प्रत्येक पालकांसाठी महत्वाचे! मुली शाळेतून घरी आल्याबरोबर विचारा हे प्रश्न
प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलींना शाळेत पाठवताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यासह मुली शाळेतून घरी आल्यावर दररोज त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारलेच पाहिजेत.
आजचा दिवस कसा होता
मुली शाळेतून घरी आल्यावर त्यांचा आजचा दिवस कसा होता असं त्यांना विचारा. तसेच मुलींची बॅग तपासा. मुलींना हा प्रश्न अगदी प्रेमाणे आणि आपुलकीने विचारा. यामुळे दिवसभरात त्यांच्याबरोबर काय काय झाले हे तुम्हाला समजेल.
शाळेत काय शिकवले?
शाळेत आपल्या मुलींना काय काय शिकवले जाते हे त्यांना विचारा. आज मुलींना काय अभ्यास दिला, त्यांना कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली हे विचारा. त्याने मुलींच्या बुद्धीत आणि ज्ञानात काय भर पडली आहे हे तुम्हाला समजेल.
शाळेतून व पालका कडून पोरींना गुड टच आणि बॅड टचची माहिती मिळाली पाहिजे.
कोणते शिक्षक ओरडले का?
शाळेत जाण्यासाठी अनेक लहान मुलांना कंटाळा येतो. तुमच्या मुलांना सुद्धा कंटाळा येत असेल किंवा मुली शाळेत जात नसतील तर त्यांना कोणते शिक्षक ओरडतात का? हा प्रश्न नक्की विचारा. तसेच का ओरडतात आणि ओरडताना ते काय बोलतात हे देखील विचारा.
शाळेत कुणी त्रास देतं का?
मुली सतत रडत असतील आणि शाळेत पाठवू नये म्हणून गोंधळ करत असतील तर त्यांना कोणी त्रास देत आहे का हे विचारून घ्या. मुली त्याची उत्तरे निट देत नसतील घाबरत असतील तर त्यांना चॉकलेट द्या आणि प्रेमाणे त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्या.
वॉशरुमला जाताना सोबत कोण आलं होतं
प्रत्येक शाळेत लहान मुलींना वॉशरुमला जाताना शाळेतील शिपाई बाई सोबत असतात. त्यामुळे तुमच्या मुली शाळेत वॉशरुमला जातात तेव्हा त्यांच्यासोबत कोण असतं हे त्यांना विचारून घ्या. जर त्यांनी कोणत्या पुरुषाचे किंवा मुलाचे नाव घेतले तर शाळेत याबद्दल चौकशी करून तक्रार करा. तसेच महिला कर्मचाऱ्यांना मुलींसोबत वॉशरुमला पाठण्यास सांगा.
-------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा