आपण सायबर फसवणूक, ऑनलाईन फसवणूक किंवा एटीएम फसवणुकीचे शिकार असाल तर काय करावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
ग्राहकांच्या चुकीसाठी बँक जबाबदार नाही
रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर ग्राहकांच्या चुकीमुळे ग्राहकांच्या खात्यावर फसवणूक केली गेली असेल, म्हणजेच त्याने एटीएम पिन, क्रेडिट कार्ड पिन, ओटीपी यासारख्या गोपनीय माहिती शेअर केल्या असतील तर अशा नुकसानीची भरपाई त्याला करावी लागेल. एकदा बँकेला याबाबत माहिती दिल्यानंतरही, जर कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला, तर ती बँकेची जबाबदारी असेल. त्याचवेळी, जर बँकेच्या चुकीमुळे बँकेतून डेटा चोरीला गेला तर बँक त्याची भरपाई करेल.
आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे
तीन दिवसांच्या आत तक्रार केल्यास कोणतेही नुकसान होणार नाही
जर बँक किंवा ग्राहक वगळता इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या चुकीमुळे ही फसवणूक झाली असेल, तर तीन दिवसांच्या आत तक्रार केल्यास ग्राहक एक रुपयाही गमावणार नाही. 7 दिवसांच्या आत तक्रार झाल्यास, प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 10 हजार किंवा व्यवहाराच्या रकमेमध्ये जे कमी असेल ते ग्राहकाचे नुकसान होईल.
10 दिवसाच्या आत पैसे मिळतील
आरबीआयने म्हटले आहे की ग्राहकांच्या खात्यातून फसवणूक करून काढलेली रक्कम ठरलेल्या वेळेत बँकेला माहिती दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यावर परत केली जाईल. आपण इच्छित असल्यास, आपण सायबर फसवणूक टाळण्यासाठी स्वतःचा विमा देखील घेऊ शकता. बजाज अलायन्स आणि एचडीएफसी अर्गो सारख्या कंपन्या या प्रकारचा विमा देतात. या विम्याअंतर्गत तुमच्या खात्यात सायबर फसवणूक झाल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.
तुम्हाला Online Fraudला बळी पडायचं नसेल, तर Internet वापरताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.
विनामूल्य वाय-फाय वापरणे टाळा
तुम्ही मुक्त Wifi वापरणे टाळले पाहिजे. तसेच ऑनलाइन पेमेंट किंवा बँकिंगसाठी तरी विनामूल्य वाय-फाय वापरू नका असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
URL वर लक्ष द्या
कोणतीही वेबसाइट उघडताना काळजी घ्या. त्याच्या URL वर विशेष लक्ष द्या.
जर URL https सह प्रारंभ होत नसेल, तर मग समजून जा की, ही वेबसाइट सुरक्षित नाही. या प्रकारच्या वेबसाइटला भेट देऊ नका, ती आपली वैयक्तिक माहिती चोरून घेऊ शकते.
प्रत्येक अकाउंटसाठी स्वतंत्र पासवर्ड ठेवा
बर्याचदा लोकं त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्यांचे पासवर्ड एकच ठेवतात.
कारण वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवणे अवघड आहे, परंतु तसे करणे ही तुमची मोठी चूक ठरु शकते.
जर हॅकर्सना एखाद्या प्रकारे तुमचा एखादा जरी पासवर्ड माहित पडला, तर त्यांना तुमते सर्व संकेतशब्द माहित असतील. म्हणूनच भिन्न खात्यांसाठी भिन्न संकेतशब्द ठेवणे फार महत्वाचे आहे.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......
संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस... सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419
सर्व फायलीचे बॅकअप असल्याचे सुनिश्चित करा
बर्याचदा लोक लॅपटॉप, फोन किंवा कंप्यूटरवर फाईल्सचा बॅकअप घेत नाहीत. तुम्ही हे करत नसल्यास हे जाणून घ्या की, असे केल्याने ही फाईल हटविली किंवा नष्ट होऊ शकते.
म्हणून, वेळोवेळी आपल्या महत्वाच्या फायलीचे बाह्य ड्राइव्हमध्ये बॅकअप घ्या. असे केल्याने तुमच्या फाईल्सवर Ransomware चा हल्ला टाळण्यास सक्षम असाल.
बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; तक्रार करा!!!
तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.
अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 155260 हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.
इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.
सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड
सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित 155260 या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.
यंत्रणा काम कशी करते..?
हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच
http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि 155260 हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा