हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३१ मे, २०२१

तुम्हाला माहित आहे का ?

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



*रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या का बनवल्या जातात, तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या*

भारतीय रेल् मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एवढे मोठे रेल्वे नेटवर्क ऑपरेट करण्यासाठी अनेक चिन्ह आणि सिग्नल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे ही रेल्वे सेवा कोणत्याही बाधां शिवाय आपल्या प्रवाशांना उत्तम सोय देते.

जर हे चिन्हं किंवा सिम्बॉल्स नसतील तर, भारतातच काय तर, कोणत्याही देशात रेल्वे चालवणे शक्य होणार नाही.

भारतीय रेल्वेमध्ये वापरले जाणारे बहुतेक चिन्हे किंवा सिम्बॉल्स हे रेल्वे कर्मचार्‍यांसाठी असतात. याशिवाय भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील काही चिन्हे आणि सिम्बॉल्स देण्यात आले आहेत. यांपैकी, भारतीय रेल्वेच्या डब्यांवर असलेल्या महत्वाच्या चिन्हाची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा.  संतोष विठ्ठल साळवे. 7900094419*

ही माहिती प्रत्येक प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

पांढर्‍या आणि पिवळ्या पट्ट्या

तुम्ही स्टेशनवर येणाऱ्या अनेक गाड्यांच्या डब्यांवर पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगाच्या पट्ट्या पाहिल्या असतील. या पट्ट्या एका डब्याच्या शेवटी टॉयलेट विंडोवर बनवल्या जातात. या पट्ट्या अगदी साध्या आहेत, परंतु त्यांचे स्वतःचे एक महत्त्व आहे आणि ते रेल्वे प्रवाश्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. बर्‍याच वेळा रेल्वेच्या फलाटावर हजारो प्रवाशांची गर्दी जमते. या गर्दीतील काही लोकं एसी बोग्यांमध्ये प्रवास करणारे असतात, तर काही लोकं स्लीपर बोग्यांमध्ये जात आहेत. या व्यतिरिक्त बरेच प्रवासी द्वितीय श्रेणीच्या बोग्यांमधूनही प्रवास करतात.

पांढरे आणि पिवळे पट्टे काय सूचित करतात

कोणत्याही ट्रेनमध्ये स्लीपर कोचपेक्षा जनरल बोग्यांची संख्या खूपच कमी असते. त्यामुऴे प्रवाशांना रेल्वेचे जनरल बोगी सहज शोधता यावे यासाठी या पट्ट्या बनवल्या आहेत. जनरल बोग्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना डब्याच्या शेवटी पांढर्‍या आणि पिवळ्या रंगाची पट्टी पाहिल्यानंतर समजते की, त्यांना या डब्यात बसायचे आहे.

रेल्वेमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जनरल डब्बा कुठे येतो हे माहिती असते. परंतु काहीवेळा डब्यांच्या क्रमात बदल होतो, ज्यामुळे प्रवाशांना डब्बा ओळखने कठीण होते. अशावेळी प्रवाशांना या पट्ट्या डब्याची ओळख करुन देण्यास मदत करतात.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

अहिल्याबाई होळकर जयंती : महाराष्ट्राच्या इतिहासातील तडफदार राज्यकर्ती 'पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई होळकर

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

अहिल्याबाई होळकर जयंती : महाराष्ट्राच्या इतिहासातील तडफदार राज्यकर्ती  'पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई होळकर

महाराणी अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. 

देखिये मालवा साम्राज्य की महारानी देवी अहिल्याबाई होल्कर की कहानी 

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://fb.watch/6lbcs2hljk/

महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.

विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.

‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई होळकर यांची संक्षिप्त माहिती


‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई होळकर याचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण 

कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला.

अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या! अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते त्यांच्या वाटायचं की महिलांनी शिक्षित व्हायला हवं. ज्या काळात महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली.

अहिल्याबाईंचे बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या, कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांनाच अवाक् करून सोडले… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष्य प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरता त्या एक आदर्श ठरल्या.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. 

जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा विवाह आणि अपत्ये 

बालपणापासून अहिल्याबाईंच्यात दया, परोपकार, प्रेम, सेवाभाव या भावना उपजतच होत्या. लहानपणी भुकेलेल्यांना अन्न भरवत असतांना छोट्याश्या अहिल्येला पुण्याला जात असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहीलं. त्यावेळी ते चौंडी येथे विश्राम करण्याकरता थांबले होते.

बालवयातच अहिल्याबाईंमधील दया प्रेम आणि गरजूंकरीता असलेली करुणा पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले कि त्यांनी त्वरित माणकोजी शिन्देंकडे आपला पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर 1733 साली वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर चा पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी संपन्न झाला. आणि अश्या तऱ्हेने बालवयातच अहिल्याबाई मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध अश्या होळकर कुटुंबाच्या सुनबाई झाल्या


लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे 1745 साली अहिल्याबाईंना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव मालेराव. पुढे तीन वर्षांनी म्हणजे 1748 ला मुक्ताबाई नावाची सुंदर कन्या झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत, शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धनिपुण होते. वडिलांच्या नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते.

अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वातील एवढ्या गुणांमागे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. वेळोवेळी मल्हाररावांनी आपल्या सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. अहिल्याबाईंमधील अद्भुत प्रतिभा पाहून मल्हारराव खूप समाधानी होत असत.

‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणी 

अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होत असतानांच अचानक त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला. 1754 साली जेंव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले.

इतिहासकारांच्या मते आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पतीनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पुढे 1766 साली मल्हारराव होळकरांचे देखील निधन झाले.

अहिल्याबाईंना अतिशय दुखः झाले, तरीदेखील निराश न होता पुढे मावळ प्रांताची जवाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये 1767 साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला.अहिल्याबाईंवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे असलेले सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखेच आहे.


एक महान योद्धा…कुशल राजनीतिज्ञ…आणि प्रभावशाली शासक ‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई:

आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळल्या नंतर देखील अहिल्याबाईंनी धीर खचू दिला नाही. वैयक्तिक दुःखाचा प्रभाव त्यांनी प्रजेवर पडू दिला नाही. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळणाऱ्या आपल्या मावळ प्रांताला पाहून त्यांनी स्वतः उत्तराधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पेशव्यांच्या पुढे विनंती केली.

11 डिसेंबर 1767 रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. अहिल्याबाईंनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याचलोकांनी याचा विरोध देखील केला. परंतु हळू-हळू त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहता प्रजा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली.

इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यावर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले.


आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत. युद्ध प्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवीत असत. ज्या सुमारास अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी प्रांतात अशांततेचं वातावरण पसरलं होतं.

राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लुट, हत्या, या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाईं यशस्वी झाल्या. आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण, या क्षेत्रात उत्तम विकास झाला.कालांतराने अहिल्याबाईंच्या शौर्य आणि साहसाची चर्चा अवघ्या विश्वात होऊ लागली. त्या एक दुरदृष्टीकोन बाळगणाऱ्या शासक होत्या,

आपल्यातील नैपुण्याने त्या शत्रूचा हेतू ओळखून घेत असत. ज्या सुमारास पेशव्यांना एका प्रकरणात इंग्रजांचा दृष्टं हेतू लक्षात आला नाही त्यावेळी अहिल्याबाईंनी पुढे होत पेशव्यांना त्याविषयी अवगत केले होते. महान शासक अहिल्याबाईंनी आपल्या राज्याच्या विस्ताराकरता अनेक चांगली कामं केलीत.आपल्या राज्याचा विकास व्यवस्थित होण्याच्या उद्देशाने त्यांनी राज्याला वेगवेगळे  तालुके आणि जिल्ह्यांमध्ये विभागले. ग्रामपंचायतीचे काम सुरळीत करून न्यायालयांची स्थापना केली. अहिल्याबाईंची गणना आता आदर्श शासकाच्या रुपात सर्वदूर होऊ लागली होत.

‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई यांची विकास आणि निर्माण कार्य 

अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात इंदौर नजीक महेश्वर येथे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एका भव्य, शानदार आणि आलिशान राजवाड्याची निर्मिती केली. त्या काळी साहित्य, संगीत, कला, आणि उद्योग क्षेत्रात महेश्वर ओळखले जात होते. मराठा प्रांताची महाराणी…पराक्रमी योद्धा अहिल्याबाई होळकर या कोणत्याही मोठ्या राज्याच्या शासक नव्हत्या तरीदेखील आपल्या शासनकाळात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यात आणि त्याला समृद्ध बनविण्यासाठी अनेक विकासात्मक कामं केलीत.

‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचे निर्माणकार्य पूर्ण केले. या व्यतिरिक्त अहिल्याबाईंनी मोठ्या कौशल्याने आणि कुशाग्रतेने अनेक किल्ले, विश्रामगृह, विहिरी, आणि रस्त्यांची निर्मिती केली. इतकेच नव्हे तर शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला शिवाय कला-कौशल्य क्षेत्रात सुद्धा आपले अभूतपूर्व योगदान दिले. राणी अहिल्याबाईंनी केवळ आपल्या प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक मंदिरांची, धर्मशाळांची, निर्मिती केलीये.


द्वारका, रामेश्वरम, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथ पुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार, सारख्या अनेक मंदिरांचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला व त्या ठिकाणी अनेक धर्मशाळा उभारल्या. याशिवाय बनारस येथे अन्नपूर्णा मंदिर, गया येथे विष्णू मंदिर बनविले. अहिल्याबाई होळकरांनी आपल्या शासनकाळात कलकत्ता ते बनारस या रस्त्याची निर्मिती केली…अनेक विहिरींचे निर्माणकार्य केले…घाट बांधले…रस्ते-मार्ग बनविले.

अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडलीत…पाण्याकरता अनेक पाणपोया स्थापन केल्या.

इंदौर शहराला सुंदर आणि समृद्ध बनविण्यात ‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाई होळकरांचे योगदान:

आपल्या 30 वर्षांच्या अद्भुत कार्यकाळात अहिल्याबाईंनी इंदौर या छोट्याश्या शहराला समृद्ध आणि विकासात्मक बनविण्यात आपले अमुल्य योगदान दिले आहे. येथील रस्त्यांची स्थिती, भुकेलेल्या जीवांसाठी अन्नछत्र, शिक्षण या संबंधी अद्वितीय कार्य करून ठेवलं आहे. त्यांच्यामुळेच आज इंदौर शहराची ओळख समृद्ध आणि विकसित शहरांमध्ये केली जाते.

विधवा महिला आणि समाजाकरता ‘पुण्यश्लोकराजमाता अहिल्याबाईंनी केलेली कार्य: 

अहिल्याबाईंची ओळख एक विनम्र आणि उदार शासक म्हणून सर्वदूर परिचित होती. गरजवंतांसाठी, गरीबांकरता, असहाय्य व्यक्तींसाठी त्यांच्या हृदयात करुणेचा सागर उफाळून येई. समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या अहिल्याबाईंनी समाजाकरता स्वतःला पूर्णतः समर्पित केले होते. त्या कायम आपल्या प्रजेचे आणि समाजाचे भले होण्याचा विचार करीत असत आणि त्या दृष्टीकोनातून कार्यरत रहात असत.


त्यावेळेच्या विधवा महिलांसाठी त्यांनी चांगलं कार्य केलं. आणि त्यांच्यासाठी त्या वेळी बनविण्यात आलेल्या कायद्यात देखील बदल केला. त्या वेळच्या कायद्याप्रमाणे जर एखादी महिला विधवा झाली आणि तिला मुलबाळ नसेल तर तिची सगळी संपत्ती सरकारी खजिन्यात किंवा राजकोशात जमा होत असे. परंतु अहिल्याबाईंनी या कायद्यात बदल करून महिलांना आपल्या पतीच्या संपत्तीचे वारसदार बनविले. या व्यतिरिक्त त्यांनी महिलांच्या शिक्षणावर फार भर दिला.आपल्या आयुष्यात आलेली अनेक संकटं पार करत अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने दुर्दम्य आशावादाने स्त्रीशक्तीचा वापर केला तो खूप प्रशंसनीय आहे. महिलांकरीता त्या कायम एक प्रेरणास्त्रोत होत्या आणि राहतील.


शिवाप्रती होती दृढ श्रद्धा आणि समर्पण:

‘पुण्यश्लोक’अहिल्याबाई होळकर यांची शिवावर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास होता. असं म्हणतात कि त्यांच्या स्वप्नात एकदा शिवाने दर्शन दिले होते. त्यानंतर 1777 साली त्यांनी संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.

त्यांच्या शिवाप्रती असलेल्या निस्सीम भक्ती बद्दल असं देखील म्हंटल्या जातं की अहिल्याबाई राजाज्ञा देतांना स्वाक्षरी करतांना शिवाचे नाव लिहित असत. तेंव्हापासून स्वराज्य मिळेपर्यंत इंदौर येथे जेवढयाही राजांनी सत्ता सांभाळली… राजाज्ञा भगवान शंकराच्या नावानेच निघत राहीली..

‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाईंना होळकर मिळालेला सन्मान 

‘पुण्यश्लोक’अहिल्याबाई होळकर यांनी समाजाकरता केलेल्या महान कार्याला पहाता त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 ला डाक तिकीट प्रकाशीत केले. याशिवाय अहिल्याबाईंच्या असाधारण आणि अद्वितीय कार्यासाठी त्यांच्या नावे एक पुरस्कार देखील दिला जाऊ लागला.

आधारकार्ड अपडेट करणे झाले सोपे घरबसल्या दुरुस्त करा तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता व जन्म तारीख

जर तुमच्याही आधारकार्ड मध्ये काही चुका असल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. यासाठी जर तुमच्या आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख याबाबत चुका असल्यास त्या अपडेट करणे गरजेचे आहे.

तुमच्या आधारमधील नाव, पत्ता व जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी संपर्क करा.. साळवे इंटरप्राईजेस..  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून काम केले जातील )

 ‘पुण्यश्लोक’राजमाता अहिल्याबाईंचा होळकर यांचा मृत्यू 

आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक ‘पुण्यश्लोक’अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे देवाज्ञा झाली. परंतु त्यांच्यातील उदारता… त्यांनी समाजाकरता केलेली असंख्य कार्य… यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत आणि यापुढेही राहतील.

आपल्या आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी… संघर्ष… याला तोंड देत त्या एकाकी झुंज देत लढत राहिल्या, कधीही परिस्थितीला शरण गेल्या नाहीत. आणि आपल्या लक्ष्याप्रती प्रामाणिक राहात पुढे जाट राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील एका आईसारखा त्यांनी आपल्या प्रजेचा सांभाळ केला.

