हा ब्लॉग शोधा

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस? तुम्हाला माहितीये याचा इतिहास?

 ( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस? तुम्हाला माहितीये याचा इतिहास?

भारतीय घटनेत नमूद केलेले कायदे, हक्क आणि अधिकार आणि तत्त्वांचं पालन भारतीय नागरिक करतात ती राज्यघटना सर्व प्रथम 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं स्वीकारली. हा दिवस साजरा करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय राज्यघटना दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो.

या घटनेत मूलभूत राजकीय संहिता, रचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्य, मूलभूत हक्क आणि नागरिकांची कर्तव्यं नमूद केलेली आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी शपथ घेण्यासाठी सरकार आणि नागरिकांसाठी भारतीय राज्यघटना हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.पृथ्वीवरील लिखित स्वरूपातील सर्वांत मोठी राज्यघटना असा या घटनेचा गौरव केला जातो. भारतीय राज्य घटनेला एक सुंदर कलाकृतीच समजलं जातं आणि ही कलाकृती घडवणाऱ्या संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात.


26 नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली त्यामुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मात्र 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संसदेने संविधानाचा स्वीकार केला त्यामुळे तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. हे संविधान लागू झाल्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1935 हा कायदा संपुष्टात आला. भारतीय संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर साजरा करण्याचा निर्णय सन 2015 मध्ये अंमलात आणला गेला. केंद्र सरकारने नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यानुसार सामाजिक न्याय मंत्रालयाने आदेश काढला होता.


भारतीय संविधानाने निश्चित केलेल्या यंत्रणा आणि प्रशासनाची पद्धत यावर भारतीय नागरिकांचा असलेला विश्वास हा दिवस साजरा केल्याने दृढ होतो. राज्यघटनेत नमूद केलेल्या देशाच्या लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांची आठवण हा दिवस आपल्याला करून देतो.

जगातील आदर्श ''भारतीय संविधान''

ज्यघटना हा देशाचा मूलभूत पाया आहे. राज्यघटनेद्वारे सरकारचे अधिकार, मर्यादा आणि नागरिकांचे हक्क, कर्तव्ये यांची स्पष्टता मांडलेली आहे. राज्यघटना एक अत्यावश्यक दस्ताऐवज आहे, जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करतो.त्याद्वारे जुलूम आणि सत्तेच्या गैरवापरापासून संरक्षक म्हणून काम करतो.

अनेक जाती, भाषा, धर्म, पंथ, रीतीरीवाज, ठराविक अंतरावर बदलणारी भौगोलिक परिस्थिती इतक्या सगळ्या हजारो वेगवेगळ्या घटकांना संविधानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न घटनाकारांनी केला आहे.


संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.

1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची सभेचे स्थायी अध्यक्ष आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.मसुदा तयार करण्यासाठी 13 समित्यांची स्थापना केली. संविधान निर्मितीमध्ये 389 सदस्य होते. काही कारणांमुळे त्यातील काही जण बाहेर पडले. त्यामुळे संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 299 राहिली.

जवळपास तीन वर्षे संविधान निर्मितीचे काम चालले. अनेक सदस्य आरोग्य समस्यांमुळे आणि देशातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असल्याने प्रवास करताना येणाऱ्या अडचणींमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मसुदा बनवण्याची जबाबदारी मुख्यत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पार पाडावी लागली.

घटनादुरुती

भारताची घटना दृढता आणि लवचिकतेचे मिश्रण आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये घटनादुरुस्तीबद्दल तरतुदी देण्यात आल्या आहे. यात प्रामुख्याने दोन प्रकारे घटनादुरुस्ती करता येईल, हे विशद केलेले आहे.घटनेच्या काही भागांत विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करता येऊ शकते. इतर भागांत घटनादुरुस्ती करण्यासाठी विशेष बहुमतासह अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांच्या मंजुरीची गरज असते.

संविधान हे केवळ एक कायद्याचे पुस्तक आहे का?

