हा ब्लॉग शोधा

शनिवार, १५ मे, २०२१

*रेल्वेने प्रवास करणार असाल तर हे नियम तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत!*

 संतोष साळवे...7900094419


*रेल्वेने प्रवास करणार असाल तर हे नियम तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत!*

रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. रेल्वेचा प्रवास हा कधीही न विसरता येण्यासारखा असतो.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

          ESI व EPFO चे सर्व काम केले जातात.


गावाला जायचे असो किंवा फिरायला जायचे असो, नेहमी प्रवासासाठी पहिला पर्याय हा रेल्वेच असतो आणि तो आपल्याला आवडतो सुद्धा. याच रेल्वेचे काही असे नियम आहेत, जे कदाचित तुम्हाला माहित नसतील.चला मग त्या माहित नसलेल्या नियमांविषयी काही माहिती जाणून घेऊया.

 
                                                                                 
 १) तुम्हीही असा अनुभव घेतला असेल की, कधी कधी टीसी रात्रीचे तिकीट चेक करण्यासाठी येतात, त्यामुळे आपली झोप मोड होते. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेचा असा नियम आहे की,  रिझर्वेशन डब्यामधील प्रवाश्यांचे तिकीट प्रवास सुरू होण्याच्या आधीच तपासले गेले पाहिजेत.
एकदा तिकीट तपासल्यानंतर कोणतेही कारण नसताना परत प्रवाश्यांकडे तिकीटाची विचारणा करू शकत नाही. पण नव्या बदलण्यात आलेल्या नियमामध्ये काही अश्या तरतूदी करण्यात आल्या आहेत की, ज्यामुळे टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो.

– जर प्रवाश्याने रात्री १० वाजता प्रवास सुरू केला असेल तर, टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो किंवा जर प्रवास सकाळी ६ वाजेपर्यंत संपणार असेल तरी देखील टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो.                                                                                                                                                                                                   

.

२)  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, जर एखाद्या रिझर्वेशन असलेल्या व्यक्तीचं सामान प्रवासादरम्यान चोरी झाले, तर तो व्यक्ती रेल्वे बोर्डाकडून आपल्या सामानाची भरपाई मागू शकतो. त्यासाठी प्रवास करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांना एफआयआरच्या बरोबर एक फॉर्म पण भरून द्यावा लागतो. ज्यामध्ये असा उल्लेख असतो की, जर प्रवाश्याला सहा महिन्यांच्या आत जर त्याचे सामान परत मिळाले नाही, तर तो त्या सामानाची नुकसान भरपाई मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे सुद्धा जाऊ शकतो.

सामानाच्या किंमतीचे मुल्यांकन करून ग्राहक मंच रेल्वेला भरपाई देण्याचे आदेश देते. यामध्ये महत्त्वाचे हे आहे की, एफआयआर दिल्यानंतर लगेच जीआरपीने प्रवाश्याकडून ग्राहक मंचाचा फॉर्म भरून घेणे गरजेचे आहे.


३) प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे वेटिंग तिकीट असल्यास तो व्यक्ती रिझर्वेशनच्या डब्यामधून प्रवास करू शकत नाही. जर तो त्या डब्यामधून प्रवास करत असेल, तर त्याला कमीत कमी २५० रुपये दंड भरावा लागेल आणि नंतर त्याला पुढच्या स्थानाकापासून जनरल डब्यामधून प्रवास करावा लागेल.

पण जर चारपैकी दोन जणांची तिकिटे कन्फर्म झाली असतील, तर टीसीकडून परवानगी घेऊन बाकी दोघे त्यांच्या सीटवर जाऊन बसू शकतात.


४). रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, जर रेल्वेमध्ये कोणत्याही १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला विना तिकीट प्रवास करताना पकडल्यास, त्याच्याकडून तिकीट तपासणारा स्टाफ दंड आकारणार नाही, त्याच्याकडून केवळ प्रवासी तिकिटाचे भाडे घेण्यात येईल. या नियमामध्ये असे सुद्धा सांगितले आहे की, जर अश्या मुलाविरुद्ध काही कारवाई करायची असेल तर पहिल्यांदा रिपोर्ट बनवावा लागेल आणि त्यानंतरच कारवाई केली जाईल.

अजून काही नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत-

– जर तुम्ही तात्काळ तिकीट रद्द केलेत, तर त्याच्या एकूण भाड्याच्या ५० % पैसे परत केले जातील, तात्काळ तिकीट बुकिंग करण्याच्या वेळत सुद्धा बदलण्यात करण्यात आला आहे.

– तात्काळ विंडो एसी कोचसाठी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आणि स्लीपर कोचसाठी ११ ते १२ वाजेपर्यंत चालू असते.

– राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये फक्त मोबाईल तिकीटच ग्राह्य मानले जात आहे.

– आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमध्ये देखील तिकीट दिले जाणार आहे.

– आतापासून रेल्वेमध्ये वेकअप कॉल-डेस्टिनेशन अलर्ट सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.

*रेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..*


आज ट्रेनने देशाचा एक खूप मोठा वर्ग प्रवास करतो. इतर कुठल्याही वाहतूक सुविधांपेक्षा ट्रेनला जास्त पसंती देतात. क्वचितच असं कोणी असेलं ज्याने आयुष्यात आजवर कधीही ट्रेनचा प्रवास केला नाही. कधी कुटुंबासोबत, कधी मित्रांसोबत तर कधी एकट्यानेही आपण बिनधास्तपणे ट्रेनचा प्रवास करतो. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही म्हणून आपण रिझर्वेशन देखील करतो.पण जर कधी कुठल्या कारणामुळे तुमची ट्रेन सुटली तर? असं अनेकांसोबत होत असतं,शहरातलं ट्रॅफिक ही समस्या तर हमखास असतेच, अशावेळी हे एक कारणही ट्रेन चुकण्यासाठी पुरेस आहे.
अर्थात कारण कोणतंही असो, ट्रेन चुकण्याचा प्रसंग अनेकांवर येतोच. तुम्हालाही याचा अनुभव कधीतरी आला असेल.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

आपणही आपल्या प्रवासादरम्यान अश्या घटना बघत असतो.
पण अश्यावेळी नेमकं करावं काय हे कोणालाच सुचत नाही.
कोणत्याही कारणामुळे आपण प्रवास करु शकलो नाही, तरी आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का याबाबत केवळ विचार केला जातो, मात्र कृती फारच कमी लोकं करतात.ज्यांना कायद्याची जाणं असते ते कायदेशीररित्या ह्यावर पाउल उचलतात. पण ज्यांना कायदा माहित नसतो ते निराश होऊन आता काय करायचं म्हणून तिथून निघून जातात.पण जर तुमची गाडी सुटली तर घाबरण्यापेक्षा, हताश निराश होऊन बसण्यापेक्षा हे जाणून घ्या की अश्या परिस्थितीत तुम्ही काय-काय करू शकता.


जर तुमची ट्रेन सुटली आणि त्या गाडीत तुमचं रिझर्वेशन असेलं तर पुढील २ स्टेशन पर्यंत टीटीई तुमची रिझर्व्ह सीट आणखी कोणालाही अलॉट करू शकत नाही.अश्यात तुम्ही पुढील दोन स्टेशनवर पोहोचून गाडी पकडू शकता.पण जर तुम्ही दोन स्टेशनवरही गाडी पकडण्यात यशस्वी झाला नाहीत तर तुमची रिझर्व्ह सीट आरएसी प्रवाश्याला अलॉट करण्यात येते. ट्रेन सुटल्यावर तुम्ही टीडीआर फाईल करू शकता. त्यामुळे तुम्हाला बेस फेअरच्या ५० % परत मिळेल. म्हणजेच तुमच्या तिकिटाचे अर्धे पैसे तुम्हाला परत मिळेल.


आता ट्रेन सुटल्यावर काय करावे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेलं पण जर प्रवासाआधी तुमचं तिकीटं हरवलं तर तुम्ही काय करू शकता हे देखील जाणून घ्या.प्रवासाआधी जर तुमचं तिकीट हरवलं तर त्यात घाबरायचं कारण नाही.असं झाल्यास तुम्ही बोर्डिंग स्टेशनवर जाऊन तिथल्या चीफ रिझर्वेशन सुपरवायझरला डूप्लीकेट तिकीट जारी करण्यासाठी लिखित निवेदन देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं एखादं आयडी प्रुफ सोबत घेऊन जावं लागेल.पण डूप्लीकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या २४ तासा अगोदर निवेदन करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला डूप्लीकेट तिकीट मिळू शकेल त्यासाठी तुमच्याकडून काही चार्जेस देखील घेतले जाईल.पण जर त्यानंतर तुमचं हरवलेलं तिकीट सापडलं तर तुम्हाला डूप्लीकेट तिकीटासाठी घेतलेली फी सहजपणे परत मिळवू शकता.ह्याव्यतिरिक्त जर कुठल्या कारणास्तव ट्रेन रद्द झाली किंवा प्रवास पूर्ण होऊ शकला नाही किंवा रेल्वे इतर कुठलं ट्रान्सपोर्टच साधन उपलब्ध करू शकली नाही यात्री त्या प्रवासाचा पूर्ण रिफंड घेऊ शकतो.
त्यासाठी प्रवाश्याला आपले तिकीट स्टेशन मास्टरला सरेंडर करावे लागते.ट्रेनने प्रवास करताना जर कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवली तर तुम्ही काय काय पावलं उचलू शकता हे जाणून घेणं खरंच खूप गरजेचं असतं. ह्यामुळे तुम्ही स्वतःची तसेच गरज पडल्यास इतरांचीही मदत करू शकता.

तर मंडळी असे आहेत हे रेल्वेचे काही नवीन नियम, तुमच्या मित्र मंडळींसोबत हा लेख शेअर करा आणि त्यांना देखील ही माहिती पुरावा.

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !                                             ---------------------------------------------------
 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.7900094419          https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc 

बुधवार, १२ मे, २०२१

NEET परीक्षेत अपयश आलं? मग चिंता करू नका; NEET न देताही करू शकता 'हे' मेडिकल कोर्सेस 'हे' आहेत १२ वी नंतरचे पर्याय*

   ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


NEET परीक्षेत अपयश आलं? मग चिंता करू नका; NEET न देताही करू शकता 'हे' मेडिकल कोर्सेस 'हे' आहेत १२ वी नंतरचे पर्याय*

नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेशद्वार मानले जाते. NEET ची काठीण्य पातळी खूप उंच असते, त्यामुळे भल्या भल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देताना घाम फुटतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत असे पर्याय जे तुम्हाला नीटशिवाय वैद्यकीय क्षेत्राचा मार्ग मोकळा करून देतात.बारावीनंतर असे बरेच वैद्यकीय कोर्स आहेत ज्यांना नीटची आवश्यकता नाही. या लेखात अशा काही अभ्यासक्रमांविषयी जाणून घेऊ...

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

नीट परीक्षा देणाऱ्या या लाखो विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि आरोग्य सेवा क्षेत्रात करियर करायचे असते. परंतु तुम्ही नीट क्वालिफाय करण्यास अक्षम ठरल्यास निराश होऊ नका. असे अनेक कोर्स आहेत ज्याद्वारे तुम्ही आरोग्य सेवा क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता. यासाठी नीट देखील आवश्यक नसते. असे काही अभ्यासक्रम पुढे दिले जात आहेत-

बॅचलर इन फार्मसी (B.Pharmacy)


याला सामान्यत: बीफार्मा (BPharma) असेही म्हणतात.

