हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३१ जुलै, २०२४

वेळेत करा कर्जाची परतफेड, नाहीतर आरबीआय करणार मोठी कारवाई, कुणावर करणार कारवाई जाणून घ्या.

 


वेळेत करा कर्जाची परतफेड, नाहीतर आरबीआय करणार मोठी कारवाई, कुणावर करणार कारवाई जाणून घ्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच विलफुल डिफॉल्टर्स आणि मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFCs) 25 लाख आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व नॉन-परफॉर्मिंग ॲसेट खात्यांमधील विलफुल डिफॉल्टरची चौकशी करावी लागणार आहे.


तपासात जर कोणी विलफुल डिफॉल्टर आढळले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आरबीआयने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आरबीआयने अनेक वेळा विलफुल डिफॉल्टर्सबाबत विधाने जारी केली आहेत आणि बँकांना सूचनाही दिल्या आहेत, यावेळी आरबीआयने डिफॉल्टर्सवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

विलफुल डिफॉल्टर कोण आहे?

विलफुल डिफॉल्टरचे पुरावे ओळख समितीद्वारे तपासले जाणार असून 'विलफुल डिफॉल्टर्स' म्हणजे कर्जदार किंवा जामीनदार ज्याने जाणूनबुजून कर्जाची परतफेड केली नाही आणि त्याची थकबाकी 25 लाखांपेक्षा जास्त असते.

कर्ज परतफेड करू न शकल्यास काळजी करू नका !! काय आहे तुमचा अधिकार

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/07/blog-post_20.html

विलफुल डिफॉल्टर आढळल्यास

आरबीआयने असे म्हटले आहे की, "बँका 25 लाख आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व एनपीए खात्यांमध्ये 'विलफुल डिफॉल्टर्स'ची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.

बँकांनी स्पष्ट निकष असणारे धोरण तयार केले पाहिजे ज्याच्या आधारावर विलफुल डिफॉल्टर घोषित केलेल्या व्यक्तीची छायाचित्रे छापण्यात येतील. यामध्ये असे म्हटले आहे की, कोणतीही बँक एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या संस्थेला कर्ज देणार नाही, ज्याने विलफुल डिफॉल्टर केले आहे. त्याला विलफुल डिफॉल्टरच्या यादीतून काढून टाकल्यानंतर एक वर्षासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp


सोमवार, २९ जुलै, २०२४

आयुष्य संपवण्याच्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त कसं व्हाल? या 9 पॉइंटमधून घ्या समजून

 


आयुष्य संपवण्याच्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त कसं व्हाल? या 9 पॉइंटमधून घ्या समजून

सद्या आत्महत्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . मागील एका महिन्यात तीन आत्महत्याच्या घटनाने मनाला हेलावून टाकलं आहे. नुकताच अटल सेतुवर एका इंजिनिअरने समुद्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं तर दुसरीकडे चंद्रपुर मध्ये MBBS ची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणीने नदीत जाऊन आत्महत्या केली.

इतकच काय तर,भायंदरच्या रेल्वे रुळावर पिता पुत्राने आत्महत्या केली होती. आत्महत्याचं प्रमाण का वाढत चाललं आहे ? आत्महत्या करण्याची भावना मनात का येऊ लागली आहे ?


आपलं जीवन हे अनमोल आहे, आत्महत्या करणं हे एकमेव मार्ग नाही असं असतांना पण तरुणांमध्ये आत्महत्या करण्याची भावना का निर्माण होते ? आत्महत्या करण्यामागची अनेक कारणं आहेत, कौटुंबिक वादविवाद, नैराश्य , नकारात्मक विचार, अपयश, प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची आतापर्यंतची कारणं समोर आली आहे.

