हा ब्लॉग शोधा

बुधवार, १ मे, २०२४

कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे.

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.



कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे.

कंपनीच्या या कबुली जबाबामुळे ही लस घेणाऱ्यांचे टेशन वाढले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात अ‍ॅस्ट्राझेनेकाने या प्रकारची कबुली पहिल्यांदाच दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या या कबुली जबाबाची जगभरात चर्चा सुरू आहे. ही लस भारतात अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून तयारी केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील अनेक नागरिकांना देण्यात आली होती.

अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. मात्र हे दुष्पपरिणाम क्वचितच आढळू शकतात. नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीबे स्पष्ट केले आहे.

जगभरातील अनेकांनी घेतली लस

भारतासह जगातील अनेकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविशील्ड ही लस घेतली आहे. कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कबूल केले आहे की त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS)हे दुर्मिळ दुष्परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात. यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासोबत प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जेव्हा असे होते तेव्हा व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

घाबरण्याचे कारण नाही

कोविशील्ड आणि Vaxzevria मुळे रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने देखील हे मान्य केले आहे. न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास कुमार यांनी ट्विटरवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये या बातमीमुळे त्रासलेल्यांना दिलासा मिळू शकतो. डॉ.विकास यांनी या बातमीचे विश्लेषण करून काय काळजी घ्यावी या बाबत माहिती दिली आहे.

घाबरू नका हे उपाय करा

डॉ.विकास यांनी या बाबत काळजी करण्याबाबत माहिती दिली आहे. नागरिकांनी या बातमीवरून घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. लसीकरण झाल्यावर अटॅक येण्याची शक्यता ही जास्त असते. मात्र, काही दिवसानंतर मात्र, हा धोका कमी होतो, असे डॉ.विकास यांनी स्पष्ट केले आहे. या लसीमूळे फार क्वचित दुष्परिणाम होतात.

डॉक्टर विकास यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिलेल्या टिप्स

1) फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. प्रक्रिया केलेल्या आणि ट्रान्स फॅट्सपासून दूर राहणे फायदेशीर आहे.

2) मिठाचा वापर कमी करा.

3) जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. निरोगी वजन राखणे गरजेचे आहे.

4) दररोज व्यायाम करा (दिवसातून 30-40 मिनिटे)

5) धूम्रपान टाळा.

6) तणाव व्यवस्थापित करा.

7) नियमित तपासणी करा (उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल)

तुम्ही कोणती वॅक्सिन घेतली होती तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या... खाली लिंक वर क्लिक करा.

https://selfregistration.cowin.gov.in/


--------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.


पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, २१ मार्च, २०२४

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला देईल परदेशातही गाडी चालवण्याची परवानगी, या देशात आहे परवानगी



भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला देईल परदेशातही गाडी चालवण्याची परवानगी, या देशात आहे परवानगी

दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे.


देशात तसेच परदेशात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक नोकरीसाठी परदेशात जातात. तेथील कार्यालयात जाण्यासाठी लोकांना स्वतःचे वाहन चालवावे लागते आणि त्यासाठी वाहन चालविण्याचा परवानाही आवश्यक असतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही देशांबद्दल सांगत आहोत, जिथे फक्त भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स उपयोगी ठरू शकते.

भारतात बनवलेले स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. 

अमेरिका (America)


ऑस्ट्रेलिया (Australia)


कॅनडा (Canada)


युनायटेड किंगडम (United Kingdom)


न्यूझीलंड (New Zealand)


स्वित्झर्लंड (Switzerland)


फ्रान्स (France)


दक्षिण आफ्रिका 
स्वीडन (Sweden)

तुम्ही नोकरी, शिक्षण किंवा टुरिस्ट व्हिसावर तेथे जात असाल, तर तुम्ही या देशांच्या रस्त्यावर गाडी चालवू शकता.

परदेशात जाणाऱ्या लोकांना हे माहीत असायला हवे की, तिथल्या रस्त्यावर वाहन चालवण्यापूर्वी त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स हा भारताच्या प्रादेशिक भाषेत नसून इंग्रजीत असावा. 


जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स प्रादेशिक भाषेत बनवला असेल, तर तो परदेशात वैध ठरणार नाही.


भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह परदेशात वाहन चालवण्यासाठी, तुम्हाला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. अमेरिकेप्रमाणे तुमच्या I 94 फॉर्मची पडताळणी करावी लागेल. तसेच, काही देशांमध्ये तुम्हाला परमिट घ्यावे लागेल. त्यानंतरच तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह परदेशात गाडी चालवू शकता.
------------------------------------------------
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

सोमवार, १८ मार्च, २०२४

निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, अॅपद्वारे करडी नजर; काय आहे CVIGIL App?

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, अॅपद्वारे करडी नजर; काय आहे CVIGIL App?

काय आहे cVIGIL ?

cVIGIL हे असेच एक मोबाइल ॲप आहे. या ॲपद्वारे मतदार आणि नागरिक निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी नोंदवू शकतात. उल्लंघनांमध्ये लाच देणे, मोफत वस्तु देणे, दारूच्या बाटल्या विकणे किंवा परवानगीपेक्षा जास्त वेळ लाऊडस्पीकर वाजवणे यांचा समावेश होतो. पुरावा म्हणून तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकता. निवडणूक आयोगाला तक्रार प्राप्त होताच लगेच कारवाई सुरू होते. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची टीम 100 मिनिटांच्या आत लोकेशन ट्रेस करुन त्या जागेवर पोहोचेल.


cVIGIL App कसे करते काम?

  • युजरला निवडणुकीदरम्यानच्या गैरप्रकाराचा फोटो काढून किंवा दोन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ॲपवर अपलोड करावा लागेल. यानंतर भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) नकाशावर स्थानाचा शोध घेईल. तक्रार सबमिट केल्यानंतर प्रत्येक रिपोर्टसाठी एक युनिक आयडी मिळेल.

  • तक्रार केल्यानंतर, माहिती जिल्हा नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचते आणि एका फील्ड युनिटला नियुक्त केले जातात, ज्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड आणि पाळत ठेवणाऱ्या पथकांचा समावेश आहे. ही पथके लोकेशनवर नेव्हिगेट करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी 'cVIGIL Investigator' नावाचं मोबाइल ॲप वापरतात.

  • एकदा फील्ड युनिटने तक्रारीला प्रतिसाद दिल्यानंतर, ते cVIGIL Investigator द्वारे रिटर्निंग ऑफिसरला फील्ड रिपोर्ट पाठवतात. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ती तक्रार निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर पाठवली जाते आणि नागरिकांना 100 मिनिटांत परिस्थितीची माहिती दिली जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

cVIGIL ॲपची आवश्यकता का आहे?

cVIGIL ॲप निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यास मदत करते. निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेसोबत एकत्र काम करणे आवश्यक आहे, अशी या ॲपमागचा उद्देश आहे. cVIGIL ॲप कम्युनिटी पोलिसिंगप्रमाणे काम करते. हे ॲप नागरिकांना निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. निष्पक्ष निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांनी जनतेसोबत मिळून काम केले पाहिजे या विश्वासावर ते आधारित आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp


शुक्रवार, ८ मार्च, २०२४

शिक्षण, लग्न ते व्यवसाय.; महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या 'या' 11 खास योजना

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

शिक्षण, लग्न ते व्यवसाय.; महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या 'या' 11 खास योजना

आज महिला अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. अगदी कृषी क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत, पण दुसरीकडे ग्रामीण भागात आणि निमशहरी भागातील महिलांना रोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.

अशा परिस्थितीत महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षण आणि विवाहानंतरही अनेक योजनांचा लाभ घेता येतो. दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त आपण केंद्र शासन आणि महाराष्ट् सरकारच्या वतीने खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी जाणून घेणार आहोत.


आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. भारत सरकार आणि राज्य सरकारने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संधी निर्माण करून देण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. या महिलांसाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजना सुरू आहेत ते जाणून घेऊया.

1) माझी कन्या भाग्यश्री योजना

महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

2) लेक लाडकी योजना


महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी चालवण्यात येणारी आणखी एक योजना म्हणजे, लेक लाडकी योजना. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर, प्रबळ बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

3) महिला उद्योगिनी योजना


महिलांना समाजात मानसन्मान मिळावा आणि विविध उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून त्या सक्षम व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने केवळ महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे.

4) सुकन्या समृद्धी योजना


पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याविषयी असलेल्या चिंतेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने 22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली.

5) जननी सुरक्षा योजना


देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू केली.

6) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0

केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

7) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना


एखाद्या महिलेच्या पतीचे अकस्मिक निधन झाले किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाल्यास महिलांना समाजात एकटं वावरताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि स्वबळावर आयुष्य जगण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

8) महिला समृद्धी कर्ज योजना


महाराष्ट्र शासनाकडून फक्त महिलांसाठी राबवण्यात येणारी ही व्यावसायिक कर्ज योजना आहे. व्यावसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली.

9) लखपती दीदी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.

10) कन्‍यादान योजना

विवाह समारंभावर होणारा फालतू खर्च टाळण्यासाठी आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्‍वयंसेवी संस्‍थांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने कन्यादान योजना, महाराष्ट्र सुरू केली आहे.

11) महिला सन्मान योजना: महाराष्ट्रातील सरकारी बसमध्ये महिलांसाठी 50% सवलत.

महिला सन्मान योजनेंतर्गत, महिला प्रवाशांना 17 मार्चपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत मिळत आहे

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

ट्रेनमधून प्रवास करताना अडचणी येताच ? 'या' टोल-फ्री नंबरवर करा तक्रार



ट्रेनमधून प्रवास करताना अडचणी येताच ? 'या' टोल-फ्री नंबरवर करा तक्रार

तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महतवाची आहे. कधी कधी रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या सुविधांबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कशी रिझर्व्ह केलेली सीट मिळत नाही तर कधी रेल्वेची वेळ गाठता येत नाही.

मग अशावेळी कोणाशी संपर्क करायचा ? हा मोठा प्रश्न असतो. आता मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नाही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक ( IRCTC Helpline ) सुरु केला आहे.


भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. प्रवासादरम्यान एखाद्याशी भांडण झाल्यास किंवा इतर समस्या आल्यास तुम्ही मदत घेऊ शकता किंवा तक्रार दाखल करू शकता. भारतीय रेल्वेने प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सर्व प्रकारच्या शंका, तक्रारी, सहाय्य यासाठी एकात्मिक 'रेल मदत ' हेल्पलाइन क्रमांक "139" सुरू केला आहे.

"भारतीय रेल्वेने सांगितले. ट्रेनमधून प्रवास करताना तुम्हाला मदत हवी असल्यास तुम्ही भारतीय रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करू शकता. हा क्रमांक टोल-फ्री आहे आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवण्यासाठी त्याचा वापर करू शकता.

विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेचा टोल-फ्री क्रमांक 139 विविध सेवा प्रदान करतो - तुम्ही फोन कॉल करण्याव्यतिरिक्त या नंबरवर एसएमएस (संदेश) पाठवू शकता. तक्रार नोंदवण्याव्यतिरिक्त, तुम्ही सुरक्षा, वैद्यकीय आणीबाणी, रेल्वे अपघात, ट्रेनशी संबंधित इतर कोणतीही तक्रार, सामान्य तक्रारी किंवा सतर्कतेबद्दल माहितीसाठी या नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय, तुमच्या तक्रारीच्या स्थितीची माहिती या क्रमांकावर उपलब्ध असेल.


हेल्पलाइन क्रमांक 139 भारतीय 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रवासी IVRS (इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) * ची निवड करू शकतात किंवा दाबून कॉल-सेंटर एक्झिक्युटिव्हशी थेट कनेक्ट होऊ शकतात.

सुरक्षितता आणि वैद्यकीय सहाय्यासाठी, प्रवाशाला 1 दाबावे लागेल, जे कॉल सेंटर एक्झिक्युटिव्हशी त्वरित कनेक्ट होते.

चौकशीसाठी, प्रवाशाला 2 दाबावे लागेल 

आणि 3 दाबावे उप मेनूमध्ये, PNR स्थिती, ट्रेनचे आगमन/निर्गमन, निवास, भाडे चौकशी, तिकीट बुकिंग, सिस्टम तिकीट रद्द करणे, वेक अप अलार्म सुविधा/गंतव्य सूचना, व्हीलचेअर बुकिंग, जेवण यासंबंधी माहिती. बुकिंग मिळू शकते.

सामान्य तक्रारींसाठी, प्रवाशांना 4 दाबावे लागेल

दक्षता संबंधित तक्रारींसाठी, प्रवाशांना 5 दाबावे लागेल

पार्सल आणि वस्तू संबंधित प्रश्नांसाठी, प्रवाशाला 6 दाबावे लागेल

IRCTC संचालित ट्रेनच्या प्रश्नांसाठी,

प्रवाश्यांना 7 दाबावे लागेल

तक्रारींच्या स्थितीसाठी, प्रवाशांना 9 दाबावे लागेल

कॉल सेंटर एक्झिक्युटिव्हशी बोलण्यासाठी प्रवाशाला * दाबावे लागेल.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

स्वत:चा व्यवसाय करायचाय? PM SVANidhi योजना करेल आर्थिक मदत, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

  ( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!!


स्वत:चा व्यवसाय करायचाय? PM SVANidhi योजना करेल आर्थिक मदत, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

भारत सरकार स्वयंरोजगाराला चालना देत आहे. यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना पीएम स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) आहे. या योजनेत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.

पीएम स्वानिधी योजना (PM SVANidhi Yojana) –

पीएम स्वानिधी योजनेत कर्जाद्वारे नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. कोविड महामारीनंतर ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत सरकार 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 10,000 रुपयांचे कर्ज मिळणार आहे. 

दुसऱ्यांदा 20,000 रुपये आणि 

तिसऱ्यांदा 50,000 रुपये कर्ज दिले जाईल. या योजनेंतर्गत मिळालेली कर्जाची रक्कम 12 महिन्यांच्या आत परत करावी लागते.


पीएम स्वानिधी योजनेचे फायदे –

यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.

-कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीवर 7 टक्के सबसिडी दिली जाते.

-डिजिटल पेमेंट करताना सरकार कॅशबॅकचा लाभ देते.

-लाभार्थ्याला 25 रुपये ते 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो.


अर्ज कसा करायचा ?

तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

– या योजनेसाठी तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडाल.

– आता तुम्ही हे कर्ज कोणत्या व्यवसायासाठी घेत आहात हे सांगावे लागेल.

– यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाते.

आवश्यक कागदपत्र काय आहे?

-आधार कार्ड

-बँक खाते क्रमांक (बँक खाते तपशील)

-पत्त्याचा पुरावा

– मोबाईल नंबर

– पॅन कार्ड

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल


प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल


बऱ्याचदा आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा रात्री- बेरात्री किंवा दिवसा देखील गाडीचे पेट्रोल किंवा डिझेल संपते. त्यामुळे रस्त्यात आपली तारांबळ उडते व खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते.

आपल्याला माहित आहे की रस्त्यावर जर कधी अपघात झाला तर मदतीला देखील जास्त करून कोणी धावून येत नाही. अशा प्रसंगी आपल्याला काय करावे हे उमजत नाही. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून जर अशा काही घटना प्रवासाच्या दरम्यान घडल्यात तर तुम्ही एका टोल फ्री नंबरवर कॉल करून उभ्या राहिलेल्या या समस्यांचे निराकरण करू शकतात.

आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा रस्त्यांवर टोलनाके असतात व या टोलनाक्यांवर आपण टॅक्स म्हणून पैसे भरत असतो. हा टॅक्स आपण त्या रस्त्यावरून गाडी चालवतो म्हणून भरतो. परंतु या टॅक्स भरल्यामुळे आपल्याला काही सुविधा देखील या माध्यमातून मिळतात.


मित्रांनो तुमचे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, PF KYC, Final PF Withdrawal, PF Nominee ad,  date claim

आणि ESIC संबंधित Aadhar KYC,  Family Ad, ESIC Card, व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.👇🏻

-----------------------------

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

परंतु बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसते. टोल टॅक्स भरल्यानंतर तुम्ही तो रस्त्याचा वापर तर करू शकतात परंतु कोणत्याही मेडिकल इमर्जन्सी मध्ये किंवा पानांमध्ये काही बिघाड झाला किंवा पेट्रोल, डिझेल संपले तर अशा प्रसंगी तुम्हाला मदत देखील मिळू शकते. याकरिता फक्त तुम्हाला देण्यात आलेल्या काही हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे गरजेचे असते. यातील महत्त्वाचे म्हणजे…


1)  पेट्रोल संपले तर :–

बऱ्याचदा आपण हायवेवरून प्रवास करत असताना अचानक पेट्रोल किंवा डिझेल संपते. दूर दूर पर्यंत आपल्याला पेट्रोल पंपाचा सुगावा लागत नाही व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. परंतु अशाप्रसंगी चिंता न करता तुमच्या टोल टॅक्स पावतीवर दिलेला जो काही हेल्पलाइन क्रमांक असतो त्यावर तुम्ही कॉल करणे गरजेचे आहे.

त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल दिले जाते किंवा पुरवले जाते. साहजिकच यामध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागतात परंतु होणारी समस्या मिटते. याकरिता पेट्रोल हेल्पलाइन क्रमांक पाहिले तर 8577051000 आणि 7237999944 यावर तुम्ही कॉल करू शकता.


2) वाहनामध्ये बिघाड झालातर :–

बऱ्याचदा प्रवास करत असताना दुचाकी असो किंवा कार यामध्ये काही बिघाड झाला तर समस्या निर्माण होऊ शकते. अशाप्रसंगी तुम्ही मेकॅनिक किंवा कार सेवेची देखील मदत घेऊ शकतात. याकरिता तुम्हाला 8577051000 आणि 7237999955 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात. त्यामध्ये मेकॅनिक येण्याची सुविधा ही फ्री मध्ये आहे. परंतु वाहनामध्ये काही समस्या निर्माण झाली असेल तर मेकॅनिक शुल्क आकारतो. जागेवर जर संबंधित वाहन दुरुस्त करता आले नाही तर ते सर्विस स्टेशनकडे देखील नेले जाते.


3) मेडिकल इमर्जन्सी मध्ये :–

बऱ्याचदा प्रवास करत असताना रस्त्यातच कोणी आजारी पडते व अशावेळी आपल्याला काय करावे हे समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेळ न घालवता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेला 8577051000 आणि 7237999911 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून मोफत ॲम्बुलन्स मिळवू शकतात.


याशिवाय तुम्हाला रस्त्यावर कुठल्याही प्रकारची इतर समस्या आली तर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1033 किंवा 108 वर कॉल करू शकतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...