलार्म साउंड ग्रेनेज, विंडो ब्रेकर कटर, मिनी पेपर स्प्रे असे कुठलेही 2-3 डिव्हाइस सोबत असू द्यावेत.

सेफ्टी अॅप

महिलांनी आपल्या फोनमध्ये वीमेन सेफ्टी अॅप नक्की इंस्टॉल करा जेणेकरून गरज पडल्यानंतर तत्काळ यांची मदत घेता येईल.

सुरक्षा ॲपचा विचार करा: आपत्कालीन मदतीसाठी bSafe किंवा Life360 सारखे ॲप्स डाउनलोड करा.


रात्री सुरक्षित राहा: अंधुक प्रकाश असलेल्या किंवा वेगळ्या ठिकाणी एकटे फिरणे टाळा

लाइव्ह लोकेशन शेअर करा

घरातून बाहेर पडताना व्हॉट्सअॅप वर आपले लाइव्ह लोकेशन एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवून ठेवा, जेणेकरून तो तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला ट्रॅक करेल.

कनेक्टेड रहा: तुमचा प्रवास कार्यक्रम कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि नियमितपणे संपर्कात रहा.

वाहनाचा नंबर पाठवून ठेवा

जर तुम्ही एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असाल तर वाहनाचा नंबर कोणालातरी पाठवून ठेवा, तुम्ही शॉर्ट व्हिडीओ नोट देखील पाठवू शकता.

आपत्कालीन संपर्क सुलभ ठेवा: स्थानिक पोलिस आणि दूतावास यांसारखे महत्त्वाचे क्रमांक जतन करा.

फेक अभिनय करा.

जर तुम्हाला खूपच असुरक्षित वाटू लागलं तर लगेच एखाद्या व्यक्तीला कॉल केल्याचा अभिनय करू शकात, समोरचा व्यक्ती तुम्हाला भेटायला येतोय असं भासवा. फारच गरज वाटली तर मोठ्याने बोलताबोलता पोलिस स्टेशनमध्ये तुमच्या जवळचा कोणीतरी काम करत असल्याचंही तुम्ही सांगू शकता.

सावध रहा: तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि अपरिचित परिसरात सतर्क रहा.


लक्षात ठेवा, एकट्याने प्रवास करणे स्त्रियांसाठी आश्चर्यकारकपणे सक्षम बनू शकते. 

काही मूलभूत खबरदारी आणि जागरुकतेने, तुम्ही सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करू शकता!

भारतातील प्रत्येक महिलेला माहिती असावेत 'हे' हेल्पलाईन नंबर; आजच सेव्ह करून ठेवा

गरज पडल्यास मदतीसाठी वेळ वाया जाणार नाही. या क्रमांकांवर फोन करून तक्रार नोंदवता येईल.

घरगुती छळाला बळी पडलेल्या महिला राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करू शकतात.

घटनेची माहिती जर पोलिसांना घटनेची माहिती द्यायची असेल तर 100 आणि 112 या क्रमांकावर कॉल करा. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांक 011 - 26942369 26944754 आहेत.

रेल्वे सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक 182 वर कॉल करू शकतात.

दिल्ली महिला आयोगाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. DCW ला 011-23378044, 23378317, 23370597 वर कॉल करता येईल.

तुमच्या हक्कांसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाशी 011-23385368, 9810298900 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

अखिल भारतीय महिला कॉन्फरेंसशी 011-43389100, 011-43389101 आणि मुंबईतील स्नेहा एनजीओशी 98330 52684 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

महिलांच्या संरक्षणासाठी असणारे कायदे समजून घ्या.

महिलांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि त्यांचे संरक्षण करणारे कायदे जाणून घेणे आवश्यक आहे.

कृपया लक्षात घ्या की देशानुसार कायदे बदलतात, त्यामुळे स्थानिक कायदे आणि संरक्षणांशी परिचित होणे महत्त्वाचे आहे.  तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास, मोकळ्या मनाने विचारा!


-------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे, राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राष्ट्रपती राजवट लागु झाल्यास राज्यात काय होतील बदल

 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे, राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राष्ट्रपती राजवट लागु झाल्यास राज्यात काय होतील बदल

निवडणुकांना उशीर झाल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काय बदल होतात ते जाणून घेऊया.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर 6 महिन्यांत निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच 26 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपेल, तेव्हा त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. 


