हा ब्लॉग शोधा

रविवार, २० मार्च, २०२२

BH Series Number Plate : गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल तुम्हाला माहीती आहे का? कोण करु शकतं अर्ज

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


BH Series Number Plate :  गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल तुम्हाला माहीती आहे का? कोण करु शकतं अर्ज

नोकरीनिमित्त सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागतं. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

भारत सरकारने अखेर ही समस्या सोडवली आहे. आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.


BH नंबर प्लेट कोणत्या लोकांसाठी प्राधान्य?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही मालिका अशा लोकांसाठी सुरू केली आहे, ज्यांची नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदली होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विशेषत: संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले गेलं आहे.


आजच्या काळात कामामुळे लोकांना अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते. अशा परिस्थितीत, नवीन राज्यात पोहोचल्यावर, आपल्या वाहनाची नवीन नोंदणी करणे खूप डोकेदुखी आहे. आता या त्रासातून लोकांना दिलासा मिळाला आहे.

*Road Accident: तुमच्याकडून अपघात झाल्यास खरंच भरपाई द्यायची असते का?* अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.      https://digitalsalve.blogspot.com/2021/04/road-accident.html  

BH नंबर प्लेट साठी किती अतिरिक्त शुल्क भरावं लागणार?

या नवीन सीरिजमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 8 टक्के शुल्क भरून बीएच सीरिजचा क्रमांक मिळवता येईल. जर वाहनाची किंमत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर या सीरिजवरवर 10 टक्के दराने शुल्क आकारलं जाईल. बीएच सीरीजसाठी, वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 12 टक्के शुल्क भरावे लागेल.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )      

एक भारत, एक टॅक्स, एक नंबर प्लेट

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे कर्मचारीही या BH-Series चा लाभ घेऊ शकतील. 4 किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात. या मालिकेचा फॉरमॅट अशा प्रकारे असेल, नंबर प्लेटवर पहिले वर्ष लिहिलं जाईल. यानंतर भारत म्हणून BH लिहिलं असेल आणि त्यानंतर वाहन क्रमांक असेल.


BH सीरिजची खास गोष्ट म्हणजे या सीरिजचं वाहन भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणत्या अडथळ्याशिवाय जाऊ शकतं. नवीन ठिकाणी बदली करताना किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नवीन नोंदणी किंवा एनओसी आवश्यक नाही. सध्याच्या नंबर प्लेटनुसार वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जायचं असल्यास एनओसी घेऊन नवीन नोंदणी करावी लागते.


BH नंबर प्लेट बद्दल समजून घ्या

BH नंबर प्लेट नेहमीच्या नंबर प्लेट सारखीच आहे. पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरं आहेत, पण आताच्या नंबर प्लेटच्या नेमकी उलट ही नंबर प्लेट आहे. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही वाहन घ्याल ते वर्ष (उदा. आताचं वर्ष 22), त्यानंतर 'BH' म्हणजे भारत, त्यानतंर वाहन क्रमांक आणि 'A' म्हणजे वाहन श्रेणी. उदा. 22 BH 0756 A (वर्ष, भारत, वाहन क्रमांक, श्रेणी)


BH नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा?

बीएच नंबर प्लेट मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. नवीन वाहन खरेदी करताना, ग्राहक डीलर वाहन पोर्टलद्वारे BH नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतो.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या तुम्हाला माहीती आहे का?

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या तुम्हाला माहीती आहे का?

लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. पुर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जात, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जात असे अज ही काही प्रमाणात असे प्रकार होताना अढळून येतात.

लग्न ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी भारतामध्ये कायद्याने त्यासाठी वयाची बंधने आहेत. भारतात 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम' 2006' करण्यात आला आणि 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अमलात आला.

बालविवाहाची कारणे :-

मुलगी सामान्यत: एक ओझे मानली जाते आणि पारंपरिकरित्या समाजात तिचे लग्न लवकरात लवकर केले जाण्याची वृत्ती आहे. बालविवाहाचे समर्थन करताना मुलीचे पालक असे म्हणतात की लहान वयात जर मुलांचा विवाह करुन दिला तर, हुंडा कमी द्यावा लागतो. पण ते हे विसरुन जातात कि 'हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961' नुसार हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे. मुलींना आपला साथीदार शोधण्याची समज येण्याच्या आधीच तिचे लग्न केले तर पालकांसाठी आपल्या जातीतच, आपल्या तोलामोलाचं कुटुंब मुलीसाठी शोधण्यास सहजता असते.

मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे पाहतात. लवकर विवाह म्हणजे वधूची पवित्रता आणि कौमार्य याची खात्री करण्याचा एक मार्ग आहे. संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली सुध्दा अनेक बाल विवाह केले जातात. शिक्षणाचा अभाव, बाल विवाहाच्या दूष्परिणामाविषयी जागृतीचा अभाव. कायद्याची अंमलबजावणी आणि इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाकडून कार्यवाहीत उदासिनता ही बालविवाह सुरु असण्याची महत्वपूर्ण कारणे आहेत.