यामध्ये औषधांचा अभ्यास केला जातो. औषधे तयार करण्याचे तंत्र शिकवले जाते. भारतासह अनेक देशांमध्ये फार्मसिस्ट होण्यासाठी ही पदवी आवश्यक आहे.

याद्वारे आपण फार्मास्युटिकल उद्योग, हर्बल उद्योग, सौंदर्यप्रसाधन उद्योग किंवा क्लिनिकल संशोधन क्षेत्रात उत्तम करियर करू शकता. या व्यतिरिक्त उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, संशोधन आणि विकास इत्यादी सरकारी विभागांमध्येही रोजगार निर्माण होतात. बरीच विद्यापीठे व संस्था स्वतंत्र प्रवेश परीक्षेद्वारे या कोर्सला प्रवेश देतात. नीट परीक्षा आयोजित करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) संस्था देखील फार्मसीसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेते.
या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना चार वर्षे अभ्यास करावा लागेल. 2-5 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.

बीटेक बायोमेडिकल (BTech Biomedical)


बीटेक इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (Biomedical Engineering) आहे. १२ वी नंतर विज्ञानात या प्रवेश घेता येतो. यानंतर बायोमेडिकल तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता आणि बायोकेमिस्ट म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा होतो.
बायोमेडिकलचा हा 4 वर्षांचा कोर्स केल्यानंतर, व्यक्तीला वार्षिक 4 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

बीएससी न्यूट्रिशन (BSc Nutrition


 हा तीन वर्षांचा यूजी कोर्स आहे. यात विज्ञान आणि आहार आणि पौष्टिक मूल्यांच्या सर्व बाबींबद्दल तपशीलवार शिकवले जाते. पोषण व आहारशास्त्रात बीएससी केल्यानंतर उमेदवार रुग्णालये, आरोग्य दवाखाने, आरोग्य केंद्रे किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आहारतज्ज्ञ किंवा पोषण विशेषज्ञ म्हणून काम करू शकतात. पगारही चांगला मिळतो.
हा तीन वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स केल्यानंतर वर्षाला तीन लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.

बीए मानसशास्त्र (BA Psychology)


इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणे सायकॉलॉजीसाठी बारावीमध्ये सायन्स अनिवार्य नाही. कला किंवा वाणिज्य शाखेचे विद्यार्थी देखील मानसशास्त्रामध्ये पदवी प्राप्त करू शकतात. यानंतर, आरोग्य किंवा मेंटल केअर काऊन्सिलर, कन्स्ल्टंट म्हणून काम करता येते. किंवा मग क्रिमीनल जस्टीस किंवा किंवा सामाजिक कार्य क्षेत्रात करियर करता येते.

बीएससी फिजिओथेरपी (BSc Physiotherapy)


हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे व्याख्याता, फिजिओथेरपिस्ट, संशोधक, संशोधन सहाय्यक, क्रीडा फिजिओ रिहॅबिलिटेटर, थेरपी मॅनेजर यासह अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. एखाद्या रूग्णालयात किंवा खाजगी क्लिनिकमध्येही काम करता येते.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 5 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.

B.Sc नर्सिंग- ( B.Sc Nursing )


हा
 अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करता येतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 8 लाखांचे पॅकेज मिळू शकते.

हे अभ्यासक्रम देखील चांगले पर्याय


वर नमूद केलेल्या कोर्स व्यतिरिक्त असेही काही कोर्स आहेत जे तुम्ही १२ वी नंतर निवडू शकता. यासाठी नीट देखील आवश्यक नसते. हे आहेत -
 
बीएससी कार्डियाक परफ्यूजन (BSc Cardiac Perfusion)

बीएससी बायोटेक्नॉलॉजी (BSc Biotechnology)
B.Sc बायोटेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा अंडरग्रेजुएट कोर्स आहे, हा कोर्स पूर्ण करून, उमेदवार दरवर्षी 3 ते 4 लाखांपर्यंत कमवू शकतात.

बीएससी मायक्रोबायोलॉजी (BSc Microbiology)
हा देखील तीन वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम आहे, तो पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 3-4 लाखांपर्यंत मिळू शकते

बीएससी कार्डिओ-व्हस्कुलर टेक्नॉलॉजी (BSc Cardio-Vascular Technology)
 हा तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर आयुष्याला चांगले करिअरचे पर्याय मिळतात आणि पगारही चांगला मिळतो.

बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (B.O.Th) (Bachelor of Occupational Therapy)

बीएससी इन जेनेटिक्स ( B.Sc in Genetics )
जेनेटिक्समध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 5 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. 

सायबर फॉरेन्सिकमध्ये B.Sc- ( Cyber ​​Forensics)
हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेतन 5 ते 7 लाखांपर्यंत असू शकते. 

या लेखामध्ये नमूद केलेले बहुतेक अभ्यासक्रम तीन वर्षांच्या कालावधीचे आहेत.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

---------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419,                                                                       https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7                             



मंगळवार, ११ मे, २०२१

*भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची करा तक्रार कस ते पहा*


भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची करा तक्रार कस ते पहा

आपल्या गावातील शासकीय कामे जर होत नसतील, किंवा शासकीय योजना आपल्या पर्यंत पोचत नसतील, तर त्याची तक्रार कोठे करायची याची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत. या तक्रारीद्वारे शासकीय अधिकाऱ्यांना त्या तक्रारींचे निवारण करावेच लागते, व केलेल्या तक्रारीचा अहवालाची प्रत तुम्हाला पाठवावी लागते. ही तक्रार प्रणाली मुख्यमंत्री यांच्या देखरेखीखाली काम करते.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

आपले सरकार वेबसाईट:

महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहोत.

आपली तक्रार योग्य वर्गवारीत दाखल करायची आहे. (जिल्हा प्रशासन / मंत्रालयातील विभाग). एकदा आपण तक्रार दाखल केली की, आपला ट्रेकिंग क्रमांक तयार होईल. त्या ट्रेकिंग क्रमांकावरूनच नागरीकांना आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करता येईल. आपल्या तक्रारीची सद्यस्थिती तुम्हाला त्यावरूनच कळेल. सक्षम अधिकारी यांचा आपली तक्रार 21 दिवसात निवारण करण्याचा प्रयत्न असेल.

 आपल्या तक्रारीचे समाधान झाले की नाही याबाबत नागरिक "समाधानी आहोत" किवा "समाधान झाले नाही" या दोन पर्यायांच्या माध्यमातून आपला प्रतिसाद देवू शकतात. 

https://grievances.maharashtra.gov.in/mr

पुढे तक्रार निवारण, माहितीचा अधिकार, माझे सरकार ,महा योजना असे पर्याय दिसतील त्यापैकी "तक्रार निवारण" या पर्यायावर क्लिक करा.

 तक्रारीचे स्वरूप:

तक्रारीचे स्वरुपा मध्ये गावातील विविध शासकीय कामे आणि योजना संबंधी तक्रारीसाठी खालील विविध तक्रारीचे स्वरुप पहा किंवा इतरही ग्रामपंचायत संबंधी तक्रारिचे स्वरूप निवडा. 

1) ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

2) ग्रामपंचायत प्रशासन- संबधित बाबी

3) जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता/वाढीने वर्गांना मान्यता

4) प्राथमिक शाळागृहांची/शैाचालय- दूरूस्ती

5) शालेय पोषण आहार बाबत

6) प्राथमिक शाळाविषयी इतर बाबी

7) माध्यमिक शाळाविषयी इतर बाबी

8) पाळणाघर चालविणे

9) अंगणवाडी इमारत / शौचालय बांधकाम

10) कुपोषित मुला-मुलींसाठी अतिरिक्त आहार.

11) जि.प.शाळेतील इ.5वी ते 7वी तील मुलींना सायकल पुरविणे

12) अंगणवाडी केंद्रातील मुला मुलींसाठी गणवेश पुरविणे

13) प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक सेवा

14) रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण कार्य

15) प्रजनन व बाल आरोग्य सेवा

16) आरोग्य व आहार विषयक शिक्षण

17) विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम

18) शालेय आरोग्य तपासणी/अंगणवाडी तपासणी.

19) मदत गट

20) इंदिरा आवास योजना

21) पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम

22) दारिद्र्य रेषेखाली असणार्‍या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविने

23) कृषी संबधी

24) पाणीपुरवठा योजनेंतर्गत अस्तीत्वातील विहीरींचे रुंदीकरण व खोलीकरण/दुरुस्ती

25) नविन पाणी पुरवठा योजना

26) विंधन विहीर (हातपंप)

27) ग्रामीण रस्ते- मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व दुरुस्ती

28) तिर्थक्षेत्र/ पर्यटन विकास कार्यक्रम

29) स्मशानभुमी/ अंगणवाडी इमारत बांधकामे

30) अभिकरण (वि. प. स./ वि. स. स./डोंगरी/ खासदार निधी)

31) १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे

32) जवाहर विहिरी

33) जनावरांना उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया इ.

34) दलितवस्ती सुधार योजना

35) अपंगांना शाळा, मागास विद्यार्थींना शिष्यवृत्या, अनुदानित वसतिगृहे इ.

36) ग्रामीण भागातील बेरोजगार मुलीं व महिलां साठीच्या योजना

37) मुलींना स्वसंरक्षणा साठी  व त्यांच्या शारीरिक विकासा साठी प्रशिक्षण योजना

38) महिलां साठी समुपदेशन केंद्र चालविणे

39) महिलांना कायदेशीर / विधी विषयक सल्ला देणे

40) विविध कामांच्या देयकांची रक्कम संबधितांना अदा करणे

41) कर्मचारी नेमणूका, पदोन्नती, जिल्हा बदल्या/नियतकालिक बदल्या इ.

42) जिल्हा परिषद मालकीच्या इमारतींचे देखभाल व दुरुस्ती

43)  इतर 

तुमची तक्रार: या पर्यायामध्ये तुमचे नाव, ग्रामपंचायत गावाचे नाव लिहून, वरील एका तक्रारीच्या स्वरूपा नुसार कमाल 2000 शब्दामध्ये तक्रारींचे विवरण करा.

प्रतिमा अपलोड करा:

या पर्यायामध्ये तक्रारीचा प्रतिमा (फोटो) पुरावा म्हणून अपलोड करू शकता (फाईल्स २ एमबी पेक्षा कमी असाव्यात. मान्य फाईल प्रकार: png jpg jpeg.).

दस्तऐवज अपलोड करा: या पर्यायामध्ये तक्रारीच्या PDF फाईल  पुरावा म्हणून अपलोड करू शकता (फाईल्स २ एमबी पेक्षा कमी असाव्यात.मान्य फाईल प्रकार: PDF.).

प्रतिमेतील कोड प्रविष्ट करा (केस सेन्सेटिव्ह): या पर्यायामध्ये वर दिलेला प्रतिमेतील कोड प्रविष्ट करा. 