कधी लागू होऊ शकते राष्ट्रपती राजवट ?

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद घटनेच्या कलम 355 आणि कलम 356 मध्ये आहे. 

1) कलम 355 म्हणते की केंद्र सरकारने राज्यांचे बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून संरक्षण केले पाहिजे. राज्य सरकारे राज्यघटनेनुसार चालत आहेत, याची केंद्र सरकारने काळजी घ्यावी. 

2) कलम 356 अन्वये, राज्यातील घटनात्मक यंत्रणा बिघडल्यास राज्य सरकारचे अधिकार ताब्यात घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे.

वरील दोन कलमे एका राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करण्यासाठी एकत्र वापरली जातात. राज्य सरकार घटनेनुसार काम करू शकले नाही, तर राज्यपाल याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवू शकतात. राज्यपालांच्या शिफारशीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर होतात काय बदल?

राष्ट्रपती राजवटीची विशेष बाब म्हणजे 

1) या काळात राज्यातील रहिवाशांचे मूलभूत अधिकार नाकारता येत नाहीत. 

2) या प्रणालीमध्ये राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ विसर्जित करतात. 

3) राज्य सरकारची कामे आणि अधिकार राष्ट्रपतींकडे येतात.

4) याशिवाय राष्ट्रपतींची इच्छा असेल, तर ते राज्य विधिमंडळाचे अधिकार संसदेद्वारे वापरण्यात येतील हेही घोषित करू शकतात. 

5) यामुळे संसद स्वतः राज्याचे विधेयक म्हणून काम करते. अशा स्थितीत अर्थसंकल्पाचा प्रस्तावही संसदेत मंजूर होतो.

किती दिवसांसाठी लागू केली जाऊ शकते राष्ट्रपती राजवट ?

राष्ट्रपती राजवटीच्या तरतुदींमुळे केंद्र सरकार कोणत्याही असामान्य परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाऊ शकते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी (लोकसभा आणि राज्यसभा) याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यावेळी लोकसभा विसर्जित झाली, तर ही व्यवस्था कायम ठेवण्यासाठी राज्यसभेत बहुमत मिळवावे लागते. मग तिथेही लोकसभा स्थापन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत मान्यता घेणे आवश्यक आहे. दोन्ही सभागृहांची संमती असेल तर राष्ट्रपती राजवट किमान 6-6 महिने ते कमाल 3 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.

---------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांक जारी, पोर्टलची सुविधाही सुरू

 

मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांक जारी, पोर्टलची सुविधाही सुरू

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

100 टक्के मोफत शिक्षण

वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे. 


या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केला आहे. 

ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर 

आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा, 

ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत कार्यरत आहे. या हेल्पलाईनचा उपयोग करावा,

या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov. in पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

राज्यातील शासकीय महाविद्यालये, 

शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, 

अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने/सार्वजनिक विद्यापिठे, 

शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे 100 टक्के मोफत करण्यात आले आहे.


शैक्षणिक वर्ष सन 2024-25 व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे, सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.

मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे,

या योजनेचा अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील Grieviance Section मध्ये नोंद करावी. 

या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in

उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in

तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://www.dtemaharashtra.gov.in

कला संचालनालयाचे https://doa.maharashtra. gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

---------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

विद्यार्थ्यांना सहजगत्या शैक्षणिक कर्ज उपलब्ध सोबत अनुदान पण मिळते

 


विद्यार्थ्यांना सहजगत्या शैक्षणिक कर्ज उपलब्ध सोबत अनुदान पण मिळते

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

संतोष साळवे - 7900094419

परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याकडे आणि त्यानंतर परदेशातच राहण्याकडे देखील आजच्या तरुणाईचा कल वाढलेला दिसतो. गरिबातल्या गरीब पालकांपासून ते श्रीमंतातल्या श्रीमंत पालकांना आपली मुले चांगली शिकावी, असेच वाटते.

शिक्षणासाठी आवश्यक खर्च करावाच लागतो. हा खर्च मिळणार्‍या उत्पन्नातून करणे सर्वांना परवडतेच असे नाही. अशा वेळेला शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पालकांकडे कोणताही पर्याय उरत नाही.