म्हणूनच त्यांना राजमाता आणि लोकमाता म्हणून देखील ओळखले गेले. आपल्या प्रांताच्या सुखसमृद्धी करता त्यांनी असंख्य कामं केलीत. महाराणी अहिल्याबाई होळकर  कायम अदम्य नारीशक्ती…वीरता…पराक्रम…साहस…न्याय…राजतंत्राचे एक अद्वितीय उदाहरण म्हणून युगानुयुगे आपल्या स्मरणात राहतील.

“परमेश्वराने माझ्या खांद्यांवर जे उत्तरदायीत्व सोपविलेले आहे.

मला ते पार पाडायचे आहे.

प्रजेला सुखी ठेवणे माझे कर्तव्य आहे.

मी माझ्या प्रत्येक कर्माप्रती जवाबदार आहे.

सामर्थ्य आणि सत्तेच्या बळावर मी येथे जे काही करते आहे.

 त्याचे ईश्वराच्या दरबारी मला उत्तर द्यावे लागणार आहे.

येथे माझे काहीही नाही. 

ज्याचे आहे त्याच्याच जवळ पाठवते.

जे काही घेते आहे ते माझ्यावर कर्ज आहे.

 मला माहीत नाही मी याची परतफेड कशी करेल…

‘पुण्यश्लोक’ राजमाता अहिल्याबाई होळकर

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।     https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

शनिवार, २९ मे, २०२१

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य झिजवणारे, विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर 10 वा स्मृतीदिनास त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा 2003 चे मूळ विधेयक डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी तयार केले होता.

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य झिजवणारे, विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर 10 वा स्मृतीदिनास त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा

2003 चे मूळ विधेयक डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी तयार केले होता.

"महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013",हा महाराष्ट्र राज्यातील एक गुन्हेगारी कायदा आहे,मुळात हा कायदा 2003 मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनिस)चे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर (1945-2013) यांनी तयार केलेला आहे. हा कायदा.


जादूटोणा,नरबळी,आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांच्या अंधश्रद्धांचे शोषण होऊ शकेल त्यांना गुन्हेगारी अपराध ठरवितो.

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा

समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )


वर्षानुवर्षे बंदी घातलेल्या क्रियांची संख्या सतत कमी केली जात होती. दाभोलकर यांच्या हत्येनंतर, 26 ऑगस्ट 2013 रोजी हे विधेयक मांडण्यात आले आणि नागपूरच्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2013 मध्ये ते औपचारिकपणे मांडले गेले.


सध्याच्या विधेयकात १२ कलमें आहेत जी केवळ पुढील कृतींवर गुन्हे दाखल करतात.

1) कथितपणे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून भूत काढून टाकण्याच्या बहाण्याने प्राणघातक अत्याचार, जबरदस्तीने मानवी शरीरात मिसळणे, लैंगिक अत्याचार, ब्रांडिंग इ.

2) चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा करणे आणि प्रसारित करणे आणि अशा प्रकारे लोकांना फसवणे किंवा भयभीत करणे.

3) अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी आयुष्य धोक्यात आणणारी किंवा गंभीर दुखापत होणारी कृती करणे किंवा प्रोत्साहित करणे.

4) काही इनाम किंवा पुरस्काराच्या शोधात अमानुष कृत्ये किंवा मानवी बलिदानाचे पालन करणे किंवा प्रोत्साहित करणे.

5) एखाद्या व्यक्तीकडे अलौकिक शक्ती आहेत आणि लोक त्याच्या आज्ञा पाळण्यास भाग पाडतात अशी भावना निर्माण करणे.

6) एखाद्या व्यक्तीवर काळा जादू करण्याचा किंवा सैतानचा अवतार असल्याचा आरोप, त्याच्यावर / तिच्यावर रोग किंवा दुर्दैवी कारणीभूत असल्याचा आरोप करणे आणि त्या व्यक्तीला त्रास देणे.

7) एखाद्या व्यक्तीवर काळ्या जादूचा अभ्यास केल्याचा आरोप करणे, त्याला नग्न करणे व तिचे नग्न करणे आणि त्या व्यक्तीच्या क्रियाकलापांमध्ये अडथळा आणणे.


8) भुतांना चिघळण्याच्या क्षमतेचा दावा करणे, घबराट निर्माण करणे किंवा इतरांना भीती घालवून भुतांना हाक मारण्याची धमकी देऊन किंवा ताब्यात घेण्याची भावना निर्माण करणे,

9) एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे आणि त्याला / तिला अमानुष कृत्ये करण्यास भाग पाडणे.

10) कुत्रा, साप किंवा विंचू चाव्याव्दारे वैद्यकीय सल्ला घेण्यापासून रोखणे आणि त्याला जादूचे उपाय करण्यास भाग पाडणे.

11) बोटांनी शस्त्रक्रिया करण्याचा दावा (मानसिक शस्त्रक्रिया) आणि जन्म न घेतलेल्या गर्भातील लिंग बदलण्याचा दावा.

12) मागील अवतारातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असल्याचा दावा करणे आणि त्यांना लैंगिक कृतींमध्ये एकत्र करणे आणि नपुंसक स्त्रीला बरे करण्यासाठी अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि त्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे.