आम्ही भारताचे लोक... ही ओळ वाचली की, आपल्याला आठवते ती भारतीय संविधानातील उद्देशिका. आपल्या संविधानाची निर्मिती ही भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटना समितीने म्हणजेच आम्ही भारतीयांनी तयार केली आहे.

आपल्या संविधानाने आपल्याला मुख्यतः दोन प्रकारचे हक्क दिले आहेत. एक कायदेशीर हक्क आणि दुसरे मूलभूत हक्क. संविधानाने आपल्याला ज्या मूलभूत हक्कांची हमी दिली आहे तीच मुळात नागरिकांना आपले आयुष्य एक मनुष्यप्राणी म्हणून अर्थपूर्ण जगता यावे, प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार स्व-विकास साधता यावा, सुसंस्कृत जीवन जगता यावे म्हणून. मूलभूत हक्क व्यक्तीच्या, विचार, उच्चार, हिंडण्या-फिरण्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करते. आपल्याला शिक्षण, कौशल्ये आणि रोजगाराची समान संधी मिळते ती मूलभूत हक्कांमुळे. अभिव्यक्ती-धार्मिक-शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यामुळे व्यक्तीला स्व-विकासाची संधी मिळतेच, पण सोबत समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी आणि लोकशाही टिकवून ठेवण्यास मदत होते. 


स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ! हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकले असेल. असे म्हटले जाण्याचे एक कारण, आपण सर्वजण आपल्या हक्कांविषयी जितके जागरूक असतो त्या प्रमाणात आपल्या कर्तव्याबाबत दक्ष असतोच असे नाही. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी संविधानाने सुरुवातीपासूनच आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. इतकेच नाहीतर त्यांचे संरक्षण व्हावे याची ' अनुच्छेद-32 ' द्वारे तरतूद करून ठेवली आहे. यासोबतच संविधानात लोककल्याण आणि राज्याच्या विकासाला प्राथमिकता देत कोणतेही धोरण आखताना किंवा कायदा करताना सरकारने ' राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे ' लक्षात घ्यायला हवीत, असे निर्देश राज्याला दिले आहेत. आपण स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीत आपले लोकप्रतिनिधी आपल्या वतीने शासन आणि प्रशासन चालवतात. जर का आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ठरवून दिलेली काही कर्तव्ये पार पाडली तर लोककल्याण आणि राज्याच्या विकासात आपला देखील प्रत्यक्ष सहभाग राहू शकेल.

सहज पाळता येणारी कर्तव्ये 

लोकशाहीचे दायित्व स्वीकारणारे नागरिक तयार व्हावेत, नागरिकांचा लोकशाहीतील प्रत्यक्ष सहभाग वाढावा, समाज विघातक कृतीपासून नागरिकांनी दूर राहावे व आपल्या देशाची सुरक्षा, एकात्मता आणि सार्वभौमत्व टिकून राहावे यासाठी भारतीय संविधानाचे पालन करणे, राष्ट्रीय आदर्शांची जोपासना करणे, भारताची सार्वभौमत्वता, एकता व एकात्मतेचे संरक्षण करणे, देशवासीयांमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, आपल्या संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे जतन करणे, वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे, राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे, यासारखी कुणाही नागरिकाला सहज पाळता येणारी कर्तव्ये दिली आहेत.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

तुम्ही घर खरेदी करण्यापूर्वी या कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा मालकी धोक्यात येईल



तुम्ही घर खरेदी करण्यापूर्वी या कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा मालकी धोक्यात येईल

बहुतेक लोकांसाठी, घर खरेदी करणे हे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा बरेच काही आहे. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग घर खरेदी करण्यासाठी खर्च करते.

तथापि, घर खरेदी करण्याची प्रक्रिया अवघड असू शकते, विशेषत: जर कोणी प्रथमच घर खरेदी करत असेल तर. आपण कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी करू इच्छित आहात यावर अवलंबून आवश्यक कागदपत्रे बदलतात. त्यामुळे जे लोक पहिल्यांदाच घर खरेदी करत आहेत, त्यांच्यासाठी येथे आम्ही व्यवहार करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे ही माहिती मिळेल.

सेल डीड (Sale Deed)

विक्री करार (सेल डीड) हा एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये बिल्डरकडून एखाद्या व्यक्तीला मालमत्ता विक्री आणि हस्तांतरणाचा पुरावा असतो. अनेकदा घर विकत घेतल्यानंतर काही कारणास्तव घर विकायचे असेल तर ही कागदपत्रे आवश्यक असतात. विक्री करार सामान्यत: विक्री करारापूर्वी आणि करारात प्रवेश केलेल्या व्यक्तींनी मान्य केलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर तयार केला जातो.

मदर डीड (Mother Deed)

मदर डीड हा देखील मालमत्तेची मालकी दर्शविणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जेव्हा खरेदीदार मालमत्तेवर कर्ज घेतो तेव्हा सामान्यत: बँकांना या दस्तऐवजाची आवश्यकता असते. हे दस्तऐवज तयार करताना आपण मदतीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.

खरेदी-विक्री करार (Purchase and Sale Agreement)

विक्री आणि खरेदी करारामध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोघेही स्वीकारतात अशा अटी आणि शर्तींची यादी असते. याचे सोपे उदाहरण म्हणजे फ्लॅटची किंमत. या करारामध्ये खरेदीदार आणि विक्रेते या दोघांकडून फ्लॅटला मान्य झालेल्या रकमेचा समावेश असेल.

इमारत मंजुरी आराखडा (बिल्डिंग अप्रूवल प्लान) (Building Approval Plan)

बांधकाम सुरू करण्यापूर्वी बिल्डरला बिल्डिंग बायलॉज, मास्टर प्लॅन आणि स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात. या मंजुरीमध्ये दोन बाबींचा समावेश आहे - 

अ) इमारत आराखडा आणि ब) लेआऊट मंजुरी. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांची एक चूक म्हणजे बिल्डरने इमारत आराखडा आणि लेआऊट मंजुरीच्या अटी व शर्तीची पूर्तता केली आहे की नाही याची त्यांना खात्री नसते. नवीन इमारतींमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या जागेच्या तपासणीसाठी स्थानिक अधिकारी आले, तर अटी व शर्तींची पूर्तता न केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

ताबा पत्र (पोझिशन लेटर) (Position Letter)

पोझिशन लेटर हे बिल्डरने तयार केलेले दस्तऐवज आहे, ज्यात खरेदीदारांनी मालमत्तेचा ताबा घेतल्याची तारीख नमूद केली आहे. हे दस्तऐवज बिल्डरच्या नावाने तयार केले जातात आणि पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर तयार केले जातात. मात्र, हे पत्र कोणाच्याही मालमत्तेच्या मालकीचा पुरावा नाही. त्यासाठी घर खरेदीदाराला भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

इतर तीन कागदपत्रे (Three other documents)

आणखी तीन कागदपत्रे तपासावी लागतील. यामध्ये कंप्लीशन सर्टिफिकेट, खाते सर्टिफिकेट आणि अलॉटमेंट लेटर यांचा समावेश आहे. जर तुम्ही सध्या बांधकाम सुरू असलेले घर बुक करण्याचा विचार करत असाल तर हे पत्र खूप महत्वाचे आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

आकाशात वीजा चमकत असताना घराबाहेर असाल तर जीव वाचवण्यासाठी काय करावं? NDRF ने दिल्या महत्वाच्या सूचना

 ( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


आकाशात वीजा चमकत असताना घराबाहेर असाल तर जीव वाचवण्यासाठी काय करावं? NDRF ने दिल्या महत्वाच्या सूचना

आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा बळी जातो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर खुल्या आकाशाखाली राहूनही आकाशातून पडणाऱ्या विजेपासून आपला जीव वाचू शकतो.


लाइटनिंग, ज्याला वीज चमकणे देखील म्हणतात, आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे दरवर्षी ग्रामीण भागात हजारो लोकांचा बळी घेतात. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर जीव वाचू शकतो.