हल्लीचे पालक कसाबसा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा खर्च भागवू शकतात. मात्र, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च बर्‍याचदा मध्यमवर्गीय व गरीब पालकांना परवडत नाही. आपले मुल पैशाअभावी शिक्षणाशिवाय राहावे, असे कोणत्याही पालकांना वाटत नाही. 

पाल्याला चांगले गुण मिळाले, तरी सरकारी तसेच अनुदानित शिक्षण संस्थेत कमालीची स्पर्धा असल्याने, प्रवेश मिळणे तसे कठीणच. त्यामुळे खासगी विनाअनुदानित संस्थेत प्रवेश घेणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणचे एकूण शुल्क सरासरी किंवा अनुदानित संस्थेतील शुल्काच्या तुलनेत खूपच जास्त असते. याचा अनुभव वैद्यकीय, एमबीए, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर वगैरे शिक्षण घेणार्‍यांना येतोच. या परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेऊन आपल्या पाल्याचे शिक्षण पूर्ण करावे लागते.


शैक्षणिक कर्ज सहजगत्या उपलब्ध व्हावे, यासाठी रिझर्व्हं बँकेने सरकारी, खासगी सहकारी बँकांना काही मार्गदर्शन देऊन अशा कर्जांस प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना सहज कर्ज मिळावे,

ज्या बँका आपला अर्ज तत्त्वत मंजूर करतात, त्या याबाबत आपल्याला आपण दिलेल्या ई-मेल आयडीवर प्रतिसाद कळवतात. या तत्वतः मंजुरीमध्ये प्रामुख्याने कर्जाची रक्कम, व्याजाचा दर, परतफेडीची मुदत ईएमआय यांचा उल्लेख असतो. तत्वतः मंजुरी दिलेल्या बँकांपैकी ज्या बँकेचे कर्ज घेणे आपल्याला फायदेशीर वाटते, त्या बँकेकडे आवश्वक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सात ते आठ दिवसांत अशा कर्जाला मंजुरी मिळते व त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, तारण असल्यास त्या तारणाची कायदेशीरदृष्ट्या पूर्तता करावी लागते. 

यानंतर सुरुवातीच्या आवश्यक त्या रकमेचे कर्ज वितरण केले जाते. 'कर्जमागणी' या पोर्टलमार्फतच केली पाहिजे असे नाही. तुम्हाला सोयीच्या वाटणार्‍या कोणत्याही बँकेकडे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करु शकता. पण, 'विद्यालक्ष्मी' पोर्टलवर मात्र ऑनलाईनच अर्ज करावा लागतो.

कर्जासाठी नियम

कर्जदार भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय (NRI), झजख (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन-भारतीय वंशाची व्यक्ती) किंवा जउख (ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया) असणे आवश्यक असते. 

  • कर्ज पदवीपूर्व, - Ioan undergraduate, 
  • पदव्युत्तर,- postgraduateवै
  • द्यकीय,- medical, 
  • अभियांत्रिकी,- engineering
  • स्थापनविशारद,- Founder
  • व्यवस्थापन पशुवैद्यकीय,- management veterinary, 
  • कायदेशिक्षण - Legal education 
  • सीए,- CA
  • सीएस,-CS1
  • आयसीडब्ल्यूए -  ICWA
  • सीएफए - CFA
  • पायलट प्रशिक्षण,- pilot training, 
  • एमएम - MM
  • टेक्निकल डिप्लोमा कोर्सेस,- Technical Diploma Courses, 
  • व्यवसायाभिमुख कोर्सेस - Business Oriented Courses 

ज्यांचा कालवधी सहा महिन्यांपेक्षा जास्त आहे, या आणि यांसारख्या शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते. देशात शिकणार्‍यांना चार लाख ते 10 लाख रुपये, तर परदेशात शिकणार्‍यांना 10 ते 30 लाख रुपये शिक्षणाचा खर्च पाहून या रकमेत वाढही केली जाते. काही बँका 50 लाख ते 1 कोटीपर्यंतही कर्ज देतात.

7 लाख, 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जास तारण द्यावे लागत नाही. त्यापुढील रकमेच्या कर्जासाठी 100 टक्के भरेल इतके तारण द्यावे लागते. हे तारण जागेचे मॉर्गेज, शेअर, बँक एफडी, सोने अशा स्वरुपात चालते. मॉडेल एज्युकेशन लोन स्कीम 2021 नुसार, 7 लाख, 50 हजार रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जाचा समावेश 'क्रेडिट गॅरेंटी फंड फॉर एज्युकेशन लोन' होत असल्याने बँकांची जोखीम कमी होते. त्यामुळे असे कर्ज बँका सहज देतात. 

  • शैक्षणिक शुल्क, 
  • परीक्षाशुल्क, 
  • पुस्तके, 
  • जर्नल्स, 
  • लॅपटॉप आवश्यक उपकरणे, 
  • वसतिगृहाचा खर्च, 
  • विमा हप्ता, 
  • परदेशी शिक्षणासाठी जाताना होणारा विमानाचा खर्च 

यांचाही या कर्जात समावेश असतो. या एकूण खर्चानुसार कर्जाची रक्कम ठरविली जाते. या कर्जाचे व्याजाचे दर प्रत्येक बँकेचे वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरात फार फरक नसतो. पाव टक्का, अर्धा टक्का इतकाच फरक असतो. बहुतेक बँका विद्यार्थिनींना अर्धा टक्का कमी व्याज आकारतात. काही बँका विशेष प्राविण्य असणार्‍या विद्यार्थ्यांना कमी दराने व्याज आकारतात. 


कर्जाचा कालावधी

शिक्षणाचा कालावधी अधिक एक वर्षाचा मोरॅटोरियम कालावधी आणि त्यानंतर पुढील 15 वर्षांत कर्जाची परतफेड करावी लागते. कर्ज रकमेइतकी विमा पॉलिसी बँकेत 'असाईन' करावी लागते.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील कर्जमागणी अर्ज, 
  • पॅनकार्ड, 
  • आधारकार्डची सेल्फ अटेस्टेड फोटो(झेरॉक्स) प्रत, 
  • नुकताच काढलेला फोटो, 
  • उत्पन्नाचा दाखला, 
  • ज्या संस्थेत शिक्षणासाठी प्रवेश घेणार असाल त्या संस्थेचे पत्र आणि एकूण खर्चाचा तपशील,
  • आधीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे तारण द्यावे लागत असल्यास त्याचा तपशील आणि त्याची बाजारभावाने असणारी किंमत याबाबतचे प्रमाणपत्र,
  •  स्थावर मालमत्ता असल्यास सर्व रिपोर्ट, 
  • टायटल डीडच्या प्रती, 
  • पालकांच्या बॅँक खात्याचे सहा महिन्यांचे स्टेटमेंट, पालकांच्या पॅनकार्ड, 
  • आधारकार्डाची सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी, 
  • नुकताच काढलेला फोटो इत्यादी. कारण, या कर्जास पालक सहकर्जदार असतात.


अनुदान

शैक्षणिक कर्जाला तीन प्रकारची इंटरेस्ट सबसिडी (व्याज अनुदान) मिळते.

इंटरेस्ट सबसिडी

विद्यार्थ्याच्या पालकांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 4 लाख, 50 हजार रुपयांच्या आत असेल, तर हे अनुदान दिले जाते. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत ते दिले जाते. 'शिक्षणाचा कालावधी अधिक एक वर्ष' या काळात जे व्याज आकारले जाते, त्याची परतफेड या अनुदानातून बँकेस केली जाते.

पढो प्रदेश इंटरेस्ट सबसिडी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या उपदेशाने ही सबसिडी दिली जाते. यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्याने परदेशात एमएस, एमफील किंवा पीएचडीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मिळून वार्षिक उत्पन्न रुपये सहा लाखांच्या आत असले पाहिजे. ही इंटरेस्ट सबसिडीसुद्धा मोरॅटोरियमच्या काळापुरतीच असून कर्जाची परतफेड सुरू झाल्यावर ती बंद होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी- 

'ओबीसी' आणि 'ईबीसी' श्रेणीतील विद्यार्थ्यांना परदेशी उच्चशिक्षण घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी दिली जाते. यासाठी ओबीसी/ईबीसी श्रेणीतील विद्यार्थ्याने परदेशात 'एमएस', 'एमफील' किंवा 'पीएचडी'सारखे शिक्षण घेणे आवश्यक आहे. 'ओबीसी' विद्यार्थ्याचे व पालकांचे मिळून वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत, तर 'ईबीसी' विद्यार्थ्याचे व पालकांचे मिळून वार्षिक उत्पन्न रु. अडीच लाखांच्या आत असले पाहिजे. ही सबसिडीदेखील मोरॅटोरियम काळातच मिळते. 