यांचा बालविवाह होण्याची शक्यता आहे :-

1) शाळेत अनियमित शिक्षण अर्धवट सोडलेल्या आणि नापास झालेल्या मुली. 

2) स्थलांतरित कुटुंबातील मुली, वयात येणारे मुले - मुली,

3) घरातील कर्ती व्यक्ती मृत्यू पावल्यास, 

4) जास्त मुले असणारे कुटुंब,

5) गरीब घरातील, मुला मुलींची जबाबदारी टाळणारी कुटुंब,

6) कर्जबाजारी कुटुंबातील मुलगी, 

7) व्यसनी कुटुंबातील मुलगी, 

8) एखादी अत्याचारग्रस्त मुलगी,

9) प्रेमात गुंतलेली मुलगी, 

10) सामाजिक परंपरा, रुढी या प्रभावामुळे होणारे लग्न,

11) असुरक्षित वातावरण असल्यामुळे होणारे लग्न,

12) दुर्लक्षित मुलींचे कुटुंब, 

13) निराधार मुली, 

14) वस्तीतील मुलीसोबत एखादी घटना, एखाद्या मुलीसोबत लैंगिक शोषणाची घटना 

15) अथवा एखादी मुलगी प्रेमविवाहात निघून गेली असल्यास 

16) अशा घटनेवरुन वस्तीत, गावात भीतीपोटी इतर मुलींचे लग्न.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.


बालविवाह का करु नये?

बालविवाह हा मुलाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. बालविवाह झालेल्या मुलींचा शारीरिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्षे गाठायच्या आतच गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, मन, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या साऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाहीत. लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच मागासलेपणाचे लक्षण आहे.

दिनांक 3 जून 2013 व दिनांक 18 ऑगस्ट 2016 च्या अधिसूचनेनुसार ग्रामसेवक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना अंगणवाडी ताई सहाय्य करतात. याशिवाय पोलीस, ग्रामसेवक, ग्रामसेविका, शिक्षक व समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची बालविवाह रोखण्याची जबाबदारी आहे.


शिक्षा :-

बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने बालविवाह होत असल्याची तक्रार लगेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 नुसार प्रथम श्रेणी न्यायपीठासमोर तक्रार अर्ज दाखल करुन बालविवाह रोखण्याबाबत आदेश मिळावेत. बालकल्याण समिती सुध्दा निर्णय घेऊ शकते. बालविवाह अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी आणि सीआरपीसीच्या कलम 151 नुसार पोलिसांना अपराध रोखण्यासाठी अटक करण्याचे सर्वतोपरी अधिकार आहेत.

18 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

बालविवाह झाल्यास, संबधित वर व वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, व जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वाना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.

मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायद्याने अल्पवयीन ठरविलेल्या व्यक्तिचे लग्न झाल्यास पोस्को, 2012 कायद्यानुसार सुध्दा गुन्हा दाखल होऊ शकतो.

अशी होते बालविवाह करणाऱ्यांवर कारवाई 

गावागावात बालसंरक्षण समिती तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून एखादा बालविवाह होत असल्याची माहिती या विभागाला मिळते. यानंतर शिक्षण विभागाच्या माध्यमातून अत्यंत गोपनिय पद्धतीने त्यांच्या वयाची पडताळणी केली जाते. बालविवाह असल्यास याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात येते. यानंतर लग्न होण्यापूर्वीच त्यावर कारवाई केली जाते. यावेळी होणारे वधू आणि वर यांचे समुपदेशन केले जाते. तसेच त्यांच्या पालकांना आम्ही आमच्या मुलांचे ते वयस्क होण्यापूर्वी लग्न लावून देणार नाही, असे बालकल्याण समितीसमोर लिहून द्यावे लागते.

जर लग्न झाले तर यांच्यावर होते कारवाई

जर लग्नाची प्रक्रिया पार पडली, तर केवळ पालकांवरच नाही तर लग्नपत्रिका छापणारा मुद्रक, पुरोहित, फोटोग्राफर, कॅटरिंग व्यावसायिक, बिछायत केंद्र संचालक, सरपंच यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जात असल्याची माहितीही साखरकर यांनी यावेळी बोलताना दिली.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )      

बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यासाठी किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची 'बालविवाह प्रतिबंध अधिकारी' म्हणून नेमणूक करण्यात येते. तसेच शासन त्या त्या विभागातील समाजसेवक संस्था, ग्रामपंचायती, सरकारी कार्यालये, गैरसरकारी संस्था यांना बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यास मदत करावी अशी विनंती करू शकते.


बालविवाह जबरदस्तीने झाल्यास

जर बालवधू वा बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर तो विवाह रद्दबातल करण्यासाठी संबंधित वर वा वधू जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतात.

असा अर्ज दाखल करताना जर अर्जदार वर वा वधूचे वय किमान कायदेशीर वयापेक्षा कमी असल्यास थोडक्यात अर्जदार सज्ञान नसल्यास अर्जदाराला असा खटला त्याच्या पालकांच्या किंवा मित्राच्याद्वारे व बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याच्या सोबत दाखल करावा लागतो.

हा अर्ज बालविवाह झाल्यापासून अर्जदार वर असल्यास वयाच्या २३ वर्षापर्यंत व वधू असल्यास वयाच्या २० वर्षापर्यंत केव्हाही दाखल करू शकतात.

या अर्जानंतर संबंधित बालविवाह रद्दबातल झाल्याचा आदेश देताना न्यायालय सोबतच दोन्ही पक्षाकडून विवाहाच्या वेळी दिल्या गेलेल्या दागदागिने, रोख रक्कम, व इतर भेटवस्तू इत्यादी सर्व गोष्टी किंवा त्या वस्तूंची किंमत पैशाच्या स्वरूपात ज्याची त्याला परत करावी हा आदेश देईल. मात्र असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेईल.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने * स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

विवाह रद्दबातल झाला असा आदेश देतांनाच न्यायालय वर मुलाला वा त्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांना, वधूचा पुनः विवाह होईपर्यंत तिच्या निर्वाहासाठी विशेष भत्ता देण्याचे व तिच्या राहण्याची योग्य सोय करण्याची जबाबदारी संबंधीही आदेश देईल.

हा निर्वाहभत्ता एक रकमी असावा किंवा मासिक असावा. याबाबत निर्णय घेतांना न्यायालय दोन्ही पक्षांची परिस्थिती व जीवनमान लक्षात घेईल.

बालविवाह जरी रद्दबातल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते.

बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च यांचे आदेश दोन्ही पक्षांची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय देईल.


बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी अर्ज कुठे करता येईल

जिथे वादी राहतो किंवा

जिथे प्रतिवादी राहतो किंवा

जिथे त्यांचा विवाह झाला किंवा

जिथे विवाहानंतर ते एकत्र राहत होते

यापैकी कोणत्याही एका जिल्हा दिवाणी न्यायालयात

बालविवाहासंबंधी वरील स्वरुपाचे कायदे करण्यात आलेले असले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.

सहकारी गृहनिर्माण संस्था.कायदे व नियम थोडक्यात माहिती




सहकारी गृहनिर्माण संस्था.कायदे व नियम थोडक्यात माहिती

सहकारी गृहनिर्माण संस्था ही कायदेशीररित्या प्रस्थापित संस्था  आहे जी तिच्या सदस्यांच्या किंवा रहिवाशांच्या मालकीच्या सामान्य गरजांसाठी असते. गृहनिर्माण संस्था जमीन खरेदी करते, ती विकसित करते, सदनिका बांधते आणि त्यांना त्यांच्या सदस्यांना वाटप करते.

गृहनिर्माण सहकारी संस्थेचा उद्देश 

कॉम्प्लेक्समध्ये घरे किंवा अतिरिक्त संरचना बांधण्यासाठी कर्ज देऊन सोसायटी सदस्यांना आधार देणे.

जमीन घेणे, सदनिका बांधणे आणि त्यांना सदस्यांमध्ये वाटणे.

गृहनिर्माण संस्थेच्या आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे आणि सदस्यांमध्ये स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे.

समाजात आदर्श सामाजिक-आर्थिक वातावरण सक्षम करून निरोगी राहणीमान सुलभ करणे.

पाणी आणि वीज पुरवठा सारख्या मूलभूत सुविधा पुरवणे आणि सोसायटीची नियमित देखभाल सुनिश्चित करणे.


तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )       

सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये.