विजा मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसात पडतात. जे लोक मोकळ्या आकाशाखाली, हिरव्यागार झाडांखाली, पाण्याजवळ किंवा वीज आणि मोबाईल टॉवरजवळ आहेत, त्या लोकांना याचा धोका जास्त असतो. 


नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट (NDRF) ने जारी केलेल्या जागरूकता लेख मधे लोकांना विजेपासून वाचणयाचे मार्ग सांगण्यात आले आहेत. 

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, 'असा' घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

त्यानुसार, जर आकाशात वीज चमकत असेल आणि तुम्ही घराबाहेर असाल तर प्रथम सुरक्षित ठिकाणी (मजबूत छप्पर) पोहोचण्याचा प्रयत्न करा.

1) हे शक्य नसल्यास पाणी, विजेच्या तारा, खांब, हिरवीगार झाडे, मोबाईल टॉवर इत्यादीपासून ताबडतोब दूर जा.

2) जर तुम्ही आकाशाखाली असाल तर कानावर हात ठेवा, जेणेकरून विजेच्या जोरदार आवाजाने कानाचे पडदे फुटणार नाहीत.

3) आपल्या टाचा जोडून जमिनीवर स्क्वॅट स्थितीत बसा.

4) या काळात तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्ती असाल तर एकमेकांचा हात अजिबात धरू नका, तर एकमेकांपासून अंतर ठेवा.

5) छत्री किंवा रॉडसारख्या काही गोष्टी असतील तर त्या तुमच्यापासून दूर ठेवा, अशा गोष्टींवर वीज पडण्याची शक्यता असते.

6) वाळलेला गवत किंवा पेंढा इत्यादींच्या ढिगाऱ्यांपासून दूर राहा, त्याला आग लागू शकते


विजेची प्रक्रिया काही सेकंदांपर्यंत चालते, परंतु त्यातील विद्युत प्रवाहाचा बोल्ट इतका जास्त असतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्यास ते पुरेसे असते. कारण त्यात विद्युत गुणधर्म आहेत, जेथे विद्युत प्रवाह शक्य आहे तेथे ते अधिक प्रभावी आहे. आकाशातून पडणारी वीज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जमिनीवर पोहोचते आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सजीवांना इजा होते.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या.



पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या.

देशात पोलिसांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील कायद्यांचे संरक्षण करण्यात पोलिसांची निर्णायक भूमिका असते. अशातच पोलीस हे देशातील कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक आहेत.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

पोलीस नसेल तर कोणत्याही देशाच्या आणि राज्याच्या प्रशासन व्यवस्थेची कल्पना करणे कठीण आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था नीट पाळली जात आहे का? त्यावर लक्ष ठेवणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र, अशी अनेक प्रकरणे देशात उघडकीस आली आहेत, जिथे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला मारहाण केली. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...


सर्वातआधी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ताब्यात घेणं आणि अटक यात काय फरक आहे? ताब्यात असलेल्या व्यक्तीला चौकशीसाठी काही तासांसाठी कारागृहात नेले जाते.


तर अटकेत असलेली एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास किंवा गुन्हा केल्याचा संशय असल्यास त्याला तुरुंगात पाठवले जाते. मात्र अटक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले जाते. या काळात त्याला चौकशीसाठी किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात पाठवले जाते.


आता प्रश्न असा आहे की, अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीला मारहाण करू शकतात का? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही जारी केला आहे. जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेतल्यावर त्याला मारहाण केली, तर याला कस्टोडियन हिंसा, असे म्हटले जाईल. देशात ते बेकायदेशीर मानले जाते. न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलिसांना मारहाण करता येत नाही.