पुढे ""Preview"" वर क्लिक करून आपण करत असलेल्या तक्रारीचे पूर्वावलोकन पहा आणि योग्य "प्रशासन पातळी", "प्रशासन प्रकार" आणि "तक्रारींचे स्वरूप" निवडलेली नसल्यास कृपया दुरुस्त (Edit) करा.

आपली तक्रार पूर्वावलोकन "Preview" मध्ये योग्य दिसत असेल तर तक्रारीची पुष्टी करण्यासाठी "Confirm & Submit" वर क्लिक करा.

सबमिट झाल्यावर तुमची तक्रार SAVE झाल्याचा आपल्याला एक टोकन मॅसेज येतो.

*आपल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करून तक्रार यादीतून तक्रार निवडा किंवा टोकन नंबर*

https://grievances.maharashtra.gov.in/mr/citizens/login?redirect=%2Fmr%2Fpost-grievance

-–----––--------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

---------------------------------------------------------------

 संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419,                                                                       https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती होणार मालामाल!

         संतोष साळवे...7900094419                               



पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती होणार मालामाल!

ग्रामीण विकासाचा मानबिंदू असलेल्या ग्रामपंचायती ‘मिनी संसद’ म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या हप्त्यापोटी सुमारे ६८८ कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त होणार असल्याने ग्रामपंचायती मालामाल होणार आहे. या निधीच्या विनियोगातून गावांमध्ये दर्जेदार लोकाभिमुख सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशी शासनाला अपेक्षा आहे.

दर्जेदार लोकाभिमुख सुविधांच्या निर्मितीची अपेक्षा

देशपातळीवर लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी पंचायत राज व्यवस्था कार्यरत आहे. २०१५ पूर्वी ग्रामविकासाच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदांना सर्वाधिक महत्त्व होते. परंतु केंद्राच्या योजना गावपातळीपर्यंत पोचण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टचाराचे सिंचन होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने चौदाव्या वित्त आयोगापासून थेट निधी ग्रामपंचायतींना देण्याचे धोरण राबविले जात आहे.

कर्मचारी पगार किंवा आस्थापनाविषयक बाबींसाठी हा निधी नाही.

पंधराव्या वित्त आयोगातील सर्वाधिक ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. उर्वरित निधीपैकी दहा टक्के जिल्हा परिषदेस, तर दहा टक्के निधी पंचायत समित्यांना मिळेल. या निधीतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आदेशात नमूद केले आहे. कर्मचारी पगार किंवा आस्थापनाविषयक बाबींवर हा निधी खर्च करता येणार नाही.

* अशी होणार विकासकामे :

1) पाण्याचा निचरा आणि पाणीसाठा व्यवस्थापन

2) मुलांचे लसीकरण व कुपोषण रोखणे

3) जोडरस्ते आणि ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल

4) स्मशानभूमीचे बांधकाम

5) स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण

6) एलईडी पथदिवे व सौर पथदिव्यांचे बांधकाम व दुरुस्ती

7) ग्रामपंचायतीमध्ये पुरेशी व उच्च बँडविडथसह वाय-फाय डिजिटल नेटवर्क सेवा

8) सार्वजनिक वाचनालय

9) मुलांसाठी उद्याने, मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान, क्रीडा व शारीरिक फिटनेस उपकरणे

10) ग्रामीण आठवडेबाजार

11) मूलभूत वीज, पाणी, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, सुका व ओला कचरा व्यवस्थापन उपकरणे

12) नैसर्गिक आपत्ती, साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावावेळी मदतकार्य

असा मिळतो विकासनिधी...

दर वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक होते. त्यात गावाचा पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर आधारित अंदाजपत्रक तयार केले जाते. ३१ डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवणे आवश्यक असते. अंदाजपत्रक गटविकास अधिकारी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवतात.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

पाण्यासाठी पन्नास टक्के निधी

१ एप्रिल २०२० पासून पंधरावा वित्त आयोग सुरू झाला आहे. त्यानुसार सरकार गावातल्या प्रतिमाणसी प्रतिवर्षी सरकार ९५७ रुपये देत आहे. १४ व्या वित्त आयोगासाठी ही रक्कम ४८८ रुपये होती. चौदाव्या वित्त आयोगात मानवविकास, कौशल्य विकास, शिक्षण, पायाभूत विकासासाठी यासाठी प्रत्येकी २५ टक्के रक्कम खर्च केली. परंतु, पंधराव्या वित्त आयोगात एकूण निधीपैकी ५० टक्के निधी पाणीपुरवठा, स्वच्छता यावर व उर्वरित ५० टक्के इतर बाबींवर खर्च करण्याचे निर्देश आहेत.

विभागनिहाय ग्रामपंचायती अशा

1) नाशिक : ४ हजार ९००

2) कोकण : ३ हजार १७

3) पुणे : ५ हजार ६८०

4) औरंगाबाद : ६ हजार ६४४

5) अमरावती : ३ हजार ९५१

6) नागपूर : ३ हजार ७०४

7) राज्यातील एकूण ग्रामपंचायती : २७ हजार ८९६

*ग्रामसेवकग्रामपंचायत सरपंच, उप- जबाबदाऱ्या व कर्तव्य विषयीची सविस्तर माहित

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ३८ नुसार पंचायतीचे कार्यकारी अधिकारी सरपंच व उपसरपंच यांची कार्ये. कलम ३८ (१) या अधिनियमाचे उपबंध पंचायतीने संमत केलेले ठराव अमलात आणण्याचा प्रयोजनासाठी कार्यकारी अधिकार सरपंचाकडे निहित असेल व तो या अधिनियमान्वये किंवा तद्नुसार पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्य रीतसर पार पाडण्यासाठी प्रत्यक्षपणे जबाबदार असेल. नियमांद्वारे अन्यथा विहित केले असेल त्या व्यतिरिक्त, सरपंचाचा अनुपस्थित उपसरपंच हा सरपंचाच्या अधिकारांचा वापर करील व त्याची कर्तव्य पार पाडील. मागच्या लेखामध्ये आपण  ग्रामपंचायतीचे काम कसं चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? त्याची सविस्तर माहिती पाहिली आहे.