शिक्षण मध्येच सोडल्यास किंवा विद्यार्थ्यास गैरवर्तनामुळे काढून टाकल्यास किंवा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, इंटरेस्ट सबसिडी बंद केली जाते. मात्र, आजारपणामुळे विद्यार्थी गैरहजर असेल, तर आणि तशा आशयाचे वैद्यकीय अधिकार्‍याचे सर्टिफिकेट असेल, तर सबसिडी चालू राहते. सबसिडीसाठी सार्वजनिक उद्योगातील कॅनरा बँकेची 'नोडल एजन्सी' म्हणून नियुक्त केली असून, बँकांना अधिक सबसिडी दावे कॅनरा बँकेकडे पाठवावे लागतात. कर्ज नॉन शेड्युल बँक किंवा पतपेढीकडून घेतले असेल, तर 'इंटरेस्ट सबसिडी' मिळत नाही.

जुन्या करप्रणालीत प्राप्तिकर कायद्याच्या 'कलम 80 (ई)'नुसार स्वतःसाठी, पत्नीसाठी किंवा मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास, कर्जफेडीस सुरुवात झाल्यापासून ते पुढे आठ वर्षे किंवा कर्ज फिटेपर्यंत यातील जो कालावधी कमी असेल, त्या कालावधीसाठी शैक्षणिक कर्जावरील संपूर्ण व्याज करपात्री रकमेतून वजावटीस पात्र असते. या रकमेला कोणतीही कमाल मर्यादा नाही. मात्र, ही सवलत पालकांसाठी फक्त दोन मुलांनांच मिळते. ही सवलत मिळण्यासाठी कर्ज, बँक, वित्तीय संस्था किंवा मान्यताप्राप्त धर्मादाय संस्था यांच्याकडून पैसे घेतले असले पाहिजेत. नातेवाईक किंवा मित्रांकडून कर्ज घेतल्यास ही प्राप्तिकर सवलत मिळत नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

संतोष साळवे - 7900094419

---------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

HDFC Bank Scholarship ; एचडीएफसी बँक इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती देणार, अर्ज सुरू



HDFC Bank Scholarship ; एचडीएफसी बँक इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती देणार, अर्ज सुरू

एचडीएफसी बँक परिवर्तन शिष्यवृत्ती योजनेची नोटीस एचडीएफसी बँकेने जारी केली आहे, या योजनेअंतर्गत, इयत्ता 1 ते 12 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक 75000 रुपये शिष्यवृत्ती देईल, या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

एचडीएफसी बँकेच्या या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे. 


वास्तविक, गरीब कुटुंबातील मुलांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी बँकेने ही योजना सुरू केली आहे ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल.

  • एचडीएफसी बँक शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता
  • एचडीएफसी बँकेच्या या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत जसे – 
  • विद्यार्थ्याने 55% गुणांसह पूर्वीचा वर्ग उत्तीर्ण केलेला असावा आणि 
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

HDFC बँक शिष्यवृत्ती योजनेचे फायदे

एचडीएफसी बँकेच्या या योजनेंतर्गत, 

1) इयत्ता 1 ते 6 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपयांची शिष्यवृत्ती, 

2) इयत्ता 7 ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या किंवा आयटीआय, पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांना 18,000 रुपयांची शिष्यवृत्ती 

3) पदवी अभ्यासक्रमासाठी 30,000 रुपये

4) पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 50,000 रुपये

5) व्यावसायिक पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 75,000 रुपये




HDFC शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

बँकेच्या या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे –

1) फोटो (पासपोर्ट आकार)

2) मागील वर्ग गुणपत्रिका

3) आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स

4) चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (उदा. शुल्काची पावती, प्रवेशपत्र, संस्था ओळखपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र)

5) बँक पासबुक

6) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (खालील 3 पर्यायांपैकी कोणताही एक)

ग्रामपंचायत/वॉर्ड कौन्सिलर/सरपंच यांनी जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र

एसडीएम/एससीओ/तहसीलदार यांनी जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र

प्रतिज्ञापत्र

7) कौटुंबिक/वैयक्तिक त्रासाचा पुरावा (लागू असल्यास)

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.



वेगवेगळ्या संकटाच्या प्रकरणांसाठी कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे?

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...