  • मुळात कोणत्याही समस्यातून मार्ग काढणं म्हणजे आत्महत्या नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे.
  • मनात आत्महत्याची भावना येत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मन मोकळं करा, आत्महत्याची भावना (Emotion)का निर्माण होते ? यावर आपल्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला.
  • नकारात्मक विचार मनात आणू नका, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली किंवा मनाविरुद्ध झाली की आपण निराश होतो. कधी कधी नकारात्मक विचाराचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो आणि त्यातूनच नैराश्यपणा येतो.
  • लक्षात घ्या यश (success)अपयश हे चढउतार आपल्या वाटेला येतच असतात म्हणून संयम राखा, आज ना उद्या गोष्टी सुरळीत होतील म्हणून मनात नकारात्मक विचार आणू नका.
  • अनुकूल परिस्थितीचा सामना करायला शिका, परिस्थिती हालाखीची असल्यास आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींशी बोला, त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
  • प्रेमसंबंधातून मनात नकारात्मक विचार येत असतील तर, काही दिवस बाहेर फिरून या. मनात सकारात्मक विचार आणा याकरता आपल्याला हवी ती गोष्ट करा, गाणं ऐका, एखादं पुस्तक वाचा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा, त्यांच्यासोबत फिरायला जावा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या.
  • डिप्रेशन मध्ये सतत राहिल्याने आपल्या मनात आत्महत्याची भावना येऊ शकते अशा वेळी समुपदेशनचा योग्य सल्ला घेऊ शकता.
  • लक्षात ठेवा आपलं जीवन हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अमूल्य आहे, काही गोष्ट विपरीत घडल्यास आपलं जीवन व्यर्थ आहे अशी भावना मनात आणू नका.
  • नेहमी आनंदित राहायला शिका. आहे त्या गोष्टींत समाधानी रहा. बिकट परिस्थितीत तडकेफाड निर्णय घेऊ नका.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २८ जुलै, २०२४

रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी

 


रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांना रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. उपलब्ध पदांचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक प्रशिक्षणार्थी संख्या अशी आहे - 

  1. विस्तार अधिकारी (सां), विज्ञान/कृषी/वाणिज्य/अर्थशास्त्र किंवा गणित विषयासह पदवीधर-1, 
  2. वरिष्ठ सहाय्य्क (लिपीक) कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT - 2, 
  3. वरिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT -2, 
  4. कनिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी टंकलेखक-30, इंग्रजी टंकलेखन-40 MS-CIT - 12, 
  5. वाहनचालक बारावी किंवा पदवीधर, जड वाहन चालविण्याचा परवाना- 2, 
  6. वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदवीधर, लेखाशास्त्र, वाणिज्यशास्त्र, वाणिज्य शाखा, MS-CIT -1, 
  7. कनिष्ठ सहाय्यक (लेखा) बारावी किंवा पदवीधर, मराठी टंकलेखन 30 MS-CIT-1, 
  8. ग्रामसेवक बारावी परीक्षा 60 टक्क्यांनी उत्तीर्ण, 
  9. कृषी पदवीका/पदवीधर, अभियांत्रिका पदविका, बीएसडब्लू, MS-CIT -32
  10. विस्तार अधिकारी (कृषी) कृषी विषयातील पदवीधर -1
  11. पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी/पदविका, MS-CIT -3, 
  12. पर्यवेक्षका पदवीधर(समाजशास्त्र/गृहविज्ञान) एमएसडब्लू -2
  13. मिश्रक/औषध निर्माण अधिकारी औषध निर्माणशास्त्रातील पदवी/पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार-3
  14. आरोग्य सेवक (पुरुष) बारावी/पदवी (दहावी विज्ञान विषयासह उत्तीर्ण)-10 
  15. आरोग्य सेविका (महिला) ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचारिका परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचारिका परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील - 24
  16. कनिष्ठ अभियंता (बांधकाम) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयासह पदवी/पदविका-3
  17. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी/पदविका/पदव्युत्तर पदवी -1
  18. प्राथमिक शिक्षक बारावी उत्तीर्ण, डीएड व टीएटी परीक्षा उत्तीर्ण - 370
  19. परिचर बारावी पास -27, 
  20. स्त्री परिचर बारावी पास -3
  21. सफाई कामगार -बारावी पास -3
  22. चौकीदार - बारावी पास -1


इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट MIDC, रत्नागिरी. (संपर्क क्र. 02352-299385) यांच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.