*सर्व नोकरदारांना PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF  Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संतोष विठ्ठल साळवे.. संपर्क करा. 7900094419*

                                       


*ग्रामपंचायत सरपंच, उप-सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य:*

*सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य:*

ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. गावातील लोकसेवक या नात्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचांला  सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जो कोणी सरपंच निवडून येईल त्याने आपल्या गावाला समृद्ध करण्याची जबाबदारी घेऊन विकासाच्या पथावर घेऊन जाणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे.

*१) कलम ३८ (अ)* अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीज करून पंचायतीच्या सभेचा अध्यक्ष म्हणून काम चालविल आणि पंचायतीच्या सभेचे कामकाज पार पाडणे.

*२) कलम ३८ (क)* पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेली कृत्ये आणि केलेली कार्यवाही यावर देखरेख व नियंत्रण ठेवील, यात पंचायतीचे अभिलेख व नोंदवह्या सचिवाच्या अभिरक्षक ठेवणे व त्याची व्यवस्था ठेवणे यावरील देखरेखी चा समावेश होतो.

*3) कलम ३८ (ह)* या अधिनियमान्वये किंवा तदनुसार आवश्यक असलेली सर्व विवरणपत्रे व प्रतिवृत्ते तयार करण्याची व्यवस्था करील;

*4) कलम ३८ (आय)* या अधिनियमान्वये किंवा त्याअन्वये केलेल्या नियमान्वये त्याला प्रदान करण्यात येतील अशा अन्य अधिकारांचा वापर करील व त्याच्यावर लादण्यात येतील अशी अन्य कामे पार पाडील;

*5) कलम ३८ (आय-अ)* सरपंच, शासनाच्या कोणत्याही निदेशान्वये देणे आवश्यक असतील अशी उत्पन्नाची प्रमाणपत्रे, आपल्या सहीने आणि पंचायतीच्या शिक्क्यानिशी देता येतील.

*6) कलम ३८ (ज)* कलम ७ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे ग्रामसभेच्या बैठकी बोलवील व त्यात अध्यक्षाचे काम चालवील.

*7) कलम ३८ (के)* सरपंच, पंचायतीच्या सभांच्या कार्य सूचित अंतिम रूप देईल:परंतु, जर तीन किंवा अधिक सदस्य, लगत नंतरच्या सभेच्या कार्यसूची वर कोणत्याही बाबीचा समावेश करण्याची मागणी करतील तर, सरपंच ती बाब पुढच्या सभेच्या कार्य सूचीत समाविष्ट करील.परंतु आणखी असे की, कोणतेही अनौपचारिक वित्तीय कामकाज हे अग्रेषित कार्यसूची चा भाग असल्याखेरीज चालविले जाणार नाही;

*8) कलम ३८ (ल)* सरपंच, पंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करील;

*9) कलम ३८ (म)* सरपंच, पंचायतींशी विचारविनिमय करून, योजना राबविण्यासाठी इतर सर्व अधिकारांचा वापर करील;

*(एक-अ)* ज्या पंचायतीचा सरपंच या अधिनियमाच्या कलम ३० अ- १अ अन्वये थेट निवडून दिला असेल अशा पंचायतीच्या संबंधात तो सरपंच पुढील अधिकारांचा देखील वापर करील आणि पुढील कार्य व कर्तव्य पार पाडील.-

*(अ) पंचायतीच्या सभांच्या कार्य सूचित अंतिम रूप देणे:*

परंतु, जर तीन किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य, लगत नंतरच्या सभेच्या कार्यसूची वर कोणत्याही बाबीचा समावेश करण्याची मागणी करतील तर, सरपंच ती कोणतीही बाब पुढच्या सभेच्या कार्य सूचीत समाविष्ट करील:परंतु आणखी असे की, कोणतेही अनौपचारिक वित्तीय कामकाज हे अग्रेषित कार्यसूची चा भाग असल्याखेरीज चालविले जाणार नाही:परंतु तसेच, जर सरपंचाच्या मते, पंचायतीचा कोणत्याही विषयावरील ठराव हा त्या गावाच्या व्यापक हितास बाधक ठरणारा असेल तर, सरपंच, तो ठराव लगत नंतरच्या पुढील ग्रामसभेपुढे अंतिम निर्णयासाठी ठेवण्याची व्यवस्था करील आणि त्यावरील ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल.

*(ब) पंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे;*

*(क) पंचायतीशी विचारविनिमय करून, योजना राबविण्यासाठी इतर सर्व अधिकारांचा वापर करणे;*

*उप-सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य:*

सरपंचा बरोबरच जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये एक उपसरपंच असतो. ग्रामपंचायत मध्ये सरपंचानंतर उपसरपंच हाच मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि त्याला सरपंचासारखेच अधिकार प्राप्त होतात.

*१) कलम ३८ (अ)* अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीज करून सरपंचाच्या अनुपस्थितीत पंचायतीच्या सभेचा अध्यक्ष म्हणून काम चालवील आणि पंचायतीच्या सभांचे नियमन करील;

*2) कलम ३८ (ब)* सरपंचाच्या अधिकारांपैकी व कर्तव्यांपैकी सरपंच वेळोवेळी त्याच्याकडे सोपविल अशा अधिकारांचा वापर करील व अशी कर्तव्ये पार पाडील;

*3) कलम ३८ (क)* सरपंचाची निवडणूक होईपर्यंत किंवा सरपंच गावात सतत पंधराहून अधिक दिवस अनुपस्थित असेल किंवा तो काम करण्यास असमर्थ झाला असेल, तर सरपंचाच्या अधिकारांचा वापर करील व त्याची कर्तव्ये पार पाडील.