13) एखाद्या मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि अशा व्यक्तीचा वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करणे.


अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशा.बाधा इत्यादींमुळे तसेच, भोंदूबाबा यांच्याकडून समाजातील सामान्य जनतेचेमानसिक, शारीरिक वा आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना फार मोठया संख्येने उघडकीस येत असून हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. अशा इतर अनिष्ट अघोरी प्रथा यांचा प्रसार रोखण्यासाठी उचित व कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाय योजना करणे गरजेचे आहे आणि लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जागरुकता निर्माण करणे तेही गरजेचे आहे  

जरी नरबळी आधीपासूनच भारतात खून मानला जात असला तरी मानवी त्यागास प्रोत्साहित करणे याचा देखील कायद्यात समावेश केला गेला आहे. प्रत्येक उल्लंघन कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असू शकते ज्यात दंड 5000 ते 50000 रुपये पर्यंत आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आणि दखलपात्र आहेत.

“भारतीय दंडसंहितेनुसार जर कोणी पोलिसांच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते. अंधश्रद्धेमुळे लोकांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी  सर्वसमावेशक विधेयक तयार केले आहे.”

हा कायदा दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक व प्रशिक्षण, तसेच या गुन्ह्यांचा तपास करून स्थानिक पोलिस ठाण्यात अहवाल देण्याचे निर्देश देतो. या अधिकाऱ्यांची पत पोलिस निरीक्षकाच्या रँकपेक्षा जास्त असावी.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा.साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा चा इतिहास

2003 चे मूळ विधेयक डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी तयार केले होते.

जुलै 2003 मध्ये राज्य सरकारकडून या आराखड्यास मान्यता देण्यात आली. हे विधेयक केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ऑगस्ट 2003 मध्ये पाठवले होते.तथापि, अंधश्रद्धा, काळा जादू, जादू, जादूटोणा इत्यादी अटींची कमकुवत व्याख्या असल्याबद्दल यावर टीका केली गेली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले गेले नाही.विधेयकवादी श्याम मानव यांनी हे विधेयक सुधारित व पुनर्निर्देशित केले. हा मसुदा "महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू 2013" म्हणून सादर करण्यात आले.

2005 च्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक विधानसभेने 16 डिसेंबर 2006 रोजी मंजूर केले. सत्ताधारी कॉंग्रेस सरकारला विरोधक भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेअभावी टीकेचा सामना करावा लागला.

2 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी अध्यादेशावर सही केली. हा अध्यादेश डिसेंबर 2013 पर्यंत लागू राहील, जेव्हा हा राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला जाईल.


ऑगस्ट 2013 पर्यंत हे विधेयक विधानसभेत तीनदा मांडण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी ते पास करण्यात अपयशी ठरले होते आणि त्यात २ घटना दुरुस्ती करण्यात आल्या आहेत.

हा कायदा करण्याच्या विधेयकाचे नाव महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 होते, याला अंधश्रद्धाविरोधी विधेयक, काळा जादूविरोधी विधेयक, जादू टोणाविरोधी विधेयक या नावानेही ओळखले जाते. हे महाराष्ट्र विधानसभेत 11 डिसेंबर 2013 रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सादर केले. हे विधेयक विधानसभेद्वारे 11 डिसेंबर आणि विधानपरिषदेने 13 डिसेंबर 2013 रोजी मंजूर केले. या विधेयकाला राज्यपाल कतेकल शंकरनारायणन यांनी 20 डिसेंबर रोजी मान्यता प्राप्त केली. कायद्यात लागू केलेले विधेयक फक्त तुलनेने सुयोग्य आणि सुशिक्षित महाराष्ट्रात लागू होते. उर्वरित भारतामध्ये लोक फसवे ढोंग करणारे बाबा आणि बरे करणारे चमत्कारी याच्यापासुन संरक्षणाशिवाय राहतात.

 डॉ नरेंद्र दाभोळकर यांची मुले मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर व (अंनिस) चे अन्य कार्यकर्ते राष्ट्रीय-अंधश्रद्धाविरोधी भारतभर कायदा व्हावा म्हणून काम करतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   
----------------------------------------------------------------- 

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.  https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

गुरुवार, २७ मे, २०२१

*रमाबाई भीमराव आंबेडकर*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 


 *रमाबाई भीमराव आंबेडकर*

(७ फेब्रुवारी इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.



*रमाबाई आंबेडकर यांचे सुरूवातीचे जीवन*

कुटुंबियांसोबत बाबासाहेब. डावीकडून – मुलगा यशवंत, रमाबाई, वहिणी लक्ष्मीबाई व बाबासाहेबांचा आवडता कुत्रा टॉब्बी.

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचा विवाह*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई

सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*


  *रमाबाई आंबेडकर यांचे कष्टमय जीवन*

इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.

त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.


डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.

ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.

 *बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी*

रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.

*रमाबाई ते रमाआई*

एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.

ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.

वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देवून म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.

ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" म्हणतात,

"भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |"

   *रमाबाई आंबेडकर यांचे  निर्वाण*

रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. 
२७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 
  
-----------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा. https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

बुधवार, २६ मे, २०२१

तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती.वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला व याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो. आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले.

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

 

                                                                  *नमोबुद्धाय !*

तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती.वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला व याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो. आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले. 

आज संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांती तसेच विज्ञानवादी दृष्टिकोण देणाऱ्या दुःख मुक्तीसाठी अष्टांगिक मार्ग  सांगत मानवमुक्ती घडवून आणणाऱ्या जगातील सर्वप्रथम मानसोपचार तज्ञ सृष्टीचा अर्थ लावणारे प्रत्येक गोष्टीला कारण आहे हे सिद्ध करणारे प्रथम शास्त्रज्ञ तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती.वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला व याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो. आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले. हा अनोखा योग जगात केवळ भगवान बुद्धांच्या बाबतीत घडलेला आहे.

संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली.



*🌼धम्मविचार🌼 

*ज्या पद्धतीने *गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत* हा निसर्गामध्ये आधीपासूनच होता, त्याला *आयझॅक न्यूटन* ने फक्त लोकांसमोर मांडले. त्याच पद्धतीने *विपश्यनाचा सिद्धांत* हा देखील निसर्गामध्ये आधीपासूनच होता, परंतु खूप परिश्रम व पुरुषार्थ करून *विश्वगुरु तथागत बुद्धांनी* त्याला शोधले व लोकांसमोर मांडले, आणि अश्याप्रकारे लोकांना *दुःख मुक्तीचा मार्ग* मिळाला. 

Youtubr Link : 👇

https://youtu.be/cJQwzN3hGwY

भगवान बुद्धांचे संदेश

ईतर धर्मसंस्थपाक, बुवा, महाराज आपल्या उपासकांना केवळ माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो तेच अंतिम सत्य समजा असे सांगतात पण भगवान बुद्ध आपल्या उपासकांना कालामसुत्तात उपदेश देतात कि केवळ पूर्वजांनी सांगितले, धर्मग्रंथात लिहिले, परंपरा आहे, साधू संतांनी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका तर तर्काच्या विवेकाच्या कसोटीवर एखादी गोष्ट स्वतःच्या बुद्धीला पटली आणि जर ती गोष्ट तुमच्या व इतरांच्या सुद्धा भल्याची असेल तरच स्वीकारा.

शाक्य गणराज्याचे राजे शुद्धोधन व महाराणी महामाया किंवा मायादेवी ह्यांच्या पोटी गौतम बुद्ध ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव “सिद्धार्थ” असे ठेवले.परंतु त्यांच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांच्या मातेचे निधन झाले व त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने म्हणजेच महाप्रजापती गौतमी ह्यांनी केला.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

त्यांच्याच नावावरून गौतम बुद्ध ह्यांना “गौतम” असे नाव मिळाले.

गौतम बुद्ध ह्यांचा सांभाळ करणारी त्यांची दुसरी आई म्हणजेच मावशी महाप्रजापती गौतमी ह्या अर्हत पद प्राप्त झालेल्या महान भिक्खुणी होत्या. त्यांना जगातील पहिल्या भिक्खुणी मानले जाते.पुढे गौतम बुद्ध ह्यांचा यशोधरा ह्या राजकन्येशी विवाह झाला आणि त्यांना राहुल हा पुत्र झाला.


 महाज्ञानी गौतम बुद्ध ह्यांना जगातील दु:ख बघून संसारातून विरक्ती आली व त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून बोधिवृक्षाखाली तपश्चर्या केली.

अविरत तपस्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्यांनी बौद्धधर्माची शिकवण देऊन जगाला जीवनाचा खरा मार्ग व उद्देश दाखवला.

अनेक लोक असा प्रश्न उपस्थित करतात की, तथागत बुद्ध ह्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असूनही सर्व भारतीय त्यांना “आपले” का म्हणवतात? तर ह्याचे उत्तर असे आहे की, खरं तर हे महापुरुष कुठल्या एका देशाचे नसतात. सर्व जग त्यांचे व ते सर्व जगाचे असतात. भारतीयांसाठी तर तथागत बुद्ध हे दैवतच आहेत.कारण त्यांचा जन्म जरी नेपाळमध्ये झाला असला, तरीही त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या गोष्टी ह्या भारतात घडल्या.


गौतम बुद्ध ह्यांचा जन्म इसवी सन पूर्ण ५६३ साली नेपाळ मधील “लुंबिनी” ह्या ठिकाणी झाला 

असला तरीही,त्यांनी ज्या ठिकाणी ध्यान व तप करून ज्ञान प्राप्त केले.

*आर्य सत्य*

भगवान बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितली आहेत. आर्य म्हणजे महान सत्य, वस्तुनिष्ठ सत्य, व व्यवहार्य स्वरूप सिद्ध करणारे सत्य या तत्वज्ञानाचा मध्यम मार्ग, तर्कशुद्ध, विशुद्ध मानवी जीवन मार्ग होय.

