हा ब्लॉग शोधा

शनिवार, २७ जुलै, २०२४

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे

 


बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे

शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत मजूर बांधकाम कामगार म्हणून काम करतात. बांधकाम करत असतांना त्यांना एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर स्थलांतर करावे लागते.

अशावेळी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे भांडी अशा मजुरांना त्या ठिकाणी खरेदी करावी लागतात. परंतु तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता शासनाकडून मोफत भांडी मिळणार आहे.

2024-25 बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ?

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/07/2021.html

बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


तुम्हाला जर हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करू शकता.

भांडी जीआर डाउनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1y6IlkKvWmoBpcCzqcT4aF4fzA2x-y75o/view?usp=drivesdk

वरील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि बघा जीआर मध्ये कोणकोणती भांडी बांधकाम कामगारांना मिळणार आहेत तर भांडी तुम्हाला मिळाली आहेत का याची खात्री करून घ्या.

अर्ज डाऊनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1LA5cjgCl6n1reO5dwkGsYFxz0NvzqpYw/view?usp=drivesdk

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अर्जासोबत ही कागदपत्र जोडावी लागणार आहे

  • पासपोर्ट फोटो.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • राशन कार्ड झेरॉक्स.
  • लेबर कार्ड झेरॉक्स.
  • 1 रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
  • आधार कार्डची झेरॉक्स

----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, २५ जुलै, २०२४

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर

 

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहिर झाल्या आहे. या योजनेसाठी प्रभागसमितीनिहाय अर्जाचे वितरण सुरू असून 23 ऑगस्ट 2024 पर्यत अर्ज वितरीत केले जाणार आहेत.


तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येतील. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती, मुले, महिला यांनी घ्यावा 

  1. दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनांमध्ये 
  2. 'दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती',
  3. 'दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती'
  4. दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  5. 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  6. 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  7. 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  8. 'दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे'
  9. 'दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे'
  10. 'दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करणेकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे', 
  11. 'दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करुन देणे'
  12. 'दिव्यांग बेरोजगारांना भत्ता / अर्थसहाय्य देणे'
  13. 'दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे'
  14. '60 वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे'
  15. 'दिव्यांग व्यक्तींच्या बचतगटांना अर्थसहाय्य देणे'
  16. 'कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे'


'निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे (गतिमंद, आत्ममग्नता, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांचेकरिता)' या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडे किमान 40 % दिव्यांग असल्याबाबतचा दाखला असणे आवश्यक आहे.


सदर योजनांचे अर्ज ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
-----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मुंबई महानगरपालिकेचा दिलासा! दिव्यांगांना मिळणार दरमहा 1000 ते 3000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य,असा करा अर्ज



मुंबई महानगरपालिकेचा दिलासा! दिव्यांगांना मिळणार दरमहा 1000 ते 3000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य,असा करा अर्ज

दिव्यांगांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 


'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजना
असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. सन 2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजने अंतर्गत दरमहा 1000 ते 3000 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा मिळवावा.

यांना मिळणार लाभ

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असला पाहिजे. तसेच तो दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत वय वर्ष 18 वरील 40 टक्के दिव्यंग असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये वितरित करण्यात येईल. 


म्ह
णजेच वार्षिक 12 हजार रुपये मिळतील. तर 80 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्यांना दरमहा 3000 हजार रुपये प्रमाणे दर सहा महिन्यानंतर एकत्रित 18 हजार रुपये मदत केली जाईल. म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये मिळतील. पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे.

 लाभार्थी पात्रता निकष -

  • बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा.
  • अर्जदार पिवळे व निळे वैश्विक ओळखपत्रधारक (UDID Card) असावा.
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
  • अर्जदार हा केशरी / पिवळे शिधापत्रिकाधारक असावा.
  • दिव्यांग व्यक्तींचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रम | खाजगी आस्थापनेवर नोकरीत अथवा उदयोग करत नसल्याचे स्वयं घोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • सदर योजनेचा लाभ घेणा-या अर्जदाराने हयात असल्याबाबतचा दाखला संचालक (नियोजन) विभागातील समाज विकास अधिकारी यांचेकडून खातरजमा करुन हयातीचे दाखले प्रत्येक अर्जासोबत संचालक (नियोजन) विभागाकडे सादर करणे बंधनकारक राहील.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे -

  1. आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र
  2. वैश्विक ओळखपत्र Unique Disability ID (UDID) प्रत
  3. अर्जदार हा केशरी / पिवळे शिधापत्रिकाधारक असावा.
  4. बँक खात्याचा तपशील दर्शविणारी बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची प्रत किंवा रद्द धनादेश
  5. प्रतिज्ञापत्र (स्वंयघोषणापत्रक)
या योजनेअंतर्गत लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी 45 दिवसांच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिका, संचालक (नियोजन) विभागाकडे मयत दाखला किंवा मृत्यू वार्तापत्र जोडून योजनेच्या लाभ बंद करणेसाठी अर्ज सादर करावा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याचे दिव्यांग स्टॉल धारक (HPCO) असल्यास दिव्यांग अनुज्ञापनधारक व्यक्तींस सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.



अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राहिल.

या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही.
सर्व कागदपत्रांसहित अर्ज भरा. अर्ज पूर्ण भरा आणि अर्ज संबंधित विभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करा.

अर्ज करण्याची वेळ - सकाळी्10.00 ते संध्याकाळी 04.00

अर्ज करण्यासाठीच ठिकाण -  बृहन‍मबई्‍ महानगरपालिका् A ते T विभाग्

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी

जाहिरात

सन 2024-25 या आर्थिक वर्षात दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्याच्या अर्जाकरिता लाभार्थ्याची पात्रता / निकष.
------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

सोमवार, २२ जुलै, २०२४

Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला



Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला

जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी या महत्त्वाच्या माहितीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. ग्रॅच्युइटीबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेल्या कामाबद्दल कंपनीकडून दिले जाणारे बक्षीस.

ग्रॅच्युटीच्या स्वरुपात दिली जाणारी ही रक्कम कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदत देऊ करते. पण, सरसकट प्रत्येक कर्मचारी ग्रॅच्युटीसाठी पात्र असतोच असं नाही. मग ही ग्रॅच्युटी मिळते तरी कोणाला? जाणून घ्या... 


Gratuity Payment Act 1972 नुसार 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारीसंख्या असणाऱ्या कंपनीमध्ये 5 वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवेसाठी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली जाते. यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुकाने, कारखाने यांचाही त्याच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची कंपनी ग्रॅच्युइटी अॅक्टअंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही हे तपासून पाहावे.

कारण जर तुमची कंपनी रजिस्टर्ड असेल तर त्याला तुम्हाला नियमानुसार ग्रॅच्युइटी द्यावी लागेल, पण जर कंपनी रजिस्टर्ड नसेल तर ग्रॅच्युइटी द्यायची की नाही हे कंपनीच्या इच्छेवर अवलंबून असते.

ग्रॅच्युइटी मिळणारी रक्कम

ग्रॅच्युइटी (अंतिम वेतन) x (कंपनीत किती वर्षे काम केले) x (15/26) मोजण्याचा नियम आहे. महिन्यातील रविवारचे चार दिवस आठवड्याची सुट्टी म्हणून गणले जात नाहीत, त्यामुळे एका महिन्यात केवळ 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.


उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने कंपनीसाठी 20 वर्षे काम केले असेल आणि त्याचा शेवटचा पगार सुमारे 25,000 रुपये असेल तर आम्ही त्याची ग्रॅच्युइटी रक्कम शोधण्यासाठी हा फॉर्म्युला लागू करू. या सूत्रानुसार व्यक्तीच्या ग्रॅच्युइटीची रक्कम 20x25000x15/26 = 2,88,461.54 रुपये असेल.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, २० जुलै, २०२४

कर्ज परतफेड करू न शकल्यास काळजी करू नका !! काय आहे तुमचा अधिकार

 


कर्ज परतफेड करू न शकल्यास काळजी करू नका !! काय आहे तुमचा अधिकार

बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन आपल्या गरजा पूर्ण करणे सहज झाले आहे. पण कर्ज घेणे आजच्या काळात जितके सोपे झाले आहे तेवढेच कर्जाची परतफेड करणे कठीण आहे.

बहुतेक वेळा कर्जाचा हप्ता चुकला तर बँक कर्जदाराला डिफॉल्ट घोषित करतात ज्यामुळे कर्जदाराला केवळ मानसिक त्रासच होत नाही तर आर्थिक स्थिरतेलाही नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत, तुमचा ईएमआय देखील चुकला असेल किंवा कर्जाची परतफेड करण्याची तुमची स्थिती नसेल तर तुम्ही कर्ज देणाऱ्या बँक किंवा संस्थेशी बोलून तात्पुरता दिलासा मागावा.


लक्षात घ्या की कर्जाचा एखादा हप्ता चुकला तर त्याला नियमांचे उल्लंघन मानले जाते पण कायदेशीर गुन्हा नाही. अशा प्रकरणांमध्ये बँका आणि वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या काही मानकांचे पालन करून कर्जदाराशी जबाबदारीने वागण्याचे निर्देश दिले आहेत.

वरील प्रकरणांमध्ये तुमच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था डिफॉल्ट नोटीस जारी करेल. कारवाई सुरू करण्याच्या दोन महिन्यांपूर्वी ही नोटीस जारी केली जाईल तर काही प्रकरणांमध्ये पूर्वीही जारी केली जाऊ शकते. या नोटीसमध्ये कर्जाची थकबाकी, चुकलेल्या ईएमआयचा तपशील आणि कर्जाची परतफेड न केल्यामुळे होणाऱ्या परिणामाचा ठळकपणे उल्लेख केलेला असेल.


कर्जदारांना योग्य वागणूक

आरबीआयच्या मार्गदर्शक नियमानुसार, कर्जदाराने बँकेचा हप्ता चुकवला तरी त्याच्यासोबत योग्य वागणूक करण्यास बँका आणि वित्तीय संस्था बांधील आहेत. एवढेच नव्हे तर कर्जदार कायदेशीर नोटीसला आव्हानही देऊ शकतो पण नोटीस जारी केल्यापासून एक महिन्याच्या आत आव्हान करणे अनिवार्य असते. 

लक्षात घ्या की बँक तुमच्याशी अनादर शब्दात बोलू शकत नाही तसेच कर्जदारावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर न्यायालय अनेकदा शिक्षा किंवा दंडाऐवजी कर्जाच्या वसुलीवर भर देते त्यामुळे तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर तुम्हाला कर्जदार म्हणून तुमच्या अधिकारांची जाण असली पाहिजे.

रिकवरी एजंटअशा गोष्टी करू शकत नाही

1) कर्ज वसुलीसाठी रिकवरी एजंट वारंवार फोनवर धमकी देत असेल, शिवीगाळ करत असेल किंवा नको ते मेसेज पाठवत असेल किंवा नको ते शब्द बोलताना वापरत असेल तर ही कृती छळ मानली जाते.

2) एजंट तुमच्या ऑफिस पर्यंत किंवा तुमच्या बॉस पर्यंत जात असेल 

3) तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा तुमच्या सोबत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्रास देत असेल 

4) तसेच काही कायदेशीर कारवाईची व अटकेची धमकी देत असेल 

5) घरी किंवा ऑफिसमध्ये येऊन इतरांसमोर धमकी देत असेल किंवा अपमान करत असेल 

6) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत असेल

7) तुमचा पाठलाग करत असेल किंवा इतरांची मदत घेऊन तुम्हाला त्रास देत असेल


रिकव्हरी एजंटकरिता रिझर्व बँकेचे काय आहेत निर्देश?

1) सर्वात आधी बँकांनी रिकवरी एजंटची नेमणूक करताना त्याची योग्य तपासणी म्हणजेच व्हेरिफिकेशन करून नंतर नेमणूक करावी.

2) तसेच बँकांनी रिकवरी एजंट आणि तो कोणत्या एजन्सीचा आहे त्याबद्दलची माहिती ग्राहकांना द्यावी.

3) बँकेने रिकवरी एजंटला दिलेली नोटीस आणि ऑथरायझेशन लेटरमध्ये संबंधित रिकव्हरी एजंटचे नंबर असले पाहिजेत आणि ग्राहकांशी कॉल वर जे बोलण होते ते रेकॉर्ड केलं पाहिजे.

4) ग्राहकांची जर रिकवरी प्रक्रियेबद्दल तक्रार असेल तर ती सोडवण्यासाठी बँकेने व्यासपीठ निर्माण करून द्यावी व ते असणे गरजेचे आहे.

5) जेव्हा रीकव्हरी एजंट ग्राहकांना भेटेल तेव्हा त्याने त्याचे ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे. समजा रिकवरी एजंटने आयडी कार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवले नाही तर ग्राहक त्याबाबत तक्रार करू शकतात.

6) गैरवर्तन करू शकत नाही किंवा तुमचा कोणासमोर अपमान देखील करू शकत नाही. धमकी किंवा शिवीगाळ करणे तर


रिकवरी एजंट त्रासदेत असेल तर तुमचे काय आहेत अधिकार?

1) रिकवरी एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार नोंदवू शकतात. पोलिसांनी तुमची तक्रार दाखल करून घेतली नाही तर तुम्ही थेट मॅजेस्ट्रेटकडे देखील जाऊ शकतात.

2) अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला पोलिसांकडून मदत मिळाली नाही तर तुम्ही सिविल कोर्टात जाऊ शकतात. त्यामध्ये कोर्ट रिकवरी एजंटला थांबवू शकते किंवा दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर उपाय सुचवू शकते.

3) याबाबतची तक्रार तुम्ही रिझर्व बँकेत देखील करू शकतात व बँक अशा रिकवरी एजंटवर बंदी घालू शकते.

4) एजंट कडून तुमच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होत असेल तर तशी तक्रार तुम्ही बँकेकडे करू शकता किंवा तुम्ही मानहानीचा खटला देखील दाखल करू शकता.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

Microsoft Server Down : ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय?; जगभरातील यंत्रणा झाल्यात ठप्प, जाणून घ्या, कारण

 


Microsoft Server Down : ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय?; जगभरातील यंत्रणा झाल्यात ठप्प, जाणून घ्या, कारण

जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडो युजर आज ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) चा सामना करत आहेत. यामुळे लाखो लोकांचे लॅपटॉप किंवा पीसी आपोआप शटडाऊन होत आहेत किंवा रीस्टार्ट होत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विमानसेवा, प्रसारमाध्यमे आणि शेअर बाजारही यामुळे प्रभावित होत आहेत.

शुक्रवारी सकाळपासून या एररमुळे विंडोज युजर्सचं काम ठप्प झालं आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की ही ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय? त्याबाबत जाणून घेऊया...


ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय?

ब्लू स्क्रीन ऑफ डेथला ब्लॅक स्क्रीन एरर असंही म्हणतात. यामध्ये अशी परिस्थिती उद्भवते की विंडोज हे जबरदस्तीने शटडाऊन होतात किंवा काही कारणास्तव रीस्टार्ट होतात. या समस्येदरम्यान, युजर्सना लॅपटॉप किंवा पीसीवर मेसेज देखील मिळतात. तुमच्या कॉम्प्युटरला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी विंडोज बंद करण्यात आल्याचं त्यामध्ये लिहिलं आहे. ही समस्या काही हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरमुळे उद्भवली आहे, परंतु शुक्रवारी समोर आलेली समस्या ही विंडोजची अंतर्गत समस्या असल्याचं दिसतं. मात्र, यासाठी इतरही अनेक कारणं दिली जात आहेत.

ब्लू स्क्रीन ऑफ डेथच्या समस्येची कारणं काय?

हार्डवेअर फेलियर ते सॉफ्टवेअर समस्येमुळे ब्लू स्क्रीन ऑफ डेथचा सामना केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, RAM, हार्ड ड्राइव्ह, ग्राफिक्स कार्ड किंवा पॉवर सप्लाय युनिटमुळे ब्लू स्क्रीन ऑफ डेथची समस्या उद्भवू शकते. त्याच वेळी, सॉफ्टवेअरमध्ये एप्लिकेशन्स, गेम किंवा ड्रायव्हर्स समाविष्ट आहेत, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. ब्लू स्क्रीन ऑफ डेथमुळे सिस्टम क्रॅश होऊ शकते.


कसा दूर करायचा प्रोब्लेम?

अशा परिस्थितीत अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. हे ठीक करण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. तथापि, ही समस्या बऱ्याच प्रणालींमध्ये आली आणि रीस्टार्ट केल्यानंतर ते ठीक झालं आणि अधिक चांगले कार्य करत आहेत. अशा परिस्थितीत, रीस्टार्ट करण्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीशी छेडछाड करू नका. CrowdStrike या समस्येवर काम करत आहे आणि लवकरच अपडेट जारी करेल.

--------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp



गुरुवार, १८ जुलै, २०२४

ग्राहकांनो, दुकानदार MRP पेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तक्रार कुठे करावी? जाणून घ्या

 


ग्राहकांनो, दुकानदार MRP पेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तक्रार कुठे करावी? जाणून घ्या

तुमच्या बाजारपेठेत कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा त्याची एमआरपी पाहता. अनेकदा डिस्काउंट मिळाला तर किंमत आणखी कमी होती पण आपण कधीही MRP पेक्षा जास्त पैसे देत नाही. पण एमआरपी कोणत्याही गोष्टीची कमाल किरकोळ किंमत म्हणजे मॅक्सिम रिटेल प्राइस असते.