*4) कलम ३८ (३)* सरपंच व उपसरपंच हे दोघेही अनुपस्थित असतील, तर त्या बाबतीत पंचायतीच्या प्रत्येक सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी अशा ज्या एका सदस्याची त्याप्रसंगी सभापती म्हणून निवड करील तो सदस्य अशा सभेत अध्यक्ष म्हणून काम चालवील.

*5) कलम ३८ (४)* या अधिनियमान्वये अन्यथा उपबंधित केले असेल त्या व्यतिरिक्त, जेव्हा कोणत्याही कारणास्तव सरपंचाच्या अधिकारांचा वापर करण्यास, किंवा त्याची कर्तव्ये व कामे पार पाडण्यास कोणतीही व्यक्ती सक्षम नसेल तर अशा बाबतीत, निवडून येण्यास पात्र असलेल्या ग्रामसभेच्या ज्या सदस्यास पंचायत समितीने नामनिर्देशित केले असेल असा कोणताही सदस्य अशा अधिकारांचा वापर करील आणि अशी कर्तव्य व कामे पार पाडील. अशा रीतीने नामनिर्देशित केलेल्या सदस्याला पंचायतीच्या कोणत्याही सभेत अध्यक्ष म्हणून काम चालवताना विहित केलेले अधिकार असतील व विहित केलेली कार्य पद्धती, तो अनुसरील परंतु त्याला मत देण्याचा हक्क असणार नाही.

*6) कलम ३८ (४-अ)* जर, सरपंचाचा किंवा सभेच्या अध्यक्षस्थानी आहे अशा व्यक्तीच्या मते, पंचायतीच्या कोणत्याही विषयावरील ठराव हा त्या गावाच्या व्यापक हितास बाधक ठरणारा असेल तर, सभेच्या अध्यक्षस्थानी असणारी व्यक्ती, तो ठराव लगत नंतरच्या पुढील ग्रामसभेपुढे अंतिम निर्णयासाठी ठेवण्याची व्यवस्था करील आणि त्यावरील ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल.

*7) कलम ३८ (५)* या कलमातील कोणत्याही गोष्टींमुळे, कलम ५७, पोटकलम (४) खाली ज्या कोणत्याही कृत्यासाठी सचिवास संपूर्णपणे जबाबदार धरण्यात येईल अशा, सचिवाने केलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल सरपंचास जबाबदार धरता येणार

*ग्रामपंचायत ग्रामसूची किंवा अनुसूची-१:*

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ४५ मधील ग्रामसूची किंवा अनुसूची-१ नुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची असते. मागील लेखा मध्ये आपण ग्रामपंचायत ग्रामसूची किंवा अनुसूची-१ (ग्रामपंचायत कामाचे विषय - विकास विषयक कामे) विषयीची सविस्तर माहिती आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ नुसार ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये सविस्तर पाहिली आहे.

ग्रामसूची या अधिनियमाचे अनुसूची १ मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये ७८ विषय असून, त्यांची विभागणी खालील भागात केलेली आहे.. 

 १) कृषी,

 २) पशुसंवर्धन 

 ३) वने,

 ४) समाज कल्याण,

 ५) शिक्षण,

 ६) वैद्यकीय आणि आरोग्य,

 ७) इमारती व दळणवळण,

 ८) पाटबंधारे, 

९) उद्योगधंदे व कुटीर उद्योग,

 १०) सहकार,

 ११) स्वसंरक्षण व ग्राम संरक्षण,

 १२) सामान्य प्रशासक*. ग्रामसुची राज्यसरकारने अ.नं. १८-अ, ४३-अ आणि ७३-अ यामध्ये दिलेल्या विषयांची भर टाकली आहे.

ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे गावातील मुख्य शासकीय अधिकारी म्हणून काम पाहत असतात. मागील लेखामध्ये आपण ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या सविस्तर पाहिले आहे.



*ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या कोणत्या? ग्रामसेवकांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज (RTI) कसा करायचा?*

ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व कारभारावर त्याचे नियंत्रण असते, तो जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याची नेमणुक मुख्ये कार्यकारी अधिकारी जि. प. करतात. त्याची बदली करण्याचा अधिकार जि.प. लाच आहे. काहीवेळा ग्रामसेवकाकडे दोन किंवा तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात येते.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन १९६१, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन १९५८ ग्रामसेवकांची कामे व जबाबदाऱ्या शासनाने आखून दिलेली आहे. ग्रामसेवकाने या नियमावली प्रमाणे कामे करणे बंधनकारक आहे. गावातील नागरिकांनी सर्व नियम काळजीपूर्वक अभ्यासावेत आणि खालील कामे व जबाबदा-या, विविध कल्याणकारी योजना ग्रामसेवक आखून दिलेल्या नियम व पद्धतीने पार पाडतो कि नाही याची पडताळणी करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वारंवार व भरपूर उपयोग करावा. ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय कार्य करणारे व्हीडीओ / ग्रामसेवक जीपीचे सेक्रेटरी म्हणून काम करतात आणि जीपी स्तरावर खाती व नोंदी सांभाळण्यासही जबाबदार असतात.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या*:

प्रशासन:

1) ग्रामपंचायत कडील सर्व प्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे.

2) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीचे अभिलेखे वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्यावत ठेवणे.

3) पंचायतीने ठरवून दिल्यानंतर ग्रामसभा, मासिक सभा बो‍लविणे, त्यांच्या नोटिसा काढून संबंधितांना देणे, सभेचा कार्यवृतांत लिहिणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व पूर्तता करणे, हे काम पंचायतीच्या सहकार्याने करावे.