---------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, २७ जुलै, २०२४

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे

 


बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे

शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत मजूर बांधकाम कामगार म्हणून काम करतात. बांधकाम करत असतांना त्यांना एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर स्थलांतर करावे लागते.

अशावेळी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे भांडी अशा मजुरांना त्या ठिकाणी खरेदी करावी लागतात. परंतु तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता शासनाकडून मोफत भांडी मिळणार आहे.

2024-25 बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ?

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/07/2021.html

बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


तुम्हाला जर हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करू शकता.

भांडी जीआर डाउनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1y6IlkKvWmoBpcCzqcT4aF4fzA2x-y75o/view?usp=drivesdk

वरील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि बघा जीआर मध्ये कोणकोणती भांडी बांधकाम कामगारांना मिळणार आहेत तर भांडी तुम्हाला मिळाली आहेत का याची खात्री करून घ्या.

अर्ज डाऊनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1LA5cjgCl6n1reO5dwkGsYFxz0NvzqpYw/view?usp=drivesdk

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अर्जासोबत ही कागदपत्र जोडावी लागणार आहे

  • पासपोर्ट फोटो.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • राशन कार्ड झेरॉक्स.
  • लेबर कार्ड झेरॉक्स.
  • 1 रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
  • आधार कार्डची झेरॉक्स

----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, २५ जुलै, २०२४

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर

 

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहिर झाल्या आहे. या योजनेसाठी प्रभागसमितीनिहाय अर्जाचे वितरण सुरू असून 23 ऑगस्ट 2024 पर्यत अर्ज वितरीत केले जाणार आहेत.


तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येतील. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती, मुले, महिला यांनी घ्यावा 

  1. दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनांमध्ये 
  2. 'दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती',
  3. 'दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती'
  4. दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  5. 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  6. 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  7. 'दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती'
  8. 'दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे'
  9. 'दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे'
  10. 'दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करणेकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे', 
  11. 'दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करुन देणे'
  12. 'दिव्यांग बेरोजगारांना भत्ता / अर्थसहाय्य देणे'
  13. 'दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे'
  14. '60 वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे'
  15. 'दिव्यांग व्यक्तींच्या बचतगटांना अर्थसहाय्य देणे'
  16. 'कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे'


'निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे (गतिमंद, आत्ममग्नता, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांचेकरिता)' या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडे किमान 40 % दिव्यांग असल्याबाबतचा दाखला असणे आवश्यक आहे.


सदर योजनांचे अर्ज ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
-----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मुंबई महानगरपालिकेचा दिलासा! दिव्यांगांना मिळणार दरमहा 1000 ते 3000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य,असा करा अर्ज



मुंबई महानगरपालिकेचा दिलासा! दिव्यांगांना मिळणार दरमहा 1000 ते 3000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य,असा करा अर्ज

दिव्यांगांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 


'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजना
असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. सन 2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजने अंतर्गत दरमहा 1000 ते 3000 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा मिळवावा.

यांना मिळणार लाभ

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असला पाहिजे. तसेच तो दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत वय वर्ष 18 वरील 40 टक्के दिव्यंग असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये वितरित करण्यात येईल. 


म्ह
णजेच वार्षिक 12 हजार रुपये मिळतील. तर 80 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्यांना दरमहा 3000 हजार रुपये प्रमाणे दर सहा महिन्यानंतर एकत्रित 18 हजार रुपये मदत केली जाईल. म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये मिळतील. पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे.