  1. स्वैच्छिक संस्था: गृहनिर्माण सहकारी संस्था त्यांच्या कामकाजाच्या संदर्भात स्वयंपूर्ण संस्था आहेत, स्वावलंबन आणि स्व-मदतीच्या कल्पनेवर आधारित.
  2. खुले सदस्यत्व: को -ऑप हाऊसिंग सोसायटीचे सदस्यत्व सर्व रूची असलेल्या व्यक्तींसाठी खुले आहे.
  3. स्वायत्तता आणि स्वातंत्र्य: ते आहेत अनेक पैलूंमध्ये स्वायत्त आणि स्वतंत्र.
  4. लोकशाही नेतृत्व: सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी किंवा प्रतिनिधींची निवड निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे केली जाते.
  5. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व: सहकारी संस्था कायद्यानुसार नोंदणीकृत सहकारी संस्था आहे. नोंदणीकृत सहकारी संस्था स्थानिक/ राष्ट्रीय कायद्यांच्या अधीन राहून कायदेशीर संस्था बनतात.
  6. आर्थिक योगदान: समाजातील प्रत्येक सदस्य सामान्य मालमत्ता खरेदी आणि देखभाल करण्यासाठी समान योगदान देतो.
  7. मर्यादित दायित्व: खर्च प्रत्येक सदस्याने दिलेल्या योगदानाच्या प्रमाणात समान प्रमाणात सामायिक केला जातो.
  8. सदस्यांसाठी फायदेशीर: कल्याण, सुविधा आणि समृद्धी हे गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या प्रत्येक सदस्यासाठी स्वार्थ आणि पॉवर प्लेशिवाय सर्वोच्च प्राधान्य आहे.
  9. प्रशिक्षण आणि माहिती: गृहनिर्माण सहकारी त्यांच्या सदस्यांना कायदेशीर अनुपालन, व्यवस्थापन आणि समाजात राहण्याचे फायदे याबद्दल प्रशिक्षण आणि ज्ञान प्रदान करतात जेणेकरून ते त्यांच्या भूमिका प्रभावीपणे पार पाडू शकतील.
  10. परस्पर मदत: गृहनिर्माण सहकारी सदस्यांना सर्वोत्तम पद्धतींचे पालन करण्यास सक्षम करतात आणि स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरचना आणि प्रतिमानांद्वारे त्यांचे जीवनमान चांगले राहण्यासाठी त्यांना समर्थन देतात.

गृहनिर्माण सहकारी संस्थांचे प्रकार

भाडेकरू मालकीच्या गृहनिर्माण सोसायट्या: 

या प्रकारच्या सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये, जमीन सोसायट्यांद्वारे लीज होल्ड किंवा फ्रीहोल्ड तत्त्वावर ठेवली जाते. सदस्य आहेत घरांचे मालक आणि जमिनीचे लीजधारक. त्यांना घरे उपयोजित आणि हस्तांतरित करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तथापि, ते त्यांच्या गरजेनुसार घरे बांधू शकतात.

भाडेकरू सह-भागीदारी गृहनिर्माण सोसायट्या: 

या श्रेणी अंतर्गत सहकारी संस्था जमीन आणि इमारत एकतर भाडेपट्टीवर किंवा फ्रीहोल्ड तत्त्वावर धारण करतात. सदस्यांना आरंभिक वाटा आणि मासिक भाडे भरल्यानंतर लगेच भोगवटा मिळतो.

गृहनिर्माण गहाण सोसायट्या: 

या गृहनिर्माण सोसायट्या पतसंस्थांसारख्या आहेत जे आपल्या सदस्यांना घरे बांधण्यासाठी कर्ज देतात. तथापि, सदस्यांना बांधकाम कामाच्या व्यवस्थेची जबाबदारी आहे.

घरबांधणी किंवा घरबांधणी सोसायट्या: 

या वर्गात सोसायट्या त्यांच्या सदस्यांच्या वतीने घरे बांधतात. घरे बांधल्यानंतर ती सभासदांच्या ताब्यात दिली जातात. बांधकामावर खर्च केलेले पैसे कर्ज म्हणून वसूल केले जातात.


सहकारी गृहनिर्माण संस्था कशी तयार करावी?

संबंधित राज्ये सोसायटी तयार करण्यासाठी किमान 11 सदस्य समान उद्दिष्ट असणारे असावेत. सदस्य, समान हितसंबंध असलेले, एकाच परिसरातील रहिवासी, संस्थेचे कर्मचारी किंवा एका गटाशी संबंधित असावेत.

सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी कशी करावी?

सहकारी सोसायटी कायदा, 1912 अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी अनिवार्य आहे.

गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांद्वारे मुख्य प्रवर्तक निवडणे.
सदस्यांनी दोन पर्यायांसह सोसायटीसाठी नाव निवडणे आवश्यक आहे. अर्ज प्रमोटरचे नाव भरा आणि रजिस्ट्रारकडे सबमिट करा आणि नोंदणी शुल्क भरा.
त्यानंतर उपविधी स्वीकारली जातात. प्रत्येक घरात एक भाग भांडवल असेल जे सर्व रहिवाशांनी समान प्रमाणात दिले पाहिजे.

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी कागदपत्रे

1) नोंदणीसाठी अर्ज.

2) सर्व बँक प्रमाणपत्रे/खाते विवरण.

3) अर्जाच्या चार प्रती, किमान 90 ०% च्या स्वाक्षऱ्या प्रवर्तक सदस्य.

4) प्रवर्तक सदस्यांचा तपशील.

गृहनिर्माण संस्था नोंदणीचे फायदे

👉 मित्रांनो, मोफा ऍक्ट 1963 व रेरा कायद्याप्रमाणे बिल्डरने 51 टक्के सदनिकांची विक्री झाल्यानंतर संस्थेची नोंदणी करून द्यायची आहे.

👉 परंतु बिल्डर असे करत नाहीत, उलट अनेक ठिकाणी असे निदर्शनास येत आहे की, बिल्डर प्रत्येक सदनिकाधारकाकडून किमान 1 वर्षे ते 3 वर्षे एवढा देखभाल खर्च बेकायदेशीरपणे आगाऊ फ्लॅट घेतानाच घेतात, 
जे पुर्णपणे चुकीचे आहे, आणि इथेच फसवणुकीला सुरवात होते,

👉 अशाप्रकारे प्रत्येक फ्लॅट धारकाकडून किमान 1 ते 3 वर्षांचा देखभाल खर्च आगाऊ घेतल्यामुळे एकूण रक्कम काही लाखांची होते, व बिल्डर त्याचा वापर करतो.

👉 त्यामुळे बिल्डर 1 ते 2 वर्षे संस्थेच्या नोंदणी कडे लक्ष देत नाही, बिल्डरचे फ्लॅट्स विकलेले असतात त्यामुळे देखभाल खर्च घेऊनही सोयी आणि सुविधा बिल्डर देत नाही, बरीच छोटी मोठी कामे मुद्धाम अपूर्ण ठेवलेली असतात, आणि अशावेळेस अनेकांची अनेक मते येतात, 

👉 तर खूप ठिकाणी काही सभासद एकत्र येउन स्वतःहून देखभाल खर्च गोळा करण्यास सुरुवात करतात, मित्रांनो जे पूर्णपणे चुकीचे आहे, संस्थेची नोंदणी नसताना अशाप्रकारे पैसे गोळा करणे बेकायदेशीर आहे व अशाप्रकारे पैसे गोळा करणारे एकप्रकारे गुन्ह्यास पात्र आहेत.

👉 तर काही ठिकाणी बिल्डर संस्थेची नोंदणी करून देण्यास तयार असतो मात्र, अतिउत्साही आणि अतिशहाणे काही सभासद नेमके आडवे येतात व बिल्डरने हे केलेलं नाही, बिल्डरने ते केलेलं नाही, हे काम अपूर्ण आहे ते काम अपूर्ण आहे अशी फक्त तोंडी सुरवात करून संस्थेच्या नोंदणीला खीळ घालतात.

👉 अशात सुरवातीची 1 ते 2 वर्षे आरामात निघून जातात व बिल्डर आपल्याला हवी असलेली माणसे ओळखतो व त्यांनाच कमिटी मध्ये घेतो, त्यांनतर पुढे काय होते ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ते कमेंट्स मध्ये व्यक्त करा. 
 
👉 मित्रांनो बिल्डरने कोणतेही काम अपूर्ण ठेवलेले असेल तरीही एकदा का सोसायटीची नोंदणी झाली की त्याच्यामध्यमातून बिल्डरला लेखी कळवता येऊ शकते, त्याचा लेखी जाब विचारता येऊ शकतो.

👉 मित्रांनो याविषयावर आतापर्यंत खूप काही लिहिलेलं आहे ते अवश्य वाचा, त्याचा उपयोग करा स्वतःसोबत इतरांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. 
बिल्डरने आगाऊ घेतलेल्या मेंटेनन्सचा जाब विचारा.




सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहण्याचे फायदे

हाऊसिंग सोसायटीचे सदस्य आर्थिक समस्यांवर नियंत्रण ठेवतात आणि निर्णय घेतात. प्रत्येक सदस्यासाठी सेवा आणि सुविधांच्या दृष्टीने खर्च खूपच कमी आहे. वाजवी डाउन पेमेंट, कमी प्री-क्लोजर शुल्क आणि दीर्घ तारण मुदतीसह, हे कोणत्याही स्वतंत्र मालकीपेक्षा अधिक परवडणारे बनते.


सुरक्षित आणि सुरक्षित गुंतवणूक


सहकारी गृहनिर्माण संस्था स्थिर आणि विश्वासार्ह आहेत कारण त्यांचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे आणि त्यांचे कामकाज टिकवण्याचे साधन आहे. सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये घर घेणे ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. जमीनदारांकडून कोणताही हस्तक्षेप न करता, सदस्य त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांच्या इच्छेनुसार राहू शकतात. रिकाम्या झाल्यावरही सदनिका, भोगवटा लाभ अबाधित राहतात आणि एकतर तो भाड्याने किंवा भाड्याने देऊ शकतो.

उत्तम सेवा आणि सुविधा

सदस्य मालकीच्या भावनेने परिसराची काळजी घेतात. चांगल्या व्यवस्थापनाची आणि चांगल्या सुविधांची अपेक्षा करता येते. प्रत्येक सदस्याच्या गरजा योग्यरित्या पूर्ण केल्या जातात कारण ते इतरांच्या हितासाठी त्यांचे मत मांडू शकतात.

लोकशाही नेतृत्व

सहकारी गृहनिर्माण संस्था लोकशाही मार्गाने व्यवस्थापित केली जाते ज्यामध्ये प्रत्येक सदस्य भागधारक असतो. प्रत्येक सदस्याला समान अधिकार आणि विशेषाधिकार आहेत. सोसायटीचे व्यवस्थापन करणारे पदाधिकारी मतदानाद्वारे निवडले जातात.