4) शासनाने व जिल्हा परषिदेने बसविलेले विविध कर (वसूल करण्‍याबाबतचे आदेश सचिवांकडून प्राप्त‍ झाल्यानंतर) व फी यांची वसूली करणे, प्रत्येकी चार वर्षांनी कराची आकारणी करुन २५ टक्के वाढ सुचविणे.

5) ग्रामपंचायतीकडील लेखा परीक्षणांत केलेल्या, आक्षेपांना उत्तर देणे.

6) ग्रामपंचायत हद्दीतील जमिन, रस्ते, इमारती, पडसर जागा, व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे व ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.

7) जन्म, मृत्यु, उपजत मृत्यु, विवाह नोंदणी करणे.

8) ग्रामपंचायत क्षेत्रातील पंचायत सभासदांच्या सहकार्याने ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी सोसायट्या, दुध डेअरी, नागरी पतसंस्था, स्था्निक महिला मंडळे, तरुण मंडळे, बालवाडी, आंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था व इतर मान्य संस्था् यांच्याशी समन्वय साधून या सर्व लोकोपयोगी कार्यक्रम बनविण्या‍च्या दृष्टीने प्रयत्न करणे.

9) ग्रामपंचायत पातळीवर शासकीय, निमशासकीय, कर्मचा-यांना आठवडयातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे.

10) सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर इतर वेळी कायदेविषयक सल्ला देऊन, आवश्यकता असल्यास आपले मत नोंदविणे.

11) ग्रामपंचायत ही नियमांची व कायद्यांची उलंघन करणारी कृती करीत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकरी / गट विकास अधिकारी यांना विहीत मुदतीत सादर करणे.

12) ग्रामपंचायतीचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करुन प्रचायत समितीस विहीत मुदतीत सादर करणे.निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व आदेश यांचा काटेकोरपणे पालन करणे.

13) ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचा-यांवर नियंत्रण व त्यांची आस्थापना विषयक बाबी उदा. सेवापुस्तक, वैयक्तीक समस्या परिपूर्ण ठेवणे, भविष्य् निर्वाह निधी, बोनस इ. शासनाच्याा आदेशानुसार व नियमानुसार देणे.

नियेाजन:

1) ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाचे पंचवार्षिक नियोजन करणे. रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टी्ने उद्योग धंद्यात वाढ करणे. पडीक व लागवडी योग करण्याच्या दृष्टीने जमिनीचा विकास करुन व सिंचन क्षमता वाढवुन शेतजमिनीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, रस्तें दुरुस्ती, डांबरीकरण सांडपाण्यासाठी गटारे,परिसर स्वच्छता, पशुधन विकास, वैरण विकास, बाल कल्याण योजना, साक्षरता मोहिम याबाबतीत शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यानुसार कार्य करणे, जवाहर रोजगार योजनेंतर्गत ग्रामपंयाचतीचे उत्पन्न व इतर शासकिय व जिल्हा परिषदांकडून उपलब्ध होणारे व अपेक्षित असलेले अनुदान याचा विचार करुन ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.

2) वार्षिक कृती आराखडा तयार करुन एप्रिल मध्ये होणा-या ग्रामसभेपुढे ठेवून ग्रामसभेची मान्यता घेणे.

3) योजनांची अंमलबजावणी सुरळीत पणे होत असल्या बाबत लक्ष ठेवणे.

शेतीवषियक

1) शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती प्राप्त करुन ती ग्रामसभा, मासिक सभा व इतर सार्वजनिक सभामार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहचविणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे, दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे.

2) ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतासाठी ठेवणे.

3) प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खाते प्रमुख, तांत्रिक अधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी पाठविणे, बांधकामावर देखरख ठेवणे, कामाची पाहणी करुन, मूल्यांकन प्रस्ताव तांत्रिक अधिकारी यांच्याकडे पाठविणे, महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेंतर्गत जमा-खर्चाची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहिने ग्रामसभेपुढे ठेवणे.

कुटूंब कल्याण कार्यक्रम:

1) कुटंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे.

कल्याणकरी योजना

1) महिला व बालकल्याण, समाजकल्याण, साक्षरता प्रसार, अंधश्रध्दांनिर्मुलन कायदेवषियक सहाय्य व सल्ला देणे. इ. योजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे.

2) तसेच या योजनांची अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे.

3) पशूसंवर्धनाबाबत विविध योजनांची माहिती देणे व या योजनेसाठी प्रेात्साहन देणे.

शुध्द पाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे, शुध्दीकरणासाठी औषधांचा पुरेसा साठा करणे, पाणीवाटपाचे नियोजन, देखभाल व दुरुस्तीसाठी होणा-या खर्चा इतकी पाणीपट्टी बसविणे, त्या बाबतचा अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्या‍वर पंचायतीने केलेल्या आकारणीनुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करणे. पूर, दुष्काळ, भूकंप, टोळधाड, टंचाई, साथरोग इत्यादी नैसर्गीक आपत्ती उदभवल्यास त्याबाबत त्वरीत संबधीत खात्याला कळविणे व ग्रामपंचायतीने आरोग्यखात्याच्‍या सहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे.

*ग्रामसेवकांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज (RTI) कसा करायचा?*

वरील ग्रामसेवकांची कामे व जबाबदाऱ्या, विविध कल्याणकारी योजनांचा अभ्यास करून आणखी अर्ज करून माहिती मागावी. ग्रामसेवकांकडून नेमकी काय माहिती मागवावी याचा हा नमुना माहिती अधिकार अर्ज दिलेला आहे.


तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!!            ---------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419*       https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7


भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...