कमाल किरकोळ किंमत सामान्यत: उत्पादन लेबल किंवा पॅकेजिंगवर छापली जाते आणि त्यात सर्व कर समाविष्ट असतात. उत्पादन खर्च, विपणन खर्च आणि नफ्याचे मार्जिन लक्षात घेऊन एमआरपी निर्माता किंवा विक्रेत्याद्वारे निर्धारित केली जाते. 

ग्राहकांचे हक्क,जबाबदाऱ्या आणि कर्तव्य।अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/04/blog-post_96.html

कमाल किरकोळ किंमत (MRP) म्हणजे किरकोळ विक्रेता कोणत्याही उत्पादन किंवा सेवेसाठी अंतिम ग्राहकाकडून कायदेशीररित्या आकारू शकणारी सर्वोच्च रक्कम दर्शवते. अनेकवेळा दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू विकत असल्याच्या तक्रारी येतात. आणि जर कोणी तुमच्याशी असेच वागले तर तुम्ही अशा दुकानदारांची तक्रार करू शकता. तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या

MRP पेक्षा जास्त शुल्क घेणे कायदेशीर नाही.

भारतात,2009 चा लिगल मेट्रोलॉजी अॅक्ट (Legal Metrology Act of 2009 )पॅकेज केलेल्या वस्तूंच्या विक्रीवर नियंत्रण ठेवतो, उत्पादनाच्या लेबलवर किंवा पॅकेजिंगवर एमआरपीचे स्पष्टपण दिसणे अनिवार्य आहे. नमूद MRP पेक्षा जास्त उत्पादने विकणे कायद्याने प्रतिबंधित आहे, गुन्हेगारांना दंड आणि इतर दंड लागू होतात.


उत्पादनाची एमआरपी काय आहे?

MRP मध्ये सर्व कर समाविष्ट असतात आणि त्यात उत्पादन, वाहतूक आणि उत्पादक किंवा विक्रेत्याने केलेले कोणतेही अतिरिक्त खर्च समाविष्ट असतात.

किरकोळ विक्रेत्यांना ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकार MRP नियंत्रित करते, या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा कायदेशीर कारवाई केली जाते.

सामान्यतः, पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांना माहितीपूर्ण खरेदी निवड करण्यात मदत करण्यासाठी उत्पादनाच्या पॅकेजिंगवर MRP छापली जाते.

दुकानदाराने MRP पेक्षा जास्त पैसे घेतल्यास काय करावे?

भारतात कोणत्याही दुकानदाराने MRP पेक्षा जास्त दराने वस्तू विकत असेल तो गुन्हा आहे. मात्र अनेक ग्राहक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष करू नये. भारतातील ग्राहकांच्या हक्कांसाठी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचीही निर्मिती करण्यात आली आहे. जर एखादा दुकानदार तुमच्याकडून एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक मंचात तक्रार करू शकता.

दुकानदाराने MRP पेक्षा जास्त असल्यास, ग्राहकांना दुकान चालवणाऱ्या संबंधित राज्यातील लिगल मेट्रोलॉजी विभागाकडे तक्रार करण्याचा पर्याय आहे.

दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त विक्री करत असल्यास तक्रार कुठे करायची?

ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 1800-11-4000/1915 वर संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधित जिल्ह्यांतील ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करू शकतात.


8800001915 वर एसएमएस करता येईल. NCH APP आणि Umang App द्वारे देखील तक्रारी मांडता येतील.

तक्रार कशी करायची?

दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेत असल्याबद्दल तक्रार करण्यासाठी, ग्राहक विभागाकडे ऑनलाइन तक्रार करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला Consumerhelpline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला प्रथम येथे साइन अप करावे लागेल. आणि नंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी/नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागेल.


त्यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकाल. तक्रार दाखल करण्यासाठी तुम्ही उत्पादनाची संपूर्ण माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबत दुकानदाराची माहिती द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये त्याच्या दुकानाचे नाव आणि पत्ता देखील असेल. त्याला त्यासोबत संबंधित कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहेत. तुमची तक्रार खरी आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाईल.


संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रत्येक प्रयत्न केला जातो. तरीही, जर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण झाले नाही, तर ते योग्य ग्राहक आयोगामार्फत मदत घेण्याचा पर्याय राखून ठेवतात

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदाराला दंड आणि शिक्षा होऊ शकते आणि ग्राहकाला जास्त आकारलेल्या रकमेसाठी भरपाई मिळण्याचा अधिकार असू शकतो. म्हणून, ग्राहकांना सल्ला दिला जातो की, खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची एमआरपी तपासावी आणि जास्त शुल्क आकारल्याच्या कोणत्याही घटनांची तक्रार करावी.

--------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...