*पहिले आर्य सत्य - दुःख*

जगात दुःख आहे, सर्व जग दुःखाने भरलेले आहे, हे दुख शारीरिक व मानसिक असू शकते, विश्वामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दुःख भोगावे लागते. पाच उपादन स्कंध दुःख आहे. यालाच दुःख आर्य सत्य म्हणतात.

*दुसरे आर्य सत्य - म्हणजे दुःख समुदाय*

मानवी जीवनात असलेले दुःख याला कारण आहे, कोणतेही दुःख आपोआप निर्माण होत नाही त्याला काहीतरी कारण असतेच, दुःख मनुष्याची तृष्णा म्हणजे तिला अतृप्ती, असंतोष, हाव, मोह, लोभ, काम, द्वेष, घोर निराशा, चिंता असे म्हणतात. तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे.

१) काम तृष्णा म्हणजे जे भोगविलासाची तृष्णा म्हणजे आसक्ती आहे, वस्तू सुख व आसक्ती निर्माण होते, ही  तृष्णा जीवनात दुःख निर्माण करते.

२) भवतृष्णा म्हणजे जीवनासक्ती अस्तित्वासाठी असलेली तृष्णा.

३) विभव - तृष्णा म्हणजे भयंकर निराशेने ग्रासून उत्पन्न झालेली मरणाशक्ती तृष्णा. अशी दुःखाची कारणे आहेत.

*तिसरे आर्य सत्य म्हणजे - दुःख निरोध* 

दुःख आहे म्हणून त्याचे कारणही आहे, या गोष्टीचे आकलन करून ते नष्ट करणे, दुःखाचा निरोध करणे, थांबविणे किंवा नष्ट करणे शक्य आहे. सत्य जाणून घेणे व निरोध करणे म्हणजे आपल्या तृष्णेला, वासनेला, विकाराला थांबविणे याला दुःख निरोधाचे तिसरे आर्यसत्य म्हणतात.

महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी विस्तृत जागेत पसरलेले जगप्रसिद्ध बौध्द विहार


*चौथे आर्य सत्य म्हणजे - दुःख निरोधगामिनी प्रतिपदा किंवा दुःख मुक्तीचा मार्ग*

भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा आर्य अष्टांगिक मार्ग तीन भागात विभागलेला आहे.

१) प्रज्ञा

२) शील

३) समाधी

*आर्य अष्टांगिक मार्ग* 

१) सम्यक दृष्टी 

२) सम्यक संकल्प

३) समय वाचा

४) सम्यक कर्मांत 

५)सम्यक आजीविका

६) सम्यक व्यायाम 

७) सम्यक स्मृती

 ८) सम्यक समाधी

दुःखातून मुक्त होणे, निर्वाण प्राप्त करून घेणे म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय, यालाच निर्वाणाकडे जाणारा मार्ग म्हटले आहे आणि हे चौथे आर्य सत्य आहे.

“राजपुत्र सिद्धार्थ गौतम” चे “महाज्ञानी गौतम बुद्ध” झाले ती जागा म्हणजे भारतातील बोधगया होय.

बोधगया बिहार ह्या राज्यात आहे हे तर सर्वांना माहित असेलच. 

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो.

ज्ञानप्राप्तीनंतर महाज्ञानी बुद्धांनी पाच पंडितांना उपदेश केला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्कपवत्तन’ किंवा ‘धम्मचक्रप्रवर्तन’ असे म्हणतात.

ह्या प्रवचनात गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची मुलतत्वे सांगितली.

त्यांनी ज्या ठिकाणी हे प्रवचन केले ती जागा म्हणजे सारनाथ होय. सारनाथ हे उत्तर प्रदेश येथे आहे.

तसेच गौतम बुद्धांनी ज्या नालंदा विश्वविद्यालयात ज्ञानदान केले ते नालंदा विश्वविद्यालय सुद्धा बिहारमध्ये म्हणजेच भारतातच आहे.

अनेकांना बौद्ध धर्माची शिकवण दिल्यानंतर त्याचा आणखी प्रसार करण्यासाठी गौतम बुद्ध ह्यांनी मगध राज्य व महाजनपदांत प्रवास करून हजारो लोकांना बौद्ध धर्माची शिकवण दिली.

हे सर्व कार्य त्यांनी भारतातच केले. इसवी सन पूर्व ४८३ मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले.

 कुशीनगर हे शहर देखील उत्तर प्रदेशातच म्हणजे भारतातच आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ भारतातच व्यतीत केला.

त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शरीराचे ७ अवशेष भारतातच. ठेवण्यात आले व एक अवशेष शाक्य पंथीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध परिषद बिहार येथील राजगृह येथे झाली होती. अजातशत्रू राजा व साधू महाकश्यप ह्यांनी ही परिषद आयोजीत केली होती.

ह्या परिषदेचे उद्दिष्ट्य भगवान बुद्धांच्या विनय व सुत्तांचे जतन करणे हे होते.