सामायिक जबाबदाऱ्या

मालक म्हणून जबाबदारी विविध सदस्यांमध्ये विभागली गेली आहे. सहकारी संस्था देखभाल आणि दुरुस्तीची कामे, विमा आणि बदलीसाठी जबाबदार असतील. सभासदांनी सोसायटीमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी देखभाल शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच, सदस्यांना सुरुवातीपासून पुनर्विकासाच्या टप्प्यापर्यंत, रचना आणि नियोजनाच्या बाबतीत एक मत आहे. देखभाल आणि ओव्हरहेड शुल्क कमीत कमी आणि सदस्यांमध्ये तितकेच विभागलेले आहेत.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------
---

साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.

सोमवार, १४ मार्च, २०२२

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले नसतानाही तुम्हाला वाहतुक शाखेकडून दंडाची रक्कम भरण्याकरीता मेसेज आला आहे. तर मोबाईलवरूनच रद्द करा आता तुमच ई-चलन

                    

 ( BLOGGER )  संतोष साळवे...7900094419          
वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले नसतानाही तुम्हाला वाहतुक शाखेकडून दंडाची रक्कम भरण्याकरीता मेसेज आला आहे. तर मोबाईलवरूनच रद्द करा आता तुमच ई-चलन

शहर वाहतुक शाखेतर्फे सीसीटीव्ही कक्षामार्फत शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

लोकन्यायालय म्हणजे काय ? अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://digitalsalve.blogspot.com/2022/03/12032022.html

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले नसतानाही अनेक नागरीकांना वाहतुक शाखेकडून दंडाची रक्कम भरण्याकरीता मेसेज प्राप्त झाले.त्यामुळे हजारो वाहन चालकांकडून दररोज वाहतुक शाखेच्या कार्यालयात गर्दी केली जात आहे. संबंधितांचा वेळ वाचावा, त्यांचा ताण कमी व्हावा, यासाठी वाहतुक पोलिसांकडून मोबाईल ॲपद्वारे तक्रारी करण्यास सांगितले आहे. त्याद्वारे त्यांच्या तक्रारींचे निरसन केले जाणार.


शहर वाहतुक शाखेतर्फे सीसीटीव्ही कक्षामार्फत शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार ई-चलान पद्धतीद्वारे संबंधित वाहनचालकास दंडाची रक्कम भरण्याबाबतचे मेसेज पाठविले जातात. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  
  
दुसरीकडे याच ई-चलान पद्धतीच्या तांत्रिक चुकीमुळे अनेक नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केलेले नसतानाही त्यांना ई-चलानचे मेसेज येत आहेत. त्यामुळे असंख्य नागरीक त्रस्त असून ही तांत्रिक चुक सुधारावी, आपल्या नावावर आलेला दंड रद्द व्हावा, यासाठी वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे जात आहेत. या प्रकारामुळे नागरीकांना होणारा त्रास टाळण्यासाठी, त्यांचा वेळ वाचावा यासाठी वाहतुक शाखेकडून मोबाईल ॲपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या माध्यमाद्वारे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे तत्काळ निरसन करणार आहे.

*(विधी सेवा प्राधिकरण) न्यायासाठी वकील मोफत उपलब्ध गरजुंपर्यंत कायदेशीर मदत पोहचवण्याचा एक प्रयत्न,* अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

वाहतुकीच्या नियमभंगाबाबत आलेल्या चुकीच्या चलनाबाबत नागरिकांनी मोबाईल ॲप, ट्विटर, व्हॉट्‌सअॅपवर तक्रारी कराव्यात. त्यांचे वाहतूक शाखेकडून निरसन केले जाईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ व मानसिक त्रास वाचेल.


तक्रार कशी करावी...

गुगल प्ले स्टोअरमधून mahatrafficaap हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामध्ये grievance या टॅबवर नागरिकांनी चुकीच्या चलनाबाबत ऑनलाइन तक्रार करावी.

नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी व इत्तर कोणतीही गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, 

जसे कि सिग्नल तोडला जाणे,

हेल्मेट न वापरणे, 

ओव्हर स्पीडींग, 

नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड (फाइन) लावला जातो. हि दंडाची प्रक्रिया आता तुम्ही घरबसल्या भरू शकतात.संपर्क करा

तुमच्या गाडीच्या नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक केला तर. महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांकडून तुमच्या गाडीच्या दंड (फाइन) विषयी तुमच्या फोन वर मेसेज  जातो. तुमच्या गाडीच्या नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी संपर्क करा.

मित्रानो तुम्हाला वरील या सर्व  सेवा घरबसल्या मिळणार आहे.. संपर्क करा.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.


पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc. *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!*

बुधवार, ९ मार्च, २०२२

गावचा महसूल गोळा करणाऱ्या तलाठ्यांना शासनाकडून दिलेले अधिकार आणि कर्तव्य माहिती आहेत का?

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419  

                 वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

गावचा महसूल गोळा करणाऱ्या तलाठ्यांना शासनाकडून दिलेले अधिकार आणि कर्तव्य माहिती आहेत का?

आपला देश सर्वात जास्त खेड्यानी जोडला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पद्धती बऱ्यापैकी एकमेकांवर अवलंबून असते. गावातील शासकीय कार्यालयातील कामांची माहिती घेण्यासाठी शेतकरी अथवा गावातील सामान्य माणूस सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत असतो.त्यामुळे गावातील चावडी ग्रामपंचायत नेहमी गजबजलेली असते. दरम्यान गावच्या महसूलाबाबत सर्वात जास्त माहिती तलाठ्यांना असते तसे अधिकारही त्यांना असतात परंतु तलाठी नेमके काय काम करतात याबाबत बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते यासाठी तलाठीची कामे काय असतात हे जाणून घेऊया.

तलाठ्यांना असलेले अधिकार

१) शेतकऱ्याच्या मागणीनुसार सर्व प्रकारचे उतारे व दाखले देणे.

२) वारस रजिस्टरला वारसाची नोंद करणे. वारस ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची नोंद फेरफार पुस्तकात करणे.

३) फेरफार पुस्तकात खरेदीखताची नोंद करणे.

४) पिक पाहणीची नोंद करणे. स्वतः मालक जमीन करत असल्यास खुद्द अशी नोंद करणे. अन्य व्यक्ती जमीन कसत असल्याचे आढळल्यास वहिवाट सदरी सदर व्यक्तीची नोंद करण्यासाठी फॉर्म नं. १४ भरून तहसिलदारांकडे पाठवणे.

५) तहसिलदारांनी जमीन वाटपाचा आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून वाटपानुसार वेगवेगळे ७/१२ करणे.

६) जमीन महसूलाची वसूली करणे.

७) शासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे. उदा. निवडणूक काम, नुकसानीचे पंचनामे, तगाईचे वाटप, न्यायालयाच्या हुकूमाची अंमलबजावणी करणे आदि.

८) जमिनीत असलेली विहिर, बोअर तसेच फळझाडे, इकदार याची नोंद ७/१२ वर करणे.

*शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यापुढे "ई-केवायसी" केल्याशिवाय PM Kisanचे पैसे मिळणार नाही*

पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.म्हणजे

मार्च 2023 पासून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला त्याआधी ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. *संपर्क करा.. साळवे ईटंरप्राजेस...  सुष्टी महा ई सुविधा / संतोष साळवे...7900094419

तलाठीला या गोष्टीचा अधिकार नाही :

१) तलाठ्यास खाते फोडीचा अधिकार नाही. जमीन महसूल अधिनियमानुसार कलम ८५ अन्वये असे अधिकार तहसिलदारांकडे आहे. तहसिलदारांनी दिलेल्या खाते फोडीच्या आदेशाची अंमलबजावणी तलाठ्यास करायची असते.

२) ७/१२ वर होणारा कोणताही बदल हा फेरफार नोंदी द्वारेच करणे तलाठ्यावर बंधनकारक असते.

३) फेरफार नोंद मंजूर करण्याचा अधिकार तलाठ्यास नसून तो अधिकार मंडळ अधिकारी अगर सर्कल यांना आहे.

४) कोणत्याही मंजूर अगर रद्द केलेल्या नोंदीत फेरबदल करण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.

५) पिक पाहणी सदरी मूळ मालकाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीचे नाव लावण्याचा अधिकार तलाठ्यास नाही. अन्य व्यक्तीची वहिवाट आढळल्यास तलाठ्याने फॉर्म नं. १४ भरून तहसिलदारांकडे पाठवावी. तहसिलदार त्याबाबत निर्णय घेतात.

६) नवीन शर्तीची जमीन विक्री करण्यास परवानगी देण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.

७) ७/१२ वरील कुठलाही शेरा कमी करण्याचा अधिकार तलाठ्यास नसतो. आणेवारी लावण्याचा अधिकार तलाठ्यांना नसून तहसिलदारांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी तलाठ्यांना काय अधिकार असतात पाहून त्यांच्याकडे मागणी करावी.

तलाठ्याची कर्तव्ये.) सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास*

महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे 'तलाठी' होय. तलाठयांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम व त्याखालील विविध नियमांनुसार वेगवेगळी कार्ये करावी लागतात.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने * स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

तलाठ्यांना महसुली अभिलेखे ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय, गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागामार्फत केली जाणारी विविध कामे तालांठ्यांमार्फत पार पाडली जातात. जसे, निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीची कामे, 

मतदार याद्या तयार करणे, शिधापत्रिकांची कामे, 

कृषी गणना करणे अशी निरनिराळी कामे करावी लागतात.