अटकपूर्व जामीन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय असते? अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला मारहाण केली, तर अशा परिस्थितीत दंडाधिकारी पोलिसांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 अंतर्गत वॉरंट जारी करतात. दंडाधिकारी येथे अटक किंवा कारवाईचे आदेशही देऊ शकतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

तो भरतकुमार चांद्रयान - ३ चा हिस्सा कसा बनला? चहाची टपरी ते चांद्रयान ही प्रेरणादायी कथा आहे

 

( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


VIDEO
परिस्थितीवर मात करत चंद्रावर पोहचण्याची ही कथा आहे. भरतकुमार ज्याच्याकडे शाळेची फी भरायची पैसे नव्हते. पुस्तक वह्या नव्हत्या. तो भरतकुमार चांद्रयान - ३ चा हिस्सा कसा बनला? चहाची टपरी ते चांद्रयान ही प्रेरणादायी कथा आहे भरतकुमारची जी प्रत्येकाने बघावी. प्रत्येक मुलाने प्रत्येक युवकाने प्रेरणा घ्यावी. 

कोण आहे हा भरतकुमार आणि कसा आहे त्याचा प्रवास ? झारखंड ते इस्रो एक प्रेरक प्रवास.

हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
-----------------------------------------------
VIDEO
चंद्रावरील खड्ड्यात पडता पडता प्रज्ञान रोव्हर वाचलं तेव्हा... व्हीडिओ पाहा.
-------------------------------------------------
VIDEO :  
चंद्रावर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडतानाचा व्हिडिओ इस्त्रोनं शेअर केला
-------------------------------------------------
VIDEO :  
चांद्रयान-३ चं लँडिंग करता करता ISRO चा आणखी एक विक्रम

हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
----------------------------------------------
VIDEO :  
चांद्रयान 3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झाली आता  चंद्रायान 3 पुढचे 14 दिवस चंद्रावर काय करणार?
हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
-----------------------------------------------

चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग लाइव्ह पाहता येणार, कधी, कुठं आणि कसं?; जाणून घ्या एका क्लिकवर

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोची महत्वकाक्षी चांद्रयान- 3 मोहीमेबाबत सतत महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. भारताच्या चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे.

चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासोबतच लँडर त्याची नवीन छायाचित्रेही घेत आहे. अशामध्ये येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी खूपच महत्वाचा असणार आहे.


चंद्रावर कधी होणार लँडिंग?

भारताची चांद्रयान 3 मोहिम इतिहास रचण्यापासून अगदी काही पावले दूर आहे. चांद्रयानचे विक्रम लँडर चंद्राला प्रदक्षिणा घालण्यासोबतच त्याची नवीन छायाचित्रे घेत आहे. इस्रोने लँडरने काढलेली अनेक नवीन छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

विक्रम लँडर मॉड्युल येत्या बुधवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग भारतीयांना लाईव्ह पाहता येणार आहे. या दिवसाची सर्वच भारतीयांना खूपच उत्सुकता आहे.


लँडिंग लाईव्ह पाहू शकता?

चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंगसाठी पाहण्याासाठी प्रत्येक भारतीय खूपच उत्सुक असून या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत आहे. चांद्रयान 3 चे लँडिंग पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. चांद्रयान 3 चे लँडिंग लाईव्ह पाहण्यासाठी ISRO ने प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करुन दिला आहे.

1) तुम्ही ISRO ची वेबसाइट https://www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

2) तुम्ही YouTube चॅनेल https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

3) फेसबुक पेज https://facebook.com/ISRO वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

4) DD नॅशनल टीव्ही स्ट्रीमिंगवर देखील तुम्ही लाईव्ह लँडिंग थेट पाहू शकतात.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

"महाज्योती" तर्फे एमएचटी-सीईटी, जेईई, नीटसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; पात्र विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 

"महाज्योती" तर्फे एमएचटी-सीईटी, जेईई, नीटसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; पात्र विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब 👇👇

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती )


क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.08.08.2019 अन्वये (कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 नुसार) केली आहे. या अंतर्गत लक्षीत प्रवर्गासाठी उद्देशीत कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.