 लाभार्थी पात्रता निकष -

  • बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा.
  • अर्जदार पिवळे व निळे वैश्विक ओळखपत्रधारक (UDID Card) असावा.
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
  • अर्जदार हा केशरी / पिवळे शिधापत्रिकाधारक असावा.
  • दिव्यांग व्यक्तींचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रम | खाजगी आस्थापनेवर नोकरीत अथवा उदयोग करत नसल्याचे स्वयं घोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • सदर योजनेचा लाभ घेणा-या अर्जदाराने हयात असल्याबाबतचा दाखला संचालक (नियोजन) विभागातील समाज विकास अधिकारी यांचेकडून खातरजमा करुन हयातीचे दाखले प्रत्येक अर्जासोबत संचालक (नियोजन) विभागाकडे सादर करणे बंधनकारक राहील.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे -

  1. आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र
  2. वैश्विक ओळखपत्र Unique Disability ID (UDID) प्रत
  3. अर्जदार हा केशरी / पिवळे शिधापत्रिकाधारक असावा.
  4. बँक खात्याचा तपशील दर्शविणारी बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची प्रत किंवा रद्द धनादेश
  5. प्रतिज्ञापत्र (स्वंयघोषणापत्रक)
या योजनेअंतर्गत लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी 45 दिवसांच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिका, संचालक (नियोजन) विभागाकडे मयत दाखला किंवा मृत्यू वार्तापत्र जोडून योजनेच्या लाभ बंद करणेसाठी अर्ज सादर करावा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याचे दिव्यांग स्टॉल धारक (HPCO) असल्यास दिव्यांग अनुज्ञापनधारक व्यक्तींस सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.



अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राहिल.

या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही.
सर्व कागदपत्रांसहित अर्ज भरा. अर्ज पूर्ण भरा आणि अर्ज संबंधित विभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करा.

अर्ज करण्याची वेळ - सकाळी्10.00 ते संध्याकाळी 04.00

अर्ज करण्यासाठीच ठिकाण -  बृहन‍मबई्‍ महानगरपालिका् A ते T विभाग्

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी

जाहिरात

सन 2024-25 या आर्थिक वर्षात दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्याच्या अर्जाकरिता लाभार्थ्याची पात्रता / निकष.
------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

सोमवार, २२ जुलै, २०२४

Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला



Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला

जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी या महत्त्वाच्या माहितीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. ग्रॅच्युइटीबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेल्या कामाबद्दल कंपनीकडून दिले जाणारे बक्षीस.

ग्रॅच्युटीच्या स्वरुपात दिली जाणारी ही रक्कम कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदत देऊ करते. पण, सरसकट प्रत्येक कर्मचारी ग्रॅच्युटीसाठी पात्र असतोच असं नाही. मग ही ग्रॅच्युटी मिळते तरी कोणाला? जाणून घ्या... 


Gratuity Payment Act 1972 नुसार 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारीसंख्या असणाऱ्या कंपनीमध्ये 5 वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवेसाठी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली जाते. यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुकाने, कारखाने यांचाही त्याच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची कंपनी ग्रॅच्युइटी अॅक्टअंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही हे तपासून पाहावे.

कारण जर तुमची कंपनी रजिस्टर्ड असेल तर त्याला तुम्हाला नियमानुसार ग्रॅच्युइटी द्यावी लागेल, पण जर कंपनी रजिस्टर्ड नसेल तर ग्रॅच्युइटी द्यायची की नाही हे कंपनीच्या इच्छेवर अवलंबून असते.

ग्रॅच्युइटी मिळणारी रक्कम

ग्रॅच्युइटी (अंतिम वेतन) x (कंपनीत किती वर्षे काम केले) x (15/26) मोजण्याचा नियम आहे. महिन्यातील रविवारचे चार दिवस आठवड्याची सुट्टी म्हणून गणले जात नाहीत, त्यामुळे एका महिन्यात केवळ 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.


उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने कंपनीसाठी 20 वर्षे काम केले असेल आणि त्याचा शेवटचा पगार सुमारे 25,000 रुपये असेल तर आम्ही त्याची ग्रॅच्युइटी रक्कम शोधण्यासाठी हा फॉर्म्युला लागू करू. या सूत्रानुसार व्यक्तीच्या ग्रॅच्युइटीची रक्कम 20x25000x15/26 = 2,88,461.54 रुपये असेल.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...