तलाठ्याची कर्तव्ये.

ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.

शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.

नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 154 नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे.

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना* अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/07/blog-post_8.html 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.

तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 1 ते 3 गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील 10 ते 15 गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.

तलाठी - मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार - तहसीलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी- अशी पदांची चढती रचना आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

*सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास*

प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला समोर जावं लागत, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ. जेणेंकरून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.

खरेदीखत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. प्रत्येक अर्जावर तलाठयाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक असते. 


अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठ्याने फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद केली पाहिजे. तलाठी फेरफार नोंदवहीमध्ये ज्या नोंद करील, त्या नोंदीची संपूर्ण प्रत चावडीमध्ये ठळक ठिकाणी लावली पाहिजे, आता ऑनलाईन चावडी वर सूचना टाकली जाते. त्यानंतर अधिकार अभिलेख किंवा फेरफार नोंदवहीवरून त्या फेरफारांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींना लेखी कळवले पाहिजे. सदर फेरफार नोंद पेन्सिलीने लिहिली जाते आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यास आलेली नाही असा शेरा लिहावा लागतो.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.


*फेरफारवर हरकत न आल्यास*

1) फेरफारवर आक्षेप अथवा हरकत घेण्याचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो.

2) पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आक्षेप अथवा हरकत न आल्यास मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी फेरफार नोंदवहीमधील नोंद प्रमाणित करतो.

3) सदर प्रमाणित नोंद तलाठ्याने अधिकार अभिलेखामध्ये शाईने अभिलिखित करायची असते. या संपूर्ण प्रक्रियेला जास्तीत जास्त तीस दिवस लागू शकतात.

4) म्हणजे हरकत न आल्यास जास्तीत जास्त 30 दिवसात तुमचे नाव सातबारा व मिळकत पत्रिकेवर लागले पाहिजे. 

*भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा*    आधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://digitalsalve.blogspot.com/2021/05/blog-post_86.html। 

*फेरफारवर आक्षेप आल्यास*

1) फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या नोंदीवर तलाठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास, तलाठ्याने विवादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद केली पाहिजे.

2) तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला आक्षेप मिळाल्याबद्दलची विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब दिली पाहिजे.

3) त्यानंतर दोन्ही पक्षकारांचे म्हणणे एकूण घेऊन मंडळ निरीक्षक किंवा भूमापन अधिकारी फेरफार नोंद प्रमाणित करतात किंवा रद्द करतात.

4) नोंद प्रमाणित केल्यास तलाठ्याने ती अधिकार अभिलेखामध्ये शाईने अभिलिखित करायची असते, आणि नोंद रद्द केल्यास अधिकार अभिलेखात पेन्सिलीने केलेली नोंद खोडून टाकायची असते.

रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

*तलाठी टाळाटाळ करत असल्यास*

काही अप्रामाणिक आणि भ्रष्ट तलाठी (वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वादाने) फेरफार नोंदी धरण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता असते. त्यामुळे तलाठ्याला अर्ज केल्यावर चौथ्या पाचव्या दिवशीच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुम्ही खालील माहिती घ्या.

1) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजी केलेल्या अर्जावर आपल्या कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीसंबंधित कागदपत्रांची साक्षांकित प्रत द्यावी.

2) जमीन महसूल अधिनियम कलम 150(2) अन्वये सूचना काढली असल्यास त्याची एक प्रत देण्यात यावी. तसेच सदर फेरफारवर हरकत आली असल्यास विवादग्रस्त नोंदवहीतील संबंधित हरकत नोंद असलेल्या पृष्ठाची साक्षांकित प्रत देण्यात यावी.

3) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजीच्या अर्जानंतर मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयास भेट दिली असल्यास त्या दिवसाच्या मंडळ निरीक्षक यांच्या भेटीच्या नोंदींची साक्षांकित प्रत देण्यात यावी.


*जर तलाठी दाद देतच नसेल तर?*

जर तलाठी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करूनही तुमच्या अर्जास दाद देत नसेल तर मात्र तुम्ही *शासकीय कर्तव्य पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 ( यालाच दप्तर दिरंगाई कायदा असेही म्हणतात ) कायदाचे कलम 10 चे उल्लंघन केल्याबाबत तलाठी आणि मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रधान सचिव (महसूल), विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करा. सदर तक्रार पॊष्टाने पाठवा त्यानंतर प्रधान सचिव महसूल, विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुमच्या तक्रारींवर केलेल्या कारवाई बाबत माहिती मागा, पाठपुरावा घ्या.

दप्तर दिरंगाई कायदा मधील कलम 10 च्या तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आलेल्या अर्जावर 7 दिवस कार्यवाही सुरु करायची आहे. तसेच अर्ज 45 दिवसात निकाली काढायचा असतो.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...