ह्याचप्रकारे दुसरी बौद्ध परिषद वैशाली येथे, तिसरी पाटलीपुत्र येथे तर चौथी बौद्ध परिषद कुंडलवन म्हणजेच काश्मीर येथे झाली होती. ह्या परिषदांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्याविषयी चर्चा झाली होती.

आता ऐतिहासिक दृष्ट्या बघायचे झाले तर इसवी सन पूर्व २०० -३०० मध्ये नेपाळ ह्या देशाचे अस्तित्व सुद्धा नव्हते.

भारतीय उपखंडात मौर्यांचे राज्य होते व मौर्यांची राजधानी ही पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्र म्हणजेच बिहारची राजधानी पटना शहर होय. मौर्यांचे साम्राज्य हे जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होते.

गौतम बुद्ध ह्यांचा व बौद्धधर्माचा सर्वात मोठा अनुयायी म्हणजे मौर्य वंशीय सम्राट अशोक ! हा सम्राट अशोक एक भारतीय राजा होता.

ह्यानेच आशिया खंडात बौद्धधर्माचा प्रसार केला. सम्राट अशोकाने सर्वत्र बौद्ध धर्माचा प्रसार केल्यामुळे जग हे भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखते.

जगभरातून लाखो लोक बोधगया, सारनाथ व कुशीनगर येथे दर्शनासाठी येतात. जितके लोक भारतात येतात तितके नेपाळला दर्शनासाठी जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

म्हणजेच फक्त भारतीयच नव्हे तर अख्खं जगच भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखतं!

भारतात बौद्धधर्माची अनेक पवित्र स्थाने आहेत. पटना, राजगिर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली, सांची येथे दर वर्षी अनेक बौध्दधर्मीय जाऊन दर्शन घेतात. येथील विहारांमध्ये ध्यान करतात.

बौद्ध धर्माचे मूळ भारतातच आहे.

बौद्धधर्मातील महत्वाची स्थाने व विहारांवरूनच ह्या राज्याला “बिहार” हे नाव पडले असे म्हणतात.

जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर मौर्यांचे राज्य होते. नेपाळचाही अर्ध्यापेक्षा अधिक भाग भारतात होता. व उरलेल्या भागात म्हणजेच आज जिथे चीन आहे तो भाग प्रोटो तिबेटी राज्यात होता. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी ह्या शहरात झाला.हे शहर कपिलवास्तू ह्या राज्यात होते.

भगवान बुद्धांचे वडील महाराज शुद्धोधन हे शाक्य साम्राज्याचे म्हणजेच कपिलवास्तूचे प्रमुख होते. हे कपिलवास्तू राज्य भारतातल्या १६ महाजनपदांपैकी एक होते.म्हणजेच तेव्हा हे राज्य म्हणजे भारताचाच एक भाग होता.त्यानंतर सुद्धा लिच्छवींच्या काळात हा प्रदेश लिच्छवी अधिराज्यात वृज्जी महाजनपदांच्या अखत्यारीत येत होता.

ह्या साम्राज्याची राजधानी वैशाली होती. त्यानंतर ह्या प्रदेशावर अजातशत्रू ह्या राजाचे राज्य आले. त्या काळात सुद्धा हा प्रदेश भारतीय भूमी म्हणूनच ओळखला जात असे.इसवी सन २०० ते ५०० दरम्यान गुप्त व हुणांच्या काळात नेपाळचा जन्म झाला.त्या आधी हा प्रदेश भारतभूमिचाच भाग होता. म्हणूनच भगवान बुद्धांचा जन्म सुद्धा भारताच्याच भूमितला आहे.

म्हणूनच भारतीय भगवान बुद्धांना आपले म्हणतात व जग सुद्धा भारताला “भगवान बुद्धांची भूमी” असे समजते.

ज्या महापुरुषाने सर्व जगाला आपले मानून सत्य व अहिंसेची शिकवण दिली ते भगवान बुद्ध साऱ्या जगाचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

प्राचीन भारतातील तक्षशिला विश्वविद्यालय 

Youtubr Link : 👇

https://youtu.be/7rqAEr8n_74

बौद्ध शिक्षणाचं सर्वात जुनं  केंद्रबिंदू म्हणून आपण तक्षशिला ह्या विद्यापीठाकडे पाहतो .सम्राट अशोकांनी आपल्या कारकिर्दीत असे अनेक विद्यापीठ उभारून बौद्ध संस्कृती जीवंत ठेवली होती आणि जगभर बौद्ध शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला होता जगाला जर शिक्षणाचं महत्व कोणी समजावलं तर ते म्हणजे सम्राट सशोक आहेत.

मात्र काळाच्या आड बौद्ध संस्कृती आणि साहित्य जमिनी आड दडली आणि हजारो वर्षे आपण बौद्ध शिक्षणापासून अलिप्त राहिलो. 

ज्याचा आदी, अंत, आणि मध्य कल्याणकारी आहे, सुखकारक आहे अश्या धम्म जगाला देणाऱ्या शाक्यमुनी भगवान बुद्धांना वंदन.

नमो बुध्दाय!

 *तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!    

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविध 

https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc 

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...