1) इतर मागासवर्गीय (OBC), 

2) विमुक्त जाती (VJ),

3) भटक्या जमाती (NT), 

4) विशेष मागास वर्ग (SBC) 

तसेच शासन किंवा महाज्योतीने निश्चित केलेल्या वंचित व उपेक्षित जनसमुहांशी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे आणि शासनास त्यावरील उपाययोजना सुचविणे.


प्रमुख संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणून काम करणे व लक्ष्य गटांसाठी समाजिक शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे.

• कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार, स्वयंरोजगार, उद्यमशिलता, औद्योगिक घटकांची उभारणी व विकास यासाठी क्षमता निर्मित करणे, विविध सर्वेक्षण व संशोधन करुन एक डाटा बॅंक, ग्रंथालये, ज्ञान बॅंक (knowledge bank) विविध क्षेत्रातील अभ्यास व समन्वय मंडळे स्थापन करणे, ते विकसित करणे, त्याची देखरेख करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.

• वंचित घटकातील विद्यार्थी, लघु उद्योजक, शेतकरी आणि महिलांना विकासाची दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे, समुपदेशन केंद्रे स्थापन करणे.


व्यक्तिमत्त्व विकास, नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षा, उद्योग, व्यवसाय इत्यादींसाठी प्रशिक्षण, कोचिंग इ. प्रदान करणे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टायपेंड, शिष्यवृत्ती, फेलोशिप अनुदान देणे. लक्ष्य गटांची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही करणे.

सामाजिक शास्त्राच्या विविध क्षेत्रांशी संबंधित विविध कार्यक्रम, उपक्रम इत्यादींशी संबंधित कृती संशोधन कार्यक्रम राबवणे. लक्ष्य गटांकरिता सामाजिक नियोजन, घटनात्मक कर्तव्ये आणि अधिकारांसह विविध क्षेत्रांमध्ये योग्य आणि व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणे.



• राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक स्वभावाचा प्रचार करणे. त्याकरिता बंधुता, जातीय सलोखा आणि शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवणे. स्वच्छता, सत्यशोधक विवाह, व्यसनमुक्ती, आणि पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण करणे.

• समानता आणि सामाजिक न्यायाचा प्रचार प्रसार करणे. लिंगभेद, जातीय भेदभाव, वंश पूर्वाग्रह आणि अंधश्रद्धा दूर करणे.


महिला सक्षमीकरणाकरिता हुंडा निर्मूलन, जात-पंचायती, सामाजिक बहिष्कार, घरगुती हिंसाचार याबाबत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवणे. समाजिक माध्यमांचा वापर करुन यावर निबंध, वाद-विवाद, चर्चा घडवून आणने. माध्यमात प्रकाशित करणे.

• रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, कृषी औद्योगिक घटकांसह औद्योगिक युनिट्सची स्थापना आणि विकास यासाठी क्षमता निर्माण करणे. त्याकरिता विविध सर्वेक्षणाचा अभ्यास करणे. मूल्यमापन कौशल्य विकास प्रशिक्षण राबवणे.


दि.26.02.2020 च्या शासन निर्णयान्वये संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. महाज्योतीच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ पोहचविणे सुलभ व्हावे या हेतूने महाज्योतीचे विभागीय कार्यालय औरंगाबाद, नाशिक येथे सुरु करण्यात आलेले असून पुणे, मुंबई व अमरावती येथे विभागीय कार्यालय सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम.फिल करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते.

संपर्क

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एमए / 15/1, एस अंबाझरी रोड, वसंत नगर, नागपूर, महाराष्ट्र 440022

07122870120

07122870121

e.mail - mahajyotingp@gmail.com

e.mail - mahajyotimpsc21@gmail.com

e.maol - mahajyotiupsc21@gmail.com

e.mail - mahajyotiskill@gmail.cww.mahajyoti.org.in

---------------------------------------------------------------

महाज्योती'तर्फे एमएचटी-सीईटी, जेईई, नीटसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; पात्र विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे 2025 मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्र शिक्षण दिले जाणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विषेश म्हणजे, या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दर दिवसाला 6 जीबी इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे.


पात्रता

राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एमएचटी-सीईटी, जेईई, नीट 2025 करिता पूर्व प्रशिक्षण योजना लागू आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. 

1) यात राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यास अर्ज करता येईल. 

2) इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी विद्यार्थी असावा. 

3) उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. 

4) जे विद्यार्थी हे 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते अर्ज करण्यास पात्र राहतील. 

5) पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट) आणि दहावी ची गुणपत्रिकेसह अन्य आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे अपेक्षित आहे. 

अर्ज करण्यासाठी आपण पुढील लिंकचा वापर करू शकता.

https://mahajyoti.org.in/en/mht-cet-jee-neet-2025-

डायरेक्ट रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक.

https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php

अधिक माहितीसाठी तुम्हाला पीडीएफ फाईल देण्यात आलेली आहे.



विद्यार्थ्यांना असा करता येणार अर्ज

महाज्योतीच्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन 'ॲप्लिकेशन फाॅर एमएचटी-सीईटी/जेईई/नीट 2025 ट्रेनिंग' ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे काॅल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 0712-2870120-21 या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट24@जिमेल.काॅम वर आपल्या अर्जातील शंका दूर करता येणार.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

--------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: राज्य सरकार विद्यार्थ्यांना देतंय आर्थिक मदत जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: राज्य सरकार विद्यार्थ्यांना देतंय आर्थिक मदत जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

hmas.mahait.org

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करून त्याची प्रत समाजकल्याण कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात किंवा संपर्क साधावा.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत इयत्ता 10 वी नंतरच्या इयत्ता 11 वी व 12 वी आदी अभ्यासक्रमांना तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सन 2016-17 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

तुमच्या निवास व इतर खर्चासाठी या आर्थिक सुविधा दिल्या जातील. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 

महाराष्ट्र समाज कल्याण विभागामार्फत स्वाधार योजना राबविण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना पात्रता असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला गेला नाही असे सर्व विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत राज्य सरकार विद्यार्थ्यांना बोर्डिंग, निवास आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत करत आहे. परंतु योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला काही पात्रता पूर्ण करावी लागेल. या पात्रता निकषांची पूर्तता केल्यानंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते क्रमांक (जो आधार कार्डशी जोडलेला आहे)
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र


तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

स्वाधार योजनेंतर्गत मिळणारी मदत

  • बोर्डिंग सुविधा - 28,000 रुपये
  • निवास सुविधा - 15,000 रुपये
  • विविध खर्च - 8,000 रुपये
  • वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी 5,000 रुपये (अतिरिक्त)
  • इतर शाखा - 2,000 रुपये (अतिरिक्त)
  • एकूण - 51,000 रुपये


आवश्यक पात्रता
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.
  • उमेदवाघाल वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. हे ओलांडल्यास तुम्ही अर्ज करण्यास पात्र नाही.
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असावे. बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
  • 10वी किंवा 12वी नंतर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी अर्ज केला तर तो 2 वर्षांपेक्षा जास्त नसावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मागील वर्गात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार विकलांग किंवा दिव्यांग असल्यास त्यांच्या मागील वर्गात 40 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी गुण असल्यास तुम्ही अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.

असा करा अर्ज.....

ज्या उमेदवारांना या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अर्जाची PDF काढून सहजपणे अर्ज करू शकतात. येथे आम्ही तुम्हाला योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी काही स्टेप्स सांगत आहोत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता.

https://www.syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f

  • सर्वप्रथम उमेदवाराने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म PDF ची लिंक होम पेजवर देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर PDF फॉर्म उघडेल.
  • हा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  • प्रिंट आऊट घेतल्यानंतर अर्जात सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत तुमच्या अभ्यासक्रमांनुसार सर्व कागदपत्रे जोडा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे सबमिट करा.
  • कर्मचाऱ्यांनी तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सरकारकडून तुमच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पाठवली जाईल.
  • अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्ही अगदी सहजपणे आर्थिक मदत मिळवू शकता.